म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशापुढे आमची किंमत शून्य असून देशाच्या तुलनेत कलाकार खटमल एवढे आहेत. जवान हेच खरे देशाचे हीरो आहेत. सर्वात प्रथम देश महत्वाचा असून त्यानंतर आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी सलमान खानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. 'सलमानने पाकिस्तानी कलाकारांना व्हीसा दिलेला नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला.
उरी हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ‘ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत’ असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर नाना पाटेकर यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'जवानांप्रति कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. ज्यांची लायकी नाही अशांना महत्वही देवू नये,' अशा शब्दांत नाना यांनी सलमानला फटकारले. 'सीमेवर युद्ध नसते तेव्हा तेथे एकमेकात बंधुभाव असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांना पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'मला आजवर कोणी कधीही जात विचारली नाही आणि जात सांगण्याची माझ्यावर कधी वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. माझ्या कामावर जनतेने लायकीनुसार प्रेम केले आहे. मला कधीही कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही,' असे सूचक वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले.
'देशापुढे आमची किंमत शून्य असून देशाच्या तुलनेत कलाकार खटमल एवढे आहेत. जवान हेच खरे देशाचे हीरो आहेत. सर्वात प्रथम देश महत्वाचा असून त्यानंतर आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी सलमान खानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. 'सलमानने पाकिस्तानी कलाकारांना व्हीसा दिलेला नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला.
उरी हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ‘ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत’ असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर नाना पाटेकर यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'जवानांप्रति कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. ज्यांची लायकी नाही अशांना महत्वही देवू नये,' अशा शब्दांत नाना यांनी सलमानला फटकारले. 'सीमेवर युद्ध नसते तेव्हा तेथे एकमेकात बंधुभाव असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांना पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'मला आजवर कोणी कधीही जात विचारली नाही आणि जात सांगण्याची माझ्यावर कधी वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. माझ्या कामावर जनतेने लायकीनुसार प्रेम केले आहे. मला कधीही कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही,' असे सूचक वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले.