ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांचा रसिकांशी दिलखुलास संवाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अभिनय हा एक पेशा आहे, या विचाराने मी अभिनेता होण्याची तयारी केली. त्यासाठीचे शिक्षण कसे आणि कोठे घ्यायचे याची माहिती अनेकांना नसते. माझीही अवस्था अशीच होती. पण अभिनयाचे वेड माझ्यात भिनलेले होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली, जी आजही जिवंत आहे,’ असे मत व्यक्त करून अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या कलाप्रवासाबाबत रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.‘आणि मग एक दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
पॉप्युलर प्रकाशन व अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत काळे, डॉ. विद्याधर वाटवे, रामदास भटकळ व रसिका राठिवडेकर उपस्थित होते. ज्योती सुभाष यांनी नसिर यांच्याशी संवाद साधला.
या वेळी बोलताना नासिरुद्दीन म्हणाले, ‘अभिनेता होणे भाग्यात असावे लागते, असे म्हणतात. लोक डॉक्टर, इंजिनीअर होतात. तसे मला अभिनेता व्हायचे आहे असे म्हटले तर कुठे बिघडले? खरे तर हाही एक पेशा आहे. याच विचारातून मी अभिनेता होण्याची तयारी सुरू केली. अभिनयाचे वेड माझ्यात होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली. ती आजही जिवंत आहे.’
‘मी लोकप्रिय व्हावे, लोकांनी मला ओळखावे, अशी स्वप्ने घेऊन मी आलो होतो. फक्त कलात्मकता समाधान देऊ शकत नाही. पैसाही महत्त्वाचा असतोच. आयुष्यात स्ट्रगल तसे कमी वाट्याला आले; पण काही व्यावसायिक चित्रपट माझ्यासाठी स्ट्रगल ठरले. लोकप्रिय चित्रपटांशी स्नेह असेल तरच अशा चित्रपटांमध्ये तुम्ही काम करू शकता. मला हे जमणारे नव्हतेच...’ असेही नसिर म्हणाले.
‘अभिनेत्याने भूमिकेत गढून जाण्याची गरज नसते. आपली भूमिका वठवताना सजग राहायला हवं. अभिनय ही न संपणारी प्रक्रिया आहे. संगीत, चित्र परीपूर्ण असू शकते; पण अभिनय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांना आपण ‘परफेक्ट’ आहोत असे वाटते, तो त्या अभिनेत्यांचा गैरसमज असतो,’ असा टोला त्यांनी ‘परफेक्शनिस्ट’ अभिनेत्याला लगावला. ‘काही जण मुलींसाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी अभिनेते बनतात; पण कलेची सेवा म्हणून कोणीच अभिनेता बनत नाही,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले. रमेश राठिवडेकर यांनी स्वागत केले. अस्मिता मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
-------------------------
चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे कशी ?
‘एफटीआयआयमध्ये आलो म्हणजे आपण ‘बाप’ झालो असे अनेकांना वाटते. चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे लागतातच कशी ? मुंबईमध्ये या मग कळेल की चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी एवढा वेळ कोण देईल ते. संस्थेची आत्ताची जी परिस्थिती झालीय त्याबद्दल मला फार आश्चर्य वाटत नाही,’ अशा शब्दांत नसिरुद्दीन शाह यांनी हल्ला चढवला.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अभिनय हा एक पेशा आहे, या विचाराने मी अभिनेता होण्याची तयारी केली. त्यासाठीचे शिक्षण कसे आणि कोठे घ्यायचे याची माहिती अनेकांना नसते. माझीही अवस्था अशीच होती. पण अभिनयाचे वेड माझ्यात भिनलेले होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली, जी आजही जिवंत आहे,’ असे मत व्यक्त करून अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या कलाप्रवासाबाबत रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.‘आणि मग एक दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
पॉप्युलर प्रकाशन व अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत काळे, डॉ. विद्याधर वाटवे, रामदास भटकळ व रसिका राठिवडेकर उपस्थित होते. ज्योती सुभाष यांनी नसिर यांच्याशी संवाद साधला.
या वेळी बोलताना नासिरुद्दीन म्हणाले, ‘अभिनेता होणे भाग्यात असावे लागते, असे म्हणतात. लोक डॉक्टर, इंजिनीअर होतात. तसे मला अभिनेता व्हायचे आहे असे म्हटले तर कुठे बिघडले? खरे तर हाही एक पेशा आहे. याच विचारातून मी अभिनेता होण्याची तयारी सुरू केली. अभिनयाचे वेड माझ्यात होते आणि अभिनयाची आग निर्माण झाली. ती आजही जिवंत आहे.’
‘मी लोकप्रिय व्हावे, लोकांनी मला ओळखावे, अशी स्वप्ने घेऊन मी आलो होतो. फक्त कलात्मकता समाधान देऊ शकत नाही. पैसाही महत्त्वाचा असतोच. आयुष्यात स्ट्रगल तसे कमी वाट्याला आले; पण काही व्यावसायिक चित्रपट माझ्यासाठी स्ट्रगल ठरले. लोकप्रिय चित्रपटांशी स्नेह असेल तरच अशा चित्रपटांमध्ये तुम्ही काम करू शकता. मला हे जमणारे नव्हतेच...’ असेही नसिर म्हणाले.
‘अभिनेत्याने भूमिकेत गढून जाण्याची गरज नसते. आपली भूमिका वठवताना सजग राहायला हवं. अभिनय ही न संपणारी प्रक्रिया आहे. संगीत, चित्र परीपूर्ण असू शकते; पण अभिनय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांना आपण ‘परफेक्ट’ आहोत असे वाटते, तो त्या अभिनेत्यांचा गैरसमज असतो,’ असा टोला त्यांनी ‘परफेक्शनिस्ट’ अभिनेत्याला लगावला. ‘काही जण मुलींसाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी अभिनेते बनतात; पण कलेची सेवा म्हणून कोणीच अभिनेता बनत नाही,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले. रमेश राठिवडेकर यांनी स्वागत केले. अस्मिता मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
-------------------------
चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे कशी ?
‘एफटीआयआयमध्ये आलो म्हणजे आपण ‘बाप’ झालो असे अनेकांना वाटते. चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी सहा वर्षे लागतातच कशी ? मुंबईमध्ये या मग कळेल की चाळीस मिनिटांच्या चित्रपटासाठी एवढा वेळ कोण देईल ते. संस्थेची आत्ताची जी परिस्थिती झालीय त्याबद्दल मला फार आश्चर्य वाटत नाही,’ अशा शब्दांत नसिरुद्दीन शाह यांनी हल्ला चढवला.