अ‍ॅपशहर

‘महापालिकेचा कारभार पुन्हा उघड’

शहरात झालेल्या पावसाने कात्रज परिसरासह आंबिल ओढ्यालगत उद्भवलेल्या परिस्थितीने पुणे महापालिकेच्या कारभारातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2020, 1:33 pm
पुणे : शहरात झालेल्या पावसाने कात्रज परिसरासह आंबिल ओढ्यालगत उद्भवलेल्या परिस्थितीने पुणे महापालिकेच्या कारभारातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘महापालिकेचा कारभार पुन्हा उघड’


कात्रज तलावातून बुधवारी पाणी सोडल्यामुळे कात्रज येथे ओढ्यालगतची संरक्षक भिंत तुटली. त्यामुळे घरांत पाणी शिरले होते. तेथील पाहणी सुळे यांनी गुरुवारी केली. नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, युवराज बेलदरे आदी या वेळी उपस्थित होते. 'महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी आंबिल ओढ्यालगतची संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा करणार असून, त्यासाठी शुक्रवारी त्यांची भेट घेणार आहे,' असे सुळे म्हणाल्या.

'महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आतापर्यंत सातत्याने सत्ता होती. ज्या परिसराचा खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्लेख केला आहे, त्या परिसरात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे केवळ गेली तीन वर्षे सत्तेवर आलेल्या भाजपवर केलेली टीका योग्य नाही. आपत्तीच्या काळात राजकारण करू नये,' अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज