शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांचे मत; पारंपरिक दृष्टिकोनावर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देव-देवतांच्या कथा आणि प्रियकर-प्रेयसीच्या कहाण्या मांडण्यासाठीच आजवर शास्त्रीय संगीताचा वापर झाला आहे. संगीत हे अूमूर्त स्वरुपाचे आहे. त्याची शास्त्रीय आणि सुगम अशी विभागणी होऊ शकत नाही. शास्त्रीय संगीताच्या आधारे सामाजिक, अर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले जाऊ शकते. परंतु, ही बाब शास्त्रीय संगीतकारांना न रुचल्याने देशात असे अभिनव प्रयोग होत नाहीत,’ अशी खंत कर्नाटकी संगीताचे गाढे अभ्यासक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी व्यक्त केली.
प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेत यंदा कृष्णा यांनी संगीताबद्दल आपले परखड विचार मांडत अभिजात संगीताचा आधार घेऊन संकुचित विचार करणाऱ्या संगीतकारांवर ताशेरे ओढले. अभिजात संगीताच्या नावाखाली शास्त्रीय संगीतकारांनी स्वतःभोवती एक चौकट निर्माण केली आहे. त्या चौकटीमुळे शास्त्रीय संगीतात एक विशिष्ट वर्ग केवळ समाविष्ट केला जातो. त्यामध्ये समाजातील प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा भाव नसतो. त्यातूनच भेद निर्माण होत असून संगीत विभागले जात आहे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सदानंद मेनन, मकरंद साठे आदी या वेळी उपस्थित होते.
‘सध्या देशात गायले जाणारे शास्त्रीय संगीत हे अभिजात किंवा पुरातन नसून ते गेल्या काही वर्षांमधले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे ते संगीत नाही. त्या वेळी संगीताची विभागणी झालेली नव्हती. अभिजात संगीताचे पुजारी म्हणवून एक विशिष्ट वर्ग त्या संगीताची जोपासना करून रसिकांची दाद मिळवण्याचा प्रयत्न करतो. रसिकांनी दिलेली दाद म्हणजेच कलाकार आपले सर्वस्व मानू लागले आहेत. कलाकार म्हणून त्यांना स्वतःचा आवाज गवसला आहे का,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘संगीताला धर्म, जात, पंथ नाही तरीही अनेक संगीतकारांद्वारे संगीताचा धर्म तयार केला जातो. शिष्यांनाही तसेच प्रशिक्षण दिले जाते आणि कला ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादीत राहते. अशा सगळ्या वातावरणात संगीताची मुक्तपणे सेवा करण्याची संधी कलाकारांना मिळते का, याचाही विचार कलाकारांनी करायला हवा,’ याकडे कृष्णा यांनी लक्ष वेधले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देव-देवतांच्या कथा आणि प्रियकर-प्रेयसीच्या कहाण्या मांडण्यासाठीच आजवर शास्त्रीय संगीताचा वापर झाला आहे. संगीत हे अूमूर्त स्वरुपाचे आहे. त्याची शास्त्रीय आणि सुगम अशी विभागणी होऊ शकत नाही. शास्त्रीय संगीताच्या आधारे सामाजिक, अर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले जाऊ शकते. परंतु, ही बाब शास्त्रीय संगीतकारांना न रुचल्याने देशात असे अभिनव प्रयोग होत नाहीत,’ अशी खंत कर्नाटकी संगीताचे गाढे अभ्यासक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी व्यक्त केली.
प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेत यंदा कृष्णा यांनी संगीताबद्दल आपले परखड विचार मांडत अभिजात संगीताचा आधार घेऊन संकुचित विचार करणाऱ्या संगीतकारांवर ताशेरे ओढले. अभिजात संगीताच्या नावाखाली शास्त्रीय संगीतकारांनी स्वतःभोवती एक चौकट निर्माण केली आहे. त्या चौकटीमुळे शास्त्रीय संगीतात एक विशिष्ट वर्ग केवळ समाविष्ट केला जातो. त्यामध्ये समाजातील प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा भाव नसतो. त्यातूनच भेद निर्माण होत असून संगीत विभागले जात आहे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सदानंद मेनन, मकरंद साठे आदी या वेळी उपस्थित होते.
‘सध्या देशात गायले जाणारे शास्त्रीय संगीत हे अभिजात किंवा पुरातन नसून ते गेल्या काही वर्षांमधले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे ते संगीत नाही. त्या वेळी संगीताची विभागणी झालेली नव्हती. अभिजात संगीताचे पुजारी म्हणवून एक विशिष्ट वर्ग त्या संगीताची जोपासना करून रसिकांची दाद मिळवण्याचा प्रयत्न करतो. रसिकांनी दिलेली दाद म्हणजेच कलाकार आपले सर्वस्व मानू लागले आहेत. कलाकार म्हणून त्यांना स्वतःचा आवाज गवसला आहे का,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘संगीताला धर्म, जात, पंथ नाही तरीही अनेक संगीतकारांद्वारे संगीताचा धर्म तयार केला जातो. शिष्यांनाही तसेच प्रशिक्षण दिले जाते आणि कला ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादीत राहते. अशा सगळ्या वातावरणात संगीताची मुक्तपणे सेवा करण्याची संधी कलाकारांना मिळते का, याचाही विचार कलाकारांनी करायला हवा,’ याकडे कृष्णा यांनी लक्ष वेधले.