म. टा. वृत्तसेवा, जुन्नरः जनआशिर्वाद आणि महाजनादेश यात्रेला शह देण्याच्या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथून झाला. २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या यात्रेचा प्रवास राज्यातील ८० विधानसभा मतदारसंघातून होणार आहे.
किल्ले शिवनेरीवरील माती कलशात घेऊन ही यात्रा जागोजागी जाणार आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यामागे कोलमडलेली अर्थव्यवस्था झाकून ठेवण्याचा हेतू नाही ना?, असा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. सध्या जनता पुरात आणि मुख्यमंत्री प्रचारात अशी स्थिती असून, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमुचा, असे विचारायची वेळ आता आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालविणाऱ्यांनी त्यांच्याच नावाच्या योजना काढून जनतेची फसवणूक केली. आता शिवाजी महाराज असते; तर, महाराजांनी या सरकारचा याच शिवनेरीवरून कडेलोट केला असता, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. तर, मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली यात्रा ही महाजनादेश यात्रा नसून, महाधनादेश यात्रा असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. युती सरकार आल्यापासून वीजेचे, पाण्याचे दर वाढले. त्यातून घावूक दरोडा कसा घालायचा हे फडणवीस सरकारने शिकवल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
किल्ले शिवनेरीवरील माती कलशात घेऊन ही यात्रा जागोजागी जाणार आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यामागे कोलमडलेली अर्थव्यवस्था झाकून ठेवण्याचा हेतू नाही ना?, असा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. सध्या जनता पुरात आणि मुख्यमंत्री प्रचारात अशी स्थिती असून, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमुचा, असे विचारायची वेळ आता आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालविणाऱ्यांनी त्यांच्याच नावाच्या योजना काढून जनतेची फसवणूक केली. आता शिवाजी महाराज असते; तर, महाराजांनी या सरकारचा याच शिवनेरीवरून कडेलोट केला असता, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. तर, मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली यात्रा ही महाजनादेश यात्रा नसून, महाधनादेश यात्रा असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. युती सरकार आल्यापासून वीजेचे, पाण्याचे दर वाढले. त्यातून घावूक दरोडा कसा घालायचा हे फडणवीस सरकारने शिकवल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.