पुणे : आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मनसे, भाजप, शिवसेना ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेने शिंदे गट, असे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या सगळ्या पक्षांमध्ये आता राजकारणातला तेल लावलेल्या पैलवाननेही उडी घेतली आहे. अर्थात शरद पवार यांनीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार आज पुण्यात संवाद साधणार आहेत.
पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात बैठक पार पाडत आहे. या बैठीला जिल्ह्यातील तीन आमदारांनी हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यायाचे मावळचे आमदार सुनील शेळके, शिरूर मतदारसंघातले अशोक पवार आणि आंबेगाव तालुका मतदारसंघातले दिलीप वळसे पाटील हे बैठकीला उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला, असं सांगत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पक्षातील गटतट दूर झाले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपलीच सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांनी पवारांना सांगितलं.
बऱ्याच वर्षांनी साहेबानी आज जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केली. भोर वेल्हा मुळशीत राष्ट्रवादीत मोठी गटबाजी सुरू आहे. कुणालाही तिसरी टर्म देऊ नये, अशी विनंती साहेबांना केली आहे. तालुक्यात अनेक लोक संघटना आणि नेत्यांना मानत नाहीत. आघाडीचं धर्म असल्याने काँग्रेस आमदार लक्ष देत नाहीत. भोर वेल्हा मुळशी तालुका अजितदादांकडे द्या. सुप्रियाताई सगळ्यांना समजूतदारपणा दाखवतात. पण दादांना सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील असं साहेबांना सांगितल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकर भुरुक म्हणाले.
जुना साथीदार जग सोडून गेला.... लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवार कुटुंबीयांच्या भेटीला
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना लोकसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात शिंदे गटासोबत युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नड्डा यांनी भाजप नेत्यांना ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट दिल्याने शिंदे गटचं एकीकडे टेंशन वाढलं आहे. भाजपने येणाऱ्या निवडणुकांसाठी मोठी जय्यत तयारी सुरू केली आहे. शिंदे गटातही मातब्बर कार्यकर्ते आणि इतर पक्षातल्या पदाधिकारींची इन्कम सुरू केली आहे. मनसे ही हळूहळू आपला पक्ष मजबूत करण्यासाठी हालचाल करत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचसोबत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने दोन फायर ब्रँड नेते सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांना मोकळीक दिली आहे. या सर्व राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते शरद पवार काय रणनीती आखतात? हे या बैठकीत नंतर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
...म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत, शरद पवारांचं मर्मावर बोट
पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात बैठक पार पाडत आहे. या बैठीला जिल्ह्यातील तीन आमदारांनी हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यायाचे मावळचे आमदार सुनील शेळके, शिरूर मतदारसंघातले अशोक पवार आणि आंबेगाव तालुका मतदारसंघातले दिलीप वळसे पाटील हे बैठकीला उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला, असं सांगत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पक्षातील गटतट दूर झाले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपलीच सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांनी पवारांना सांगितलं.
बऱ्याच वर्षांनी साहेबानी आज जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केली. भोर वेल्हा मुळशीत राष्ट्रवादीत मोठी गटबाजी सुरू आहे. कुणालाही तिसरी टर्म देऊ नये, अशी विनंती साहेबांना केली आहे. तालुक्यात अनेक लोक संघटना आणि नेत्यांना मानत नाहीत. आघाडीचं धर्म असल्याने काँग्रेस आमदार लक्ष देत नाहीत. भोर वेल्हा मुळशी तालुका अजितदादांकडे द्या. सुप्रियाताई सगळ्यांना समजूतदारपणा दाखवतात. पण दादांना सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील असं साहेबांना सांगितल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकर भुरुक म्हणाले.
जुना साथीदार जग सोडून गेला.... लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवार कुटुंबीयांच्या भेटीला
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना लोकसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात शिंदे गटासोबत युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नड्डा यांनी भाजप नेत्यांना ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट दिल्याने शिंदे गटचं एकीकडे टेंशन वाढलं आहे. भाजपने येणाऱ्या निवडणुकांसाठी मोठी जय्यत तयारी सुरू केली आहे. शिंदे गटातही मातब्बर कार्यकर्ते आणि इतर पक्षातल्या पदाधिकारींची इन्कम सुरू केली आहे. मनसे ही हळूहळू आपला पक्ष मजबूत करण्यासाठी हालचाल करत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचसोबत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने दोन फायर ब्रँड नेते सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांना मोकळीक दिली आहे. या सर्व राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते शरद पवार काय रणनीती आखतात? हे या बैठकीत नंतर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
...म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत, शरद पवारांचं मर्मावर बोट