म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चाकण एमआयडीसीमधील प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या दोन कंपन्यांवर स्वत: छापा टाकून कारवाई केली. अगरवाल पॅकेजिंग आणि मिताली पॅकेजिंग प्रा. लि. अशी संबंधित कंपन्यांची नावे आहेत. या वेळी कोट्यवधींचा कच्चा व पक्का माल जप्त करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम महसूल विभागाचे अधिकारी करत होते. मंत्री कदम बराच वेळ कंपनीमध्ये ठाण मांडून बसल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव झाली.
मंत्री रामदास कदम चाकण-तळेगाव रस्त्याने शिर्डीला जात होते. या वेळी एक टेम्पो प्लास्टिक भरून चालल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तो टेम्पो थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, प्लास्टिकचा माल खराबवाडीतील अगरवाल पॅकेजिंग या कंपनीतून आणल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कदम हे स्वतः संबंधित कंपनीत गेले आणि तेथे त्यांनी पाहणी केली. कंपनीत असलेल्या गोडाउनमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कच्चा व पक्का माल आढळला. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सर्व मालाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. कदम रात्री उशिरापर्यंत कंपनीत ठाण मांडून बसले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. प्लास्टिक कंपन्यांबाबत स्थानिक प्रशासनाला काहीच माहिती नव्हती का, असाही प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे.
संबंधित कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू बनविण्यासाठी लागणारा कच्च्या माल आढळून आला आहे. येथील गोडाउन सील करण्यात आले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. बंदी असलेला नेमका किती माल जप्त करण्यात आला हे पंचनामा पूर्ण झाल्यानंतर समजेल.
- सुचित्रा आमले, तहसीलदार, खेड
राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चाकण एमआयडीसीमधील प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या दोन कंपन्यांवर स्वत: छापा टाकून कारवाई केली. अगरवाल पॅकेजिंग आणि मिताली पॅकेजिंग प्रा. लि. अशी संबंधित कंपन्यांची नावे आहेत. या वेळी कोट्यवधींचा कच्चा व पक्का माल जप्त करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम महसूल विभागाचे अधिकारी करत होते. मंत्री कदम बराच वेळ कंपनीमध्ये ठाण मांडून बसल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव झाली.
मंत्री रामदास कदम चाकण-तळेगाव रस्त्याने शिर्डीला जात होते. या वेळी एक टेम्पो प्लास्टिक भरून चालल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तो टेम्पो थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, प्लास्टिकचा माल खराबवाडीतील अगरवाल पॅकेजिंग या कंपनीतून आणल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कदम हे स्वतः संबंधित कंपनीत गेले आणि तेथे त्यांनी पाहणी केली. कंपनीत असलेल्या गोडाउनमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कच्चा व पक्का माल आढळला. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सर्व मालाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. कदम रात्री उशिरापर्यंत कंपनीत ठाण मांडून बसले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. प्लास्टिक कंपन्यांबाबत स्थानिक प्रशासनाला काहीच माहिती नव्हती का, असाही प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे.
संबंधित कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू बनविण्यासाठी लागणारा कच्च्या माल आढळून आला आहे. येथील गोडाउन सील करण्यात आले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. बंदी असलेला नेमका किती माल जप्त करण्यात आला हे पंचनामा पूर्ण झाल्यानंतर समजेल.
- सुचित्रा आमले, तहसीलदार, खेड