अनंत दीक्षित
साधारण १५ वर्षांपूर्वीचा एक कार्यक्रम आठवतो. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन व पंडित दयाशंकर (वाराणसी) यांच्या सनईची जुगलबंदी ऐकली. संगीत हे स्वरकाव्य असते याचा तो अनुभव होता. संगीताला शब्दकोशविरहित भाषा असते. त्या अमूर्त भाषेचा व्याप वैश्विक असतो. हाच त्या जुगलबंदीचा साक्षात्कार होता. उपाध्येंचा परिचय झाल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा योग आला त्या प्रत्येक वेळी हा माणूस आनंदयात्री असल्याचे जाणवले.
उपाध्येंचे वडील पं. बाळकृष्णबुवा यांनी १९५१मध्ये व्हायोलिन अकादमीची स्थापना केली. घरात सतत व्हायोलिन वाजायचे. त्याचा संस्कार झाला. अतुलकुमार ८ वर्षांचे असल्यापासून व्हायोलिन वाजवतात. वादन आणि शिक्षणाचा हा जीवनप्रवास ५० वर्षांचा आहे. भारतीय संगीतातही एकरूप होणारे वाद्य म्हणूनच बाळकृष्णबुवांनी संपूर्ण आयुष्य व्हायोलिनला दिले. जे जे गाता येते ते सगळं व्हायोलिनमध्ये येते असे बाळकृष्णबुवा मानीत. त्यातच देवगंधर्व भास्करबुवा बखले घराण्याचे गायकीचे संस्कार झाले. पं. श्रीधर पार्सेकर व डॉ. यहुदी मेन्युहिन यांच्या शैलीचाही अतुलकुमारांवर मोठा प्रभाव पडला. त्यांचे वडील नेहमी म्हणायचे, की ज्याला कलेत सतत नवसर्जन सादर करायचे असेल, त्याने १०० वेळा तरी इतरांचे संगीत ऐकले पाहिजे. बाळकृष्णबुवांची दृष्टी व्यापक होती. त्यांनी डॉ. यहुदी मेन्युहिन यांचे वादन शिष्यांना ऐकविले. बापूराव केतकरांची सांगितिक विचारांची बैठक सतत चिंतनाच्या केंद्रस्थानी ठेवली. भीमसेनजींचा मियाँमल्हार समोर बसून ऐकायला लावला. किशोरीताईंचे स्वर अनुभवले. रविशंकरांची शैली कशी मनोहारी आहे, याचा अनुभव घेतला. पं. कुमार गंधर्वांचा प्रतिभाविलास पाहिला. साक्षात पु. ल. देशपांडेंनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची भेट घडवून आणली. उस्ताद शाहिद परवेझ, उस्ताद रशिद खाँ या दोघांनी तर बंधूवत प्रेम दिले आणि ज्ञानाचे आदानप्रदानही केले. उस्ताद आमीर खाँ साहेबांचा मारवा ऐकला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, विलायत खाँ साहेब, पं. जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम अली खाँ साहेब असे अनेक दिग्गज एकाग्रतेने ऐकण्याची संधी लाभली. पं. अतुलकुमार असे मानतात, की संगीत ही मुक्त आणि अमूर्त कला आहे. कलाकाराने ये हृदयीचे ते हृदयी अशी खूणगाठ पक्की करावी लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या आविष्कारात उपासना, रियाज आणि सिद्धी जाणवते. भारतीय संगीतात कोणाच्या आवाजात मादकता- कैफ आहे, कोणाच्या स्वरात शुचिता व मांगल्य आहे, या अर्थाने रोज नवी पूजा बांधावी, असे त्यांचे वादन असते. यासाठी त्यांना अनेक व्यवहारांवर पाणी सोडावे लागले. बँकेची नोकरी सोडावी लागली.
त्यांनी अनेक प्रगल्भ शिष्य घडविले. त्यांचे शिष्यांशी असणारे नाते हा एक मनोहारी भाग असतो. प्रत्येकाने स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करावी असा त्यांचा आग्रह असतो. गायन आणि वादन यांची एकरूपता, आत्मसंवाद, स्वरसंवाद, भावनांच्या गाभाऱ्यात पोहोचणे यासंबंधी त्यांची परिभाषा अत्यंत मोहक असते.
पं. अतुलकुमार यांनी स्वरझंकार हे व्यासपीठ उभे केले. पं. भीमसेन जोशी यांच्या सवाई गंधर्व महोत्सवातून प्रेरणा घेतली. लोकांना भारतीय संगीताचा कान दिला. शेकडो विद्यार्थी घडवले. जगाच्या क्षितिजावर विश्वसंगीताचे चिंतन केले. आयुष्यात तुडुंब भरलेला आनंद अनुभवला. याचा अर्थ अडचणी आल्याच नाहीत असे नाही. संगीत ज्ञानाची त्रिसूत्री पं अतुलकुमारांनी माझ्याशी बोलताना सांगितली. त्यातून त्यांचा दृष्टिकोन लख्खपणे जाणवतो.
१) आईच्या उदरात असतानाच लय आणि ताल यांचे शिक्षण मिळते. प्रत्येक जीव तिथेच या संस्कारांना सुरुवात करतो.
२) काहीतरी वेगळे करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते. दिशा आणि दृष्टीकोन त्यासाठी लागतो.
३) जीवनाकडे सतत नव्याने पाहण्याची साधना डोळसपणे करावी.
उपाध्येंचा सर्वांत महत्वाचा पैलू म्हणजे भविष्याविषयी ते आशावादी आहेत. नव्या पिढीवर विश्वास आहे. येत्या ५० वर्षांत भारतीय संगीताला खूपच चांगले दिवस येतील असे त्यांना वाटते. याच दृष्टीने Center for promotion of music विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. स्वरझंकारही महाराष्ट्राच्या गावोगावी पोहोचवला आहे. Center for promotion of music ला देशीविदेशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सुरू केलेले हे ज्ञानसत्र आहे. आजकाल चांगला गुरू आणि चांगला शिष्य यांना फार महत्त्व आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका येथेही या सेंटरला शिष्य मिळाले आहेत. भारतीय संगीतातील कोणत्याही रागाचे व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल, तर त्या रागाचे चौफेर दर्शन कसे घ्यावे यावर त्यांचा कटाक्ष असतो. परिणामी, पुण्यातही या व्हायोलिन अकादमीला अनेकांच्या अंतःकरणात अढळ स्थान आहे.
साधारण १५ वर्षांपूर्वीचा एक कार्यक्रम आठवतो. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन व पंडित दयाशंकर (वाराणसी) यांच्या सनईची जुगलबंदी ऐकली. संगीत हे स्वरकाव्य असते याचा तो अनुभव होता. संगीताला शब्दकोशविरहित भाषा असते. त्या अमूर्त भाषेचा व्याप वैश्विक असतो. हाच त्या जुगलबंदीचा साक्षात्कार होता. उपाध्येंचा परिचय झाल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा योग आला त्या प्रत्येक वेळी हा माणूस आनंदयात्री असल्याचे जाणवले.
उपाध्येंचे वडील पं. बाळकृष्णबुवा यांनी १९५१मध्ये व्हायोलिन अकादमीची स्थापना केली. घरात सतत व्हायोलिन वाजायचे. त्याचा संस्कार झाला. अतुलकुमार ८ वर्षांचे असल्यापासून व्हायोलिन वाजवतात. वादन आणि शिक्षणाचा हा जीवनप्रवास ५० वर्षांचा आहे. भारतीय संगीतातही एकरूप होणारे वाद्य म्हणूनच बाळकृष्णबुवांनी संपूर्ण आयुष्य व्हायोलिनला दिले. जे जे गाता येते ते सगळं व्हायोलिनमध्ये येते असे बाळकृष्णबुवा मानीत. त्यातच देवगंधर्व भास्करबुवा बखले घराण्याचे गायकीचे संस्कार झाले. पं. श्रीधर पार्सेकर व डॉ. यहुदी मेन्युहिन यांच्या शैलीचाही अतुलकुमारांवर मोठा प्रभाव पडला. त्यांचे वडील नेहमी म्हणायचे, की ज्याला कलेत सतत नवसर्जन सादर करायचे असेल, त्याने १०० वेळा तरी इतरांचे संगीत ऐकले पाहिजे. बाळकृष्णबुवांची दृष्टी व्यापक होती. त्यांनी डॉ. यहुदी मेन्युहिन यांचे वादन शिष्यांना ऐकविले. बापूराव केतकरांची सांगितिक विचारांची बैठक सतत चिंतनाच्या केंद्रस्थानी ठेवली. भीमसेनजींचा मियाँमल्हार समोर बसून ऐकायला लावला. किशोरीताईंचे स्वर अनुभवले. रविशंकरांची शैली कशी मनोहारी आहे, याचा अनुभव घेतला. पं. कुमार गंधर्वांचा प्रतिभाविलास पाहिला. साक्षात पु. ल. देशपांडेंनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची भेट घडवून आणली. उस्ताद शाहिद परवेझ, उस्ताद रशिद खाँ या दोघांनी तर बंधूवत प्रेम दिले आणि ज्ञानाचे आदानप्रदानही केले. उस्ताद आमीर खाँ साहेबांचा मारवा ऐकला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, विलायत खाँ साहेब, पं. जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम अली खाँ साहेब असे अनेक दिग्गज एकाग्रतेने ऐकण्याची संधी लाभली. पं. अतुलकुमार असे मानतात, की संगीत ही मुक्त आणि अमूर्त कला आहे. कलाकाराने ये हृदयीचे ते हृदयी अशी खूणगाठ पक्की करावी लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या आविष्कारात उपासना, रियाज आणि सिद्धी जाणवते. भारतीय संगीतात कोणाच्या आवाजात मादकता- कैफ आहे, कोणाच्या स्वरात शुचिता व मांगल्य आहे, या अर्थाने रोज नवी पूजा बांधावी, असे त्यांचे वादन असते. यासाठी त्यांना अनेक व्यवहारांवर पाणी सोडावे लागले. बँकेची नोकरी सोडावी लागली.
त्यांनी अनेक प्रगल्भ शिष्य घडविले. त्यांचे शिष्यांशी असणारे नाते हा एक मनोहारी भाग असतो. प्रत्येकाने स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करावी असा त्यांचा आग्रह असतो. गायन आणि वादन यांची एकरूपता, आत्मसंवाद, स्वरसंवाद, भावनांच्या गाभाऱ्यात पोहोचणे यासंबंधी त्यांची परिभाषा अत्यंत मोहक असते.
पं. अतुलकुमार यांनी स्वरझंकार हे व्यासपीठ उभे केले. पं. भीमसेन जोशी यांच्या सवाई गंधर्व महोत्सवातून प्रेरणा घेतली. लोकांना भारतीय संगीताचा कान दिला. शेकडो विद्यार्थी घडवले. जगाच्या क्षितिजावर विश्वसंगीताचे चिंतन केले. आयुष्यात तुडुंब भरलेला आनंद अनुभवला. याचा अर्थ अडचणी आल्याच नाहीत असे नाही. संगीत ज्ञानाची त्रिसूत्री पं अतुलकुमारांनी माझ्याशी बोलताना सांगितली. त्यातून त्यांचा दृष्टिकोन लख्खपणे जाणवतो.
१) आईच्या उदरात असतानाच लय आणि ताल यांचे शिक्षण मिळते. प्रत्येक जीव तिथेच या संस्कारांना सुरुवात करतो.
२) काहीतरी वेगळे करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते. दिशा आणि दृष्टीकोन त्यासाठी लागतो.
३) जीवनाकडे सतत नव्याने पाहण्याची साधना डोळसपणे करावी.
उपाध्येंचा सर्वांत महत्वाचा पैलू म्हणजे भविष्याविषयी ते आशावादी आहेत. नव्या पिढीवर विश्वास आहे. येत्या ५० वर्षांत भारतीय संगीताला खूपच चांगले दिवस येतील असे त्यांना वाटते. याच दृष्टीने Center for promotion of music विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. स्वरझंकारही महाराष्ट्राच्या गावोगावी पोहोचवला आहे. Center for promotion of music ला देशीविदेशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सुरू केलेले हे ज्ञानसत्र आहे. आजकाल चांगला गुरू आणि चांगला शिष्य यांना फार महत्त्व आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका येथेही या सेंटरला शिष्य मिळाले आहेत. भारतीय संगीतातील कोणत्याही रागाचे व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल, तर त्या रागाचे चौफेर दर्शन कसे घ्यावे यावर त्यांचा कटाक्ष असतो. परिणामी, पुण्यातही या व्हायोलिन अकादमीला अनेकांच्या अंतःकरणात अढळ स्थान आहे.