अ‍ॅपशहर

'शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही'

शिवसेनेने राज्यसरकारचा पाठिंबा काढल्यास सरकार आपोआप कोसळेल. तेंव्हा अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे सांगतानाच पण मला वाटत धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही, असा

Maharashtra Times 27 Feb 2017, 3:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narayan rane statement on no confidence motion against government
'शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही'


शिवसेनेने राज्यसरकारचा पाठिंबा काढल्यास सरकार आपोआप कोसळेल. तेंव्हा अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे सांगतानाच पण मला वाटत धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज लगावला.

सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत दोन्ही काँग्रेसने हालाचाली सुरू केल्या आहेत, त्याबाबत राणे यांना छेडले असता या चर्चांना काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनाबरोबर असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे काय करावे आणि काय नाही हे शिवसेनेने ठरवायचे आहे. पण शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, असे वाटत असल्याचा टोला राणे यांनी हाणला.

भाजपच्या विजयावर ज्या काही शंका घेतल्या जात आहेत. त्यात काही तरी तथ्य असणारच असे सांगतानाच भाजपनं या निवडणुका प्रामाणिकपणे जिंकल्या नसल्याचा आरोप राणे यांनी केला.

अविश्वास ठरावावर जास्त लक्ष नको

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अविश्वास ठरावाबाबतची भूमिका अत्यंत सावधपणे स्पष्ट केली. अविश्वासदर्शक ठरावाबाबत आमच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्ही सांगून भूमिका पार पाडत नाही. आमच्या भूमिका उत्स्फूर्त असतात, असे सांगतानाच महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत थांबा, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचक उद्गगार ही राऊत यांनी काढले.

भाजपच्या जागा वाढल्या, इव्हिएम मशीन सदोष असल्यानं राज्यभरात लोकं कोर्टात चाललेत. याची उत्तरे सुद्धा मिळतील. घोटाळे फक्त पैशांचे किंवा टेंडरचे नसतात तर निवडणुकीत सुद्धा असतात, असेही ते म्हणाले.

मेहबुबा मुफ्ती अस्पृश्य नसेल तर काँग्रेसवर टीका नको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे स्पष्ट केलं. आता भाजपनं खालच्या स्थरावर काँग्रेसोबत केलेल्या युत्या तोडून टाकाव्यात. काँग्रेस बदमाश असेल, त्यांनी चोऱ्या आणि लफंगेगिरी केलेली आहे म्हणून काँग्रेमुक्त भारताचा नारा दिला आहे. भाजपला जर मेहबुबा मुफ्ती अस्पृश्य नसेल तर त्यांनी काँग्रेसवर टीका करु नये, असा हल्ला राऊत यांनी चढवला. बिहारमध्ये जर भाजपला नितीशकुमारांपेक्षा बऱ्यापैकी जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी लालू यादवांशी युती करून सरकार आणलं असतं आणि शुद्धीकरण केलं असतं. राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण होऊ शकतं, हे आम्ही आता यांच्याकडून शिकत आहोत, असा टोलाही त्यांनी हाणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज