अ‍ॅपशहर

रुपी बँकेचा प्रश्न लोकसभेत

रुपी बँकेच्या लाखो ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित असून, या बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव अद्याप 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'कडे (आरबीआय) प्रलंबित आहे.

महाराष्ट्र टाइम्स 17 Sep 2020, 1:26 pm
पुणे : 'रुपी बँकेच्या लाखो ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित असून, या बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव अद्याप 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'कडे (आरबीआय) प्रलंबित आहे. या बँकेच्या ठेवीदारांना संरक्षण मिळावे,' अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रुपी बँकेचा प्रश्न लोकसभेत


बँकिंग सुधारणा नियमन कायदा विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. त्यावर चर्चा करताना खासदार बापट यांनी रुपी बँकेच्या विषयाकडे लक्ष वेधले. खासदार बापट म्हणाले, 'रुपी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित आहेत. गेल्या शतकात लोकमान्य टिळकांनी लोकांकडून एक-एक रुपया घेऊन ही बँक सुरू केली होती. या बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव अद्याप 'आरबीआय'कडे प्रलंबित आहे. या बँकेच्या ठेवीदारांना संरक्षण मिळायला हवे.' बापट यांनी बँकिंग सुधारणा नियमन कायदा विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकामुळे देशभरातील बँकांमधील ठेवीदारांना संरक्षण मिळेल, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज