अ‍ॅपशहर

छत्रपतींचे नाव घेणारे राष्ट्रवादात दंग

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात कायमच राष्ट्रकारण केले; मात्र त्यांचे नाव घेणारे आज राष्ट्रवादात दंग झालेले आहेत. राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात याची खंत वाटते,’ असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी सोमवारी व्यक्त केले.

Maharashtra Times 25 Jan 2017, 3:02 am
राजकारणी राष्ट्रकारणाला महत्त्व देत नसल्याची रवी परांजपेंची खंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nationalism
छत्रपतींचे नाव घेणारे राष्ट्रवादात दंग


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात कायमच राष्ट्रकारण केले; मात्र त्यांचे नाव घेणारे आज राष्ट्रवादात दंग झालेले आहेत. राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात याची खंत वाटते,’ असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आऊसाहेब पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. त्या वेळी रवी परांजपे बोलत होते. यंदा आऊसाहेब पुरस्काराने रवींद्र नवलाखा यांच्या मातोश्री शांताबाई नवलाखा, प्रभाकर साळुंके यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई साळुंके, विमल बऱ्हाटे, अंकुश आसबे यांच्या मातोश्री जनाबाई आसबे, योगेश वाके यांच्या मातोश्री शांता वाके आणि गौतम कांबळे यांच्या मातोश्री ताराबाई कांबळे यांना गौरवण्यात आले. तसेच, शिवदास निनाद पुरस्कार यंदा दादर येथील अप्पासाहेब परब यांना प्रदान केला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

‘इसवी सनपूर्व तेरा हजार वर्षांहून अधिक आधी मातीचा कलश, घट निर्माण केला गेला. त्यामागचे मूळ चिंतन म्हणजे कोणत्याही पोकळीला आकार दिला, की घट अर्थात अवकाश तयार होते आणि त्या अवकाशावर छत्र ठेवले की ते सुरक्षित अवकाश तयार होते. महाराजांनी असेच राष्ट्रअवकाश घडवले,’ असे परांजपे या वेळी म्हणाले.

‘स्वातंत्र्यलढ्यात जोवर भारतमातेचे स्त्रीरूपी चित्र समोर आले नव्हते, तोवर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला खऱ्या अर्थाने धार, स्फुरण चढली नव्हती. कारण, आई म्हणजेच जीवन होय. आजही महाराष्ट्रात ‘श्यामची आई’ हे पुस्तकच सर्वांत अधिक वाचले जाते. आईने दिलेली प्रेरणा लढण्यास नेहमी बळ देते. म्हणून आईचे उपकार कधीही न फिटणारे असेच आहेत,’ असे फिरोदिया यांनी सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर तेजस लडकत यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज