माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचे प्रारूप चुकीचे असून, त्यामुळे देशातील तब्बल ३ कोटी ७६ लाख रोजगार नष्ट झाले आहेत. लघुउद्योग आणि बाजारपेठा नष्ट झाल्या आहेत. नोटाबंदी हा भाजपने केलेला शतकातला सर्वांत मोठा महाघोटाळा असून, काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल,’ असा दावा माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केला.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस, विधान परिषदेतील काँग्रेसचे उपनेते शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, अशोक मोहोळ, कमल व्यवहारे, संजय जगताप आदी उपस्थित होते.
आनंद शर्मा म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी जगासमोर जनतेच्या पैशाला काळे धन म्हणून हिणवले. ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेला ८६ टक्के पैसा काळा पैसा होता का? भारतीय अर्थव्यवस्था काळ्या पैशावर चालत होती का? राज्यसभेत जीएसटी विधेयक मंजूर करताना सर्वाधिक करपातळी १८ टक्के असावी, तसेच पेट्रोलियम पदार्थ, वीज, अल्कोहोल आणि रिअल इस्टेटला ‘जीएसटी’मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, विधेयक मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला. जीएसटी हा ‘वन नेशन वन टॅक्स’ नसून ‘वन नेशन सिक्स टॅक्स’ आहे.’
‘गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तरुण बंड करीत आहेत. मात्र, सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही संबोधले जात आहे. भाजप सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे नावही पनामा पेपर्समध्ये आले आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ता व संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना निशाणा केले जात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
-----------------------------------------------
‘हे गरिबांना हटविणारे सरकार’
‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी गरिबांना न्याय देण्यासाठी ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम राबविला. देशात २० कलमी योजनांची अंमलबजावणी केली. आज ‘गरिबी हटाव’चा नारा देणारे गरिबांनाच हटवित आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इंदिरा गांधींप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार असून, येत्या १३ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच, जानेवारीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनआक्रोश रॅली काढणार असून ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल विचारणार आहे,’ अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठविताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘कर्जमाफीच्या निर्णयानंतर अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. नोटाबंदीनंतर काळा पैसा गेला कुठे? उलट विजय मल्ल्याच देशातील पैसा घेऊन पसार झाला आहे. देशभरात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देश व राज्याची सूत्रे काँग्रेसच्या हाती आल्याशिवाय गरिबांचे कल्याण होणार नाही,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. गुरुदासपूर, नांदेड, परभणी, मालेगाव निवडणुकांनंतर बदलाचे वारे वाहत असून, आता सत्तेतून भाजपला पायउतार केल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
...
दानवेंचे विधान दुर्दैवी
‘आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या छातीत गोळी झाडणे चुकीचे आहे. त्याऐवजी पोलिस त्यांच्या पायावर गोळ्या झाडू शकत होते, हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी झालेली नाही. त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही,’ अशी खंत अशोक चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.
...
अशोक चव्हाणांनी घेतली सुरेश कलमाडींची भेट
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. कार्यक्रमापूर्वी कलमाडी हाउस येथे ही भेट झाली. सुरेश कलमाडी आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी अशोक चव्हाण कलमाडींच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचे प्रारूप चुकीचे असून, त्यामुळे देशातील तब्बल ३ कोटी ७६ लाख रोजगार नष्ट झाले आहेत. लघुउद्योग आणि बाजारपेठा नष्ट झाल्या आहेत. नोटाबंदी हा भाजपने केलेला शतकातला सर्वांत मोठा महाघोटाळा असून, काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल,’ असा दावा माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केला.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस, विधान परिषदेतील काँग्रेसचे उपनेते शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, अशोक मोहोळ, कमल व्यवहारे, संजय जगताप आदी उपस्थित होते.
आनंद शर्मा म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी जगासमोर जनतेच्या पैशाला काळे धन म्हणून हिणवले. ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेला ८६ टक्के पैसा काळा पैसा होता का? भारतीय अर्थव्यवस्था काळ्या पैशावर चालत होती का? राज्यसभेत जीएसटी विधेयक मंजूर करताना सर्वाधिक करपातळी १८ टक्के असावी, तसेच पेट्रोलियम पदार्थ, वीज, अल्कोहोल आणि रिअल इस्टेटला ‘जीएसटी’मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, विधेयक मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला. जीएसटी हा ‘वन नेशन वन टॅक्स’ नसून ‘वन नेशन सिक्स टॅक्स’ आहे.’
‘गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तरुण बंड करीत आहेत. मात्र, सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही संबोधले जात आहे. भाजप सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे नावही पनामा पेपर्समध्ये आले आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ता व संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना निशाणा केले जात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
-----------------------------------------------
‘हे गरिबांना हटविणारे सरकार’
‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी गरिबांना न्याय देण्यासाठी ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम राबविला. देशात २० कलमी योजनांची अंमलबजावणी केली. आज ‘गरिबी हटाव’चा नारा देणारे गरिबांनाच हटवित आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इंदिरा गांधींप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार असून, येत्या १३ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच, जानेवारीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनआक्रोश रॅली काढणार असून ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल विचारणार आहे,’ अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठविताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘कर्जमाफीच्या निर्णयानंतर अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. नोटाबंदीनंतर काळा पैसा गेला कुठे? उलट विजय मल्ल्याच देशातील पैसा घेऊन पसार झाला आहे. देशभरात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देश व राज्याची सूत्रे काँग्रेसच्या हाती आल्याशिवाय गरिबांचे कल्याण होणार नाही,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. गुरुदासपूर, नांदेड, परभणी, मालेगाव निवडणुकांनंतर बदलाचे वारे वाहत असून, आता सत्तेतून भाजपला पायउतार केल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
...
दानवेंचे विधान दुर्दैवी
‘आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या छातीत गोळी झाडणे चुकीचे आहे. त्याऐवजी पोलिस त्यांच्या पायावर गोळ्या झाडू शकत होते, हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी झालेली नाही. त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही,’ अशी खंत अशोक चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.
...
अशोक चव्हाणांनी घेतली सुरेश कलमाडींची भेट
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. कार्यक्रमापूर्वी कलमाडी हाउस येथे ही भेट झाली. सुरेश कलमाडी आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी अशोक चव्हाण कलमाडींच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.