शहरात संततधार सुरू असली, की सर्वच पायाभूत सुविधांवर ताण पडतो आणि व्यवस्था कोलमडून पडते. रस्ते, खड्डे अन् वाहतूक कोंडी या समस्या पुणेकरांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. या समस्यांच्या जोडीला आता 'महावितरण'च्या वीजवाहिन्यांमुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग घडत आहेत. ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. दुसरीकडे ग्रामीण भागांतील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी भर पावसात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे काम करणाऱ्या 'महावितरण'चा कारभार मात्र, अजूनही 'अंधारयात्रे'सारखा आहे.