अ‍ॅपशहर

‘मनसे’ची टीका

'शहरात विकासाची कामे व्हावीत, यासाठी पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला पालिकेत एकहाती सत्ता दिली आहे...

Maharashtra Times 30 Sep 2018, 4:00 am

'शहरात विकासाची कामे व्हावीत, यासाठी पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला पालिकेत एकहाती सत्ता दिली आहे. प्रत्येक कामाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याचा हट्ट पुरविण्यासाठी सत्ता दिलेली नाही. पालकमंत्री गिरीश बापट यांना मान देऊन भाजपच्या नगरसेवकांनी आपला हट्ट सोडावा आणि मेट्रोचे काम सुरू करावे. नगरसेवकांनी आपला हट्ट न सोडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणेकर आणि महामेट्रोच्या मागे खंबीरपणे उभी राहील,' असा इशारा मनसेचे राज्याचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिला आहे. 'दुहेरी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्रीच हवेत,' या सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या हट्टामुळे उड्डाणपुलाचे काम महिनाभरापासून रखडले आहे. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मनसेने भाजपवर कडक शब्दांत टीकास्त्र सोडले.

---

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज