म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मन शरीराचे नियंत्रण करते. शरीर बलदंड असले, तरी मन कमजोर असेल तर त्या शरीराचा उपयोग होत नाही. भारताला ध्यान, योगासने, प्राणायामाची परंपरा, दैवी देणगी लाभली आहे. या माध्यमातून सर्वांचे आत्मभान जागवणे आवश्यक आहे. शेतकरी केवळ कर्जापोटीच नव्हे तर आत्मविश्वासाच्या अभावामुळेही आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ कर्जमुक्तीचीच नव्हे तर सत्संगाचीही गरज आहे,’ असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘जीवनसरिता’ या नद्यांच्या जलशुद्धीकरणाशी संबंधित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, आमदार मेधा कुलकर्णी, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इको इन्झाइम सोल्युशनच्या माध्यमातून मुळा-मुठेसह ११ नद्यांचे नैसर्गिक पद्धतीने जलशुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यांचे जलपूजन या वेळी करण्यात आले.
‘सर्वच कामे पैशाने होत नाहीत, त्यासाठी प्रेरणेचीही आवश्यकता असते. व्यक्ती जेव्हा तणावमुक्त असतो, तेव्हाच त्याला सत्कार्याची प्रेरणा मिळते. जो व्यक्ती नियमित योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम करतो, त्याला उत्साह आणि स्फूर्तीचा लाभ होतो. जपानसारखा देश सर्वसंपन्न असला, तरी तिथे युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड आहे. कारण तेथील युवकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. भारतीय युवकांमध्ये आध्यात्मिक लहर जागृत करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे,’ असे रविशंकर म्हणाले.
तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यावरूनच होईल. पाणी हेच जीवन आहे. जलसंवर्धऩ आणि जलशुद्धीकरण सर्वांचेच कर्तव्य आहे. नद्यांच्या शुद्धीकरणातून खूप काही साध्य होईल. आर्ट ऑफ लिव्हिंगही शास्त्रशुद्ध मार्गाने नदीशुद्धीकरणासाठी काम करत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी फक्त गंगाच नव्हे तर सर्वच नद्यांच्या शुद्धीकरणाला प्राधान्य दिले आहे. लहानपणापासून मी मुळा-मुठेच्या शुद्धीकरणाची चर्चाच ऐकत होतो. आता जायका प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणेसाठी हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, असे जावडेकर म्हणाले.
ज्ञानेश्वरांच्या रचनेने शेवट
रविशंकर यांनी उपस्थितांना २० मिनिटे ध्यान करायला लावले. या काळात ३०-४० हजारांच्या गर्दीतही अगदी टाचणी पडली तरी आवाज यावा, अशी शांतता होती. ध्यान झाल्यानंतर पसायदान झाले. त्यानंतर रविशंकर यांनी ‘पैल तोगे काऊ कोकताहे’ या ज्ञानेश्वरांच्या रचनेला सुरुवात केली आणि टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा निरोप घेतला.
‘मन शरीराचे नियंत्रण करते. शरीर बलदंड असले, तरी मन कमजोर असेल तर त्या शरीराचा उपयोग होत नाही. भारताला ध्यान, योगासने, प्राणायामाची परंपरा, दैवी देणगी लाभली आहे. या माध्यमातून सर्वांचे आत्मभान जागवणे आवश्यक आहे. शेतकरी केवळ कर्जापोटीच नव्हे तर आत्मविश्वासाच्या अभावामुळेही आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ कर्जमुक्तीचीच नव्हे तर सत्संगाचीही गरज आहे,’ असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘जीवनसरिता’ या नद्यांच्या जलशुद्धीकरणाशी संबंधित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, आमदार मेधा कुलकर्णी, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इको इन्झाइम सोल्युशनच्या माध्यमातून मुळा-मुठेसह ११ नद्यांचे नैसर्गिक पद्धतीने जलशुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यांचे जलपूजन या वेळी करण्यात आले.
‘सर्वच कामे पैशाने होत नाहीत, त्यासाठी प्रेरणेचीही आवश्यकता असते. व्यक्ती जेव्हा तणावमुक्त असतो, तेव्हाच त्याला सत्कार्याची प्रेरणा मिळते. जो व्यक्ती नियमित योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम करतो, त्याला उत्साह आणि स्फूर्तीचा लाभ होतो. जपानसारखा देश सर्वसंपन्न असला, तरी तिथे युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड आहे. कारण तेथील युवकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. भारतीय युवकांमध्ये आध्यात्मिक लहर जागृत करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे,’ असे रविशंकर म्हणाले.
तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यावरूनच होईल. पाणी हेच जीवन आहे. जलसंवर्धऩ आणि जलशुद्धीकरण सर्वांचेच कर्तव्य आहे. नद्यांच्या शुद्धीकरणातून खूप काही साध्य होईल. आर्ट ऑफ लिव्हिंगही शास्त्रशुद्ध मार्गाने नदीशुद्धीकरणासाठी काम करत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी फक्त गंगाच नव्हे तर सर्वच नद्यांच्या शुद्धीकरणाला प्राधान्य दिले आहे. लहानपणापासून मी मुळा-मुठेच्या शुद्धीकरणाची चर्चाच ऐकत होतो. आता जायका प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणेसाठी हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, असे जावडेकर म्हणाले.
ज्ञानेश्वरांच्या रचनेने शेवट
रविशंकर यांनी उपस्थितांना २० मिनिटे ध्यान करायला लावले. या काळात ३०-४० हजारांच्या गर्दीतही अगदी टाचणी पडली तरी आवाज यावा, अशी शांतता होती. ध्यान झाल्यानंतर पसायदान झाले. त्यानंतर रविशंकर यांनी ‘पैल तोगे काऊ कोकताहे’ या ज्ञानेश्वरांच्या रचनेला सुरुवात केली आणि टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा निरोप घेतला.