म. टा. प्रतिनिधी, पुणे
नक्षलवाद्यांच्या शहरी सहानुभूतीदारांना वेसण घालण्याचे सूतोवाच करताना हैदराबाद आणि दिल्लीबरोबरच पुण्यातही त्यांचे पाठीराखे असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्याचा उल्लेख केल्यामुळे पुणे तपासाच्या रडारवर आले आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोमवारी बैठक घेतली. ‘पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमध्ये नक्षलवाद्यांचे देणगीदार आणि सहानुभूतीदार तयार झाले आहेत. प्रा. साईबाबाच्या मुसक्या आवळल्यामुळे ते आता आक्रमक होऊ शकतात,’ अशी भूमिका फडणवीस यांनी या वेळी मांडली होती.
पुणे शहरातही नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे तपासचक्राची सुई पुण्याकडेही वळल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत जंगलातील नक्षलवाद्यांचे पुणे आणि परिसरात वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या काही नक्षलवाद्यांना पुण्यात अटक झाली, तर पुण्यातील काही तरुण गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांबरोबर पोलिसांविरोधात लढत असल्याचे उघडकीस आले आहे. सुकमा हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत.
प्रा. साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर शहरी सहानुभूतीदारांवर कायद्याच्या चौकटीत राहून कशी कारवाई करता येऊ शकते, याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. अशा शहरी सहानुभूतीदारांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
जंगलातील नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार वाढत असल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त करून त्यांना वेसण घालण्याची मागणी केली आहे. गुप्तचर यंत्रणा, तसेच राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुण्यातील नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीदारांच्या हालचालींवर कसून लक्ष ठेवण्यात येते आहे. या चळवळीला मदत होऊ शकेल, अशी कोणतीही घटना पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवरही पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
या समर्थकांनी पुण्यापासून दिल्लीतील ‘जेएनयू’च्या आवारापर्यंत शहरी भागातही छुपे बस्तान बसवले असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करणे, त्यांना वकिलापासून सल्ला देण्यापर्यंतची सारी रसद या सहानभूतीदारांकडून पुरवली जाते. त्यांचा हा तोंडवळा सभ्य समाजातील वाटतो. तो हुडकून वेसण घालण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आक्रमकतेने राबवायला हवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
नव्या वादाची शक्यता
पुण्यात नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे आरोप आणि प्रत्यारोपांचा धुरळा यापूर्वीही उडाला होता. त्यातून राजकीय वादही निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती असलेल्या फडणवीस यांनीच थेट अशा स्वरूपाचा उल्लेख केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नक्षलवाद्यांच्या शहरी सहानुभूतीदारांना वेसण घालण्याचे सूतोवाच करताना हैदराबाद आणि दिल्लीबरोबरच पुण्यातही त्यांचे पाठीराखे असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्याचा उल्लेख केल्यामुळे पुणे तपासाच्या रडारवर आले आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोमवारी बैठक घेतली. ‘पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमध्ये नक्षलवाद्यांचे देणगीदार आणि सहानुभूतीदार तयार झाले आहेत. प्रा. साईबाबाच्या मुसक्या आवळल्यामुळे ते आता आक्रमक होऊ शकतात,’ अशी भूमिका फडणवीस यांनी या वेळी मांडली होती.
पुणे शहरातही नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे तपासचक्राची सुई पुण्याकडेही वळल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत जंगलातील नक्षलवाद्यांचे पुणे आणि परिसरात वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या काही नक्षलवाद्यांना पुण्यात अटक झाली, तर पुण्यातील काही तरुण गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांबरोबर पोलिसांविरोधात लढत असल्याचे उघडकीस आले आहे. सुकमा हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत.
प्रा. साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर शहरी सहानुभूतीदारांवर कायद्याच्या चौकटीत राहून कशी कारवाई करता येऊ शकते, याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. अशा शहरी सहानुभूतीदारांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
जंगलातील नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार वाढत असल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त करून त्यांना वेसण घालण्याची मागणी केली आहे. गुप्तचर यंत्रणा, तसेच राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुण्यातील नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीदारांच्या हालचालींवर कसून लक्ष ठेवण्यात येते आहे. या चळवळीला मदत होऊ शकेल, अशी कोणतीही घटना पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवरही पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
या समर्थकांनी पुण्यापासून दिल्लीतील ‘जेएनयू’च्या आवारापर्यंत शहरी भागातही छुपे बस्तान बसवले असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करणे, त्यांना वकिलापासून सल्ला देण्यापर्यंतची सारी रसद या सहानभूतीदारांकडून पुरवली जाते. त्यांचा हा तोंडवळा सभ्य समाजातील वाटतो. तो हुडकून वेसण घालण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आक्रमकतेने राबवायला हवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
नव्या वादाची शक्यता
पुण्यात नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असल्याचे आरोप आणि प्रत्यारोपांचा धुरळा यापूर्वीही उडाला होता. त्यातून राजकीय वादही निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती असलेल्या फडणवीस यांनीच थेट अशा स्वरूपाचा उल्लेख केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.