अ‍ॅपशहर

साखर आयातीची गरज नाही

‘देशात साखरेचे उत्पादन आणि गेल्यावर्षीच्या शिल्लकी साखरेचा गरजेपेक्षा सुमारे ४५ लाख टन साठा अतिरिक्त असल्याने साखरेच्या आयातीची गरज नाही. केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.’ असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सांगितले.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
साखरेचा ४५ लाख टन अतिरिक्त साठा उपलब्ध
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ni need to purchase of sugar from outside country
साखर आयातीची गरज नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात साखरेचे उत्पादन आणि गेल्यावर्षीच्या शिल्लकी साखरेचा गरजेपेक्षा सुमारे ४५ लाख टन साठा अतिरिक्त असल्याने साखरेच्या आयातीची गरज नाही. केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.’ असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सांगितले.
साखरेचे किरकोळ दर कमी न झाल्यास साखर धोरणामध्ये बदल करण्याचे सुतोवाच केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे; तसेच व्यापाऱ्यांकडून साखर आयातीची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. या वेळी संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर उपस्थित होते.
नागवडे म्हणाले, ‘देशात १४६ ते १४७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात ४०.२६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यातील २७, आणि उत्तरप्रदेशातील १०० साखर कारखान्यांमध्ये अद्याप गाळप सुरू आहे. त्यामुळे आणखी सुमारे ७० लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकेल. गेल्या वर्षीचा सुमारे ७० लाख टन साखरेचा साठा शिल्लकी आहे. देशाची वार्षिक गरज सुमारे २४० ते २४५ लाख टन आहे. त्यामुळे सुमारे ४५ ते ४७ लाख टन अतिरिक्त साठा होण्याची शक्यता आहे.’
‘किरकोळ बाजारात साखरेचा दर ४२ रुपये किलो आहे. हा दर कमी झाल्यास साखरेचे धोरण ठरवावे लागणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योगापुढे अडचण निर्माण होईल.’ असेही नागवडे म्हणाले. ‘यंदा उसाचे गाळप कमी झाल्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनात घट होणार होईल.’ असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज