म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता आणि वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून यापूर्वीच प्रस्ताव मागविण्यात आले असून, आता आर्थिक आराखडा निश्चित करण्यासाठी पीएमआरडीएने पुढचे पाऊल टाकले आहे.
शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) विकसित करण्यात येणार आहेत. तर, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग पीएमआरडीएमार्फत केला जाणार आहे. पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गासाठी विविध इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहेत. त्याला देश-विदेशातील कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. येत्या काही दिवसांत कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, या संपूर्ण प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता जाणून घेण्यासह त्याचा वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीने तयारी सुरू केली आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) छाननी करून सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) हा प्रकल्प विकसित करण्यासाठीचा आर्थिक आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया पीएमआरडीएने सुरू केली आहे. आर्थिक आराखडा तयार करण्यासह ‘पीपीपी’वरील या प्रकल्पासाठी निविदेच्या अटी-शर्ती (टेंडर डॉक्युमेंट) निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे.
आर्थिक, कायदेशीर, तांत्रिक (इंजिनीअरिंग), वाहतूक आणि बांधकाम विकास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार अहवाल तयार करण्याचे काम सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प २३.३ किमीचा असून, त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर मेट्रोची २३ स्थानके असतील, असेही डीएमआरसीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. ‘पीपीपी’च्या माध्यमातून या मार्गाचा विकास करताना ‘आर्थिक आराखडा’ तयार करावा लागणार असून, त्यानंतर संभाव्य गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता आणि वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून यापूर्वीच प्रस्ताव मागविण्यात आले असून, आता आर्थिक आराखडा निश्चित करण्यासाठी पीएमआरडीएने पुढचे पाऊल टाकले आहे.
शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) विकसित करण्यात येणार आहेत. तर, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग पीएमआरडीएमार्फत केला जाणार आहे. पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गासाठी विविध इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहेत. त्याला देश-विदेशातील कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. येत्या काही दिवसांत कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, या संपूर्ण प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता जाणून घेण्यासह त्याचा वित्तीय आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीने तयारी सुरू केली आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) छाननी करून सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) हा प्रकल्प विकसित करण्यासाठीचा आर्थिक आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया पीएमआरडीएने सुरू केली आहे. आर्थिक आराखडा तयार करण्यासह ‘पीपीपी’वरील या प्रकल्पासाठी निविदेच्या अटी-शर्ती (टेंडर डॉक्युमेंट) निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे.
आर्थिक, कायदेशीर, तांत्रिक (इंजिनीअरिंग), वाहतूक आणि बांधकाम विकास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार अहवाल तयार करण्याचे काम सल्लागाराकडे सोपविण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प २३.३ किमीचा असून, त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर मेट्रोची २३ स्थानके असतील, असेही डीएमआरसीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. ‘पीपीपी’च्या माध्यमातून या मार्गाचा विकास करताना ‘आर्थिक आराखडा’ तयार करावा लागणार असून, त्यानंतर संभाव्य गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे.