पुणे : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधक रडत आहे. पण त्यांनी आधी याचं उत्तर द्यावं. केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही? महाविकास आघाडी सरकार याला जबाबदार आहे, असा गंभीर आरोप करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman ) यांनी शिवसेनेसह ( Uddhav Thackeray ) राष्ट्रवादी ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राज्यात सद्या गेल्या काही दिवसांपासून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी तसेच विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे. आता याच प्रकल्पावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाणार सारखा प्रकल्प, जी आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्प होऊ दिला नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला? सर्वांना माहित आहे. हा प्रकल्प झाला असता तर याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे. राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आज इतका आरडाओरडा करत आहे. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावा, असा सणसणीत टोला सितारामन यांनी लगावला आहे.
Ajit Pawar : केंद्रीय मंत्री बारामतीत, पण पॉवर पवारांचीच!; अजितदादांच्या जनता दरबाराला दुप्पट गर्दी
सहकार क्षेत्रात अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. पण त्यापैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनवण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलं. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे. सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं सितारामन म्हणाल्या.
अजितदादांची गृहमंत्रिपदाची योग्यता, राष्ट्रवादीत लवकरच राजकीय ब्लास्ट, भाजपचं भाकित
सध्या देशातील डॉलर च्या तुलनेत रुपयाची घट झाली असली तरी बाकीच्या देशाच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून असल्याचे निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले.
नाणार सारखा प्रकल्प, जी आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्प होऊ दिला नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला? सर्वांना माहित आहे. हा प्रकल्प झाला असता तर याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे. राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आज इतका आरडाओरडा करत आहे. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावा, असा सणसणीत टोला सितारामन यांनी लगावला आहे.
Ajit Pawar : केंद्रीय मंत्री बारामतीत, पण पॉवर पवारांचीच!; अजितदादांच्या जनता दरबाराला दुप्पट गर्दी
सहकार क्षेत्रात अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. पण त्यापैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनवण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलं. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे. सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं सितारामन म्हणाल्या.
अजितदादांची गृहमंत्रिपदाची योग्यता, राष्ट्रवादीत लवकरच राजकीय ब्लास्ट, भाजपचं भाकित
सध्या देशातील डॉलर च्या तुलनेत रुपयाची घट झाली असली तरी बाकीच्या देशाच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून असल्याचे निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले.