मोबाइल टॉयलेट कुलूपबंद अवस्थेत; पालिकेचा गचाळ कारभार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय व्हावी, यासाठी मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने ‘ती’ या नावाने मोबाइल बस टॉयलेट सुरू केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) भंगारात काढलेल्या बसचे स्वच्छतागृहात रूपांतर करून ही टॉयलेट उभारण्यात आली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून यापैकी बहुतांश स्वच्छतागृहे कुलुपबंद अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहे चक्क बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्याच्या महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यावरून शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात येत होती. किमान वर्दळीच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट्स उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर परदेशातील सोयी-सुविधांच्या धर्तीवर पुण्यात मोबाइल टॉयलेट्स उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
पीएमपीएमएलने भंगारात काढलेल्या बसची खरेदी करून त्याचे रुपांतर मोबाइल टॉयलेट्समध्ये करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जून महिन्यांत महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या महिलांसाठीच्या टॉयलेट्सचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे संचालन सीएसआर आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात होते. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सिमला ऑफिस चौक, औंध, बिबवेवाडी अशा विविध ठिकाणी वर्दळीच्या जागी ही मोबाइल टॉयलेट उभारण्यात आली. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच ही मोबाइल टॉयलेट बंद पडली. या प्रकाराला वृत्तपत्रांनी वाचा फोडताच ही स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली. मात्र, आता यापैकी बहुतांश मोबाइल टॉयलेट बंद पडली आहेत, तर काही ठिकाणची टॉयलेट बेपत्ता झाली आहेत.
सर्वाधिक वर्दळीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील महिलांसाठीचे मोबाइल स्वच्छतागृह गायब आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेत ठेवलेल्या दोन्ही मोबाइल स्वच्छतागृह बसना टाळे लावण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून ही मोबाइल टॉयलेट बंद अवस्थेत असल्याचे उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठ रस्त्यावर सिमला ऑफिस चौकाशेजारी उभे असलेले मोबाइल टॉयलेटही पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर बिबवेवाडी, औंधसारख्या मोजक्याच ठिकाणी ही मोबाईल टॉयलेट कार्यान्वित आहेत. परिणामी एका चांगल्या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. शहरात आधीच स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नसल्याने महिलांची कुचंबणा होत असून महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे त्यात भरच पडली आहे.
अपेक्षित वापर नसल्याच तक्रार
शहरात महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचा अपेक्षित वापर होत नसल्याची तक्रार या टॉयलेटचे संचलन करणाऱ्या संस्थांकडून केली जात आहे. मात्र, शहरात झोपडपट्ट्यांसह काही ठिकाणी मोबाइल टॉयलेट कार्यान्वित आहेत, तर फर्ग्युसन रस्त्यावर उभारण्यात आलेली मोबाइल टॉयलेट बस स्थानिकांनी बाजूला केली आहेत. त्यामुळे ती दुसरीकडे हलविण्यात आली आहे. बंद असलेले मोबाइल टॉयलेट तातडीने सुरू करण्यात येतील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय व्हावी, यासाठी मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने ‘ती’ या नावाने मोबाइल बस टॉयलेट सुरू केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) भंगारात काढलेल्या बसचे स्वच्छतागृहात रूपांतर करून ही टॉयलेट उभारण्यात आली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून यापैकी बहुतांश स्वच्छतागृहे कुलुपबंद अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहे चक्क बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्याच्या महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यावरून शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात येत होती. किमान वर्दळीच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट्स उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर परदेशातील सोयी-सुविधांच्या धर्तीवर पुण्यात मोबाइल टॉयलेट्स उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
पीएमपीएमएलने भंगारात काढलेल्या बसची खरेदी करून त्याचे रुपांतर मोबाइल टॉयलेट्समध्ये करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जून महिन्यांत महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या महिलांसाठीच्या टॉयलेट्सचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे संचालन सीएसआर आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात होते. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सिमला ऑफिस चौक, औंध, बिबवेवाडी अशा विविध ठिकाणी वर्दळीच्या जागी ही मोबाइल टॉयलेट उभारण्यात आली. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच ही मोबाइल टॉयलेट बंद पडली. या प्रकाराला वृत्तपत्रांनी वाचा फोडताच ही स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली. मात्र, आता यापैकी बहुतांश मोबाइल टॉयलेट बंद पडली आहेत, तर काही ठिकाणची टॉयलेट बेपत्ता झाली आहेत.
सर्वाधिक वर्दळीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील महिलांसाठीचे मोबाइल स्वच्छतागृह गायब आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेत ठेवलेल्या दोन्ही मोबाइल स्वच्छतागृह बसना टाळे लावण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून ही मोबाइल टॉयलेट बंद अवस्थेत असल्याचे उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठ रस्त्यावर सिमला ऑफिस चौकाशेजारी उभे असलेले मोबाइल टॉयलेटही पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर बिबवेवाडी, औंधसारख्या मोजक्याच ठिकाणी ही मोबाईल टॉयलेट कार्यान्वित आहेत. परिणामी एका चांगल्या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. शहरात आधीच स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नसल्याने महिलांची कुचंबणा होत असून महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे त्यात भरच पडली आहे.
अपेक्षित वापर नसल्याच तक्रार
शहरात महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचा अपेक्षित वापर होत नसल्याची तक्रार या टॉयलेटचे संचलन करणाऱ्या संस्थांकडून केली जात आहे. मात्र, शहरात झोपडपट्ट्यांसह काही ठिकाणी मोबाइल टॉयलेट कार्यान्वित आहेत, तर फर्ग्युसन रस्त्यावर उभारण्यात आलेली मोबाइल टॉयलेट बस स्थानिकांनी बाजूला केली आहेत. त्यामुळे ती दुसरीकडे हलविण्यात आली आहे. बंद असलेले मोबाइल टॉयलेट तातडीने सुरू करण्यात येतील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.