टीम मटा
..............
संकलन : प्रसाद पानसे, हर्ष दुधे, श्रीकृष्ण कोल्हे, वंदना घोडेकर, योगेश बोराटे, मुस्तफा आतार, चैत्राली चांदोरकर, चिंतामणी पत्की, आदित्य तानवडे आणि कुलदीप जाधव.
..
सुटे पैसे उपलब्ध करा...
दहा, वीस रुपयाच्या तिकिटासाठी पाचशे रुपयाची नोट काढल्यावर आम्ही काय करणार? त्यात प्रवाशांना नकार दिल्यावर वादाची परिस्थिती निर्माण होते. त्यावर सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचा आदेश आहे, असा नियम आम्हाला सांगतात. आम्ही एवढे सुटे पैसे आम्ही कोठून देणार ?
सरकारने नोटा बंदीची घोषणा केली आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून नागरिक प्रवासासाठी त्या नोटांचा वापर करीत आहेत. ऐरवी देखील आम्ही सुट्या पैशांच्या अडचणींमुळे पाचशेच्या नोटा स्वीकारत नव्हतो. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांकडून पाचशेच्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले. पहिल्या चार दिवसांमध्ये आम्ही नकार दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, आता नागरिकांनी परिस्थितीचा स्वीकार केला आहे. तसेच, पहिल्या चार दिवसांच्या तुलनेत सुटे पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तशी परिस्थिती आता उदभवत नाही. दरम्यान, काही प्रमाणात व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. प्रवासी संख्या सुरुवातीच्या दिवसात काही प्रमाणात कमी झाली होती. आता पासधारकांची संख्या वाढली आहे.
एक कंडक्टर
...............
पाचशेची नोट चलनात आणा
केंद्र सरकारने १००० आणि ५०० च्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी, बँकांच्या निष्क्रियतेमुळे नोटांची कमतरता भासत आहे. गेल्या महिन्यात नाटकांची कामे करून आलेले सर्व पैसे बँकेत जमा केले होते. नंतर हे पैसे गावाकडे पाठवले आणि मग नोटाबंदीचा निर्णय झाला. अशावेळी आता कुटूंबीयांना त्या पैशांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकारने २००० रुपयांची नोट बाजारात आणली आहे. मात्र, कोणीही दुकानदार दोन हजाराची नोट घ्यायला तयार नाही. अशावेळी सु्ट्टे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी दिवसभर उभे राहण्याची वेळ येत आहे. मग, आपण काम कधी करायचे, असा प्रश्न पडला आहे. दिवसाप्रमाणे पगार काढला जातो. एक दिवस जर काम नाही केले तर, त्या दिवशीचा पगार मिळत नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर ५०० च्या नोटा काढायला हव्यात, तरच दोन हजार रुपयांच्या नोटा चालतील, पण तसे झालेले नाही. ग्रामीण भागातील लोक यामुळेच त्रस्त आहेत. रोजच्या व्यवहारांसाठी पैसे कुठून आणायचे अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.
राम धावारे, बॅकस्टेज कर्मचारी
----------------------------
चहा पिणार अन् दोन हजारांची नोट टेकवणार
नोटाबंदीमुळे व्यवसायावर २५ टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. काही लोकांकडे द्यायला पैसे नसल्याने त्यांनी हॉटेलमध्ये खाणे बंद केले आहे. अनेक जण हॉटेलमध्ये एक चहा घेतात आणि २ हजाराची नोट हातात टेकवतात, अशांना उरलेले सुट्टे पैसे कसे द्यायचे ही प्रमुख समस्या आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डची सुविधा हॉटेलात उपलब्ध असल्याने फारशी अडचण येत नाही. तरीही जोपर्यंत सरकारकडून ५०० च्या नोटा उपलब्ध केल्या जात नाहीत तोपर्यंत व्यवसाय सुरळीत होणार नाही. हॉटेलमध्ये येणारे नेहमीच्या ग्राहकांकडे बऱ्याचदा जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा असतात; त्यांच्याकडे रोख ऩसते. त्यांना रिकाम्या पोटी पाठवण्यापेक्षा आहेत त्या नोटा स्वीकारून व्यवसाय करावा लागतो. या नोटा बँकेमध्ये बदलून घेण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागतो. दिवसभर बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. हॉटेलचा व्यवसाय असल्याने दररोज भाजीपाला घेऊन यावा लागतो. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा रोख पैसे द्यावे लागतात. अशावेळी एवढी रोख रक्कम आणायची कुठून या बाबतीत शंका आहे.
दयानंद मूल्या, हॉटेल व्यावसायिक
काटकसरीची सवय लागली
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्या दिवशी पोलिस ठाण्याहून घरी निघालो होतो. घरी गेल्यानंतर हा निर्णय समजला. त्यावेळी माझ्याकडे शंभर रुपयांच्या तीन नोटा होत्या तर, पाचशेची एक नोट होती. घरी थोडे फार सुट्टे पैसे होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून खूपच काळजीने खर्च करण्यास सुरुवात केली. दिवसभरात चार ते पाच वेळा होणार चहासुद्धा आपोआप कमी झाला. या निर्णयामुळे बचतीची सवय लागली. असलेल्या सुट्ट्या पैशातून घरातील आवश्यक असलेल्या किरकोळ वस्तू खरेदी केल्या. ऑनलाइन रिचार्ज केले. मोठी खरेदी करायची असेल तर कार्ड पेमेन्टचा वापर केला. या निर्णयामुळे काही अडचणी आल्या. पण, हा निर्णय चांगला आहे. कामाची वेळ सकाळ पासून रात्रीपर्यंत असल्यामुळे आणि एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे पैसे काढणे शक्य झालेले नाही. हजार व पाचशे काही नोटा होत्या. त्या पोलिस आयुक्तालयात सुरु असलेल्या पोस्टाच्या काऊंटरवरून बदलून घेतल्या. त्यामुळे काही प्रमाणात सुट्टे पैसे आले आहेत. सुरुवातीला त्रास वाटला. पण, काही दिवस गेल्यानंतर सर्व सुरळित झाले, असे पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
एक पोलिस कर्मचारी
...
‘न भूतो न भविष्यति’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. जुन्या नोटांच्या बदल्यात पोस्ट आणि बँकेतून शंभरच्या नोटा देण्याचे जाहीर झाले. त्यानंतर पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियोजन केले. त्यानुसार मुख्य पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड आणि उप पोस्टमास्टर एल. डी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली १० नोव्हेंबरपासून चार काउंटर सुरू केले. गुरुवारी सकाळी सात वाजतापासून नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आणि तेव्हापासूनच त्यांची चिडचिड सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता माझी ड्युटी असणारे काउंटर सुरू झाले. तेथे एक महिला आली आणि म्हणाली, ‘अहो, दुधाला आणि भाजीपाल्याला पैसे नाही. पोस्टातून पैसे बदलवून देणार असल्याचे समजल्यावर आले.’ मी त्या महिलेला नोटा बदलवून दिल्या आणि मग दिवसभर अशाच प्रकारची किरकोळ कारणे घेऊन येणारे नागरिक अनुभवायला मिळाले.
एकावेळी रांगेत तीनशे ते साडेतीनशे नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. पहिल्या दोन दिवशी रांगेत महिलांची संख्या अधिक होती. घरी लग्न आहे, अशांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी एक काउंटर कार्यरत होते. ‘आमच्याकडे दोन दिनसांवर लग्न आहे, आता कसं होईल?’, ‘आमच्याकडे असणाऱ्या नोटा बदलून मिळतील का?, आमचे किती पैसे बदलून मिळतील ?’ अशा प्रश्नांचा भडिमार करीत होते. आम्ही नियमाप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसांत बहुतांश लोक हे निर्णयाच्या बाजूने असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून समजले. काही लोक ‘घ्या.. आले अच्छे दिन’,‘आता तर अजून अच्छे दिन येणार आहेत’ असे उपरोधिकपणे बोलत होते. ‘न भूतो न भविष्यति’ घडणारी ही घटना असल्याने मी ती कधीच विसरू शकणार नाही.
डी .ए. कोंढाळकर, पोस्टल असिस्टंट, जीपीओ
....
नोटाबंदी देशाच्या भल्यासाठीच
चलनातून पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा माझ्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सुट्या पैशांची अडचणही जाणवत आहे. तसेच, व्यवसायही कमी झाला. मात्र, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. देशाच्या हिताचा हा निर्णय असून, काही दिवस गैरसोय सहन करण्याची माझी तयारी आहे.
माझा व्यवसाय रोजंदारीचा असल्यासारखा आहे. वडापावची विक्री करायची आणि येईल ते पैसे दररोज बँकेत भरायचे. त्याच पैशातूनच घरही चालवायचे. त्यामुळे माझ्याजवळ रोख स्वरूपात जास्त रक्कम नव्हती. परिणामी, मला नोटा बदलण्याचा प्रश्न उदभवला नाही. संपूर्ण देशात सुट्या पैशांवरून व जुन्या नोटा बदलण्यासाठी सामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, हा त्रास सहन करण्याची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे देशाच्या भले होणार आहे. देशात खोट्या नोटांचे प्रमाण वाढले होते. देशाचा तोटा मोठ्या प्रमाणावर होत होता. या नोटांना चलनातून बाहेर काढणे आता शक्य झाले आहे.
कूर्मदास कदम, वडापाव विक्रेता
आवक घटली; मालही पडून
नोटाबंदीमुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. शेतमाल आणणारे शेतकरी आमच्याकडून पाचशे, हजारच्या नोटा घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मार्केट यार्डात बहुतांश व्यापाऱ्यांकडे उधारी वाढली आहे. जे चेक स्वीकारण्यास तयार आहेत, त्यांना आम्ही पेमेंट दिले. परंतु, सर्वच शेतकऱ्यांनी चेक न स्वीकारल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आमच्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून सुरुवातीला काही दिवस पाचशे, एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दाखविली. परंतु, केंद्र सरकारच्या नोटा स्वीकारण्याच्या नियमांबद्दल शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये समज गैरसमज झाले. शेतकरी, ग्राहकांकडे सुट्टे पैसे नसल्याने अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना देण्यासाठी आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ग्राहकांकडे आमच्या उधाऱ्या वाढल्या आहेत. त्यांना उधार माल देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वाहतूकदारही सुट्टे पैसे नसल्याने मार्केट यार्डात फळभाज्यांची कमी प्रमाणात आवक होत आहे. फळभाज्यांचा पडून राहात असून, आवक ३० ते ४० टटक्क्यांनी घटली आहे.
निखिल भुजबळ, फळभाज्यांचे व्यापारी
..................
असून अडचण नसून खोळंब
नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना पैसे देता येत नाहीत. शेतकरी पाचशे- एक हजाराच्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. ओळखीचे शेतकरी नोटा स्वीकारण्यास तयार होते. बाजारात पैसे नाही, मग रक्कम येणार कोठून येणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळांची आवक कमी झाली आहे. मात्र, जे शेतकरी फळे आणतात, त्यांना चांगला दर मिळत नाही. ज्या फळांना किलोसाठी १०० रुपये मिळत होते; त्यांना नोटाबंदीमुळे २० ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने नुकसान होत आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते आहे. त्यामुळे पाचशे एक हजार रुपयांच्या नोटा त्यांना दिल्या, तर जिल्हा बँक स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सुरुवातीला आम्ही व्यापाऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारत होतो. परंतु, त्या नोटा बँकेत भरल्यास पैसे काढता येत नव्हते. बँकेत पैसे असूनही आमची अडचण झाली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांत ४० टक्क्यांनी व्यापार घटला.
अरविंद मोरे, फळ व्यापारी
निर्णयाविरुद्ध एक चकार शब्दही नाही!
आठ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता ‘मेरे प्यारे देशवासियों’ या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला साद घातली आणि एका फटक्यात हजार/पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेने संपूर्ण देश खडबडून जागा झाला; किंबहुना रात्रभर झोपलाच नाही असे म्हटले तरी चालेल. नऊ तारखेला बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दहा तारखेला बँकेतला पहिला दिवस खूप गर्दीचा असणारा हे गृहितच धरले होते; पण प्रत्यक्षात ग्राहकांची त्सुनामी आल्याचा अनुभव आला.
बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे शाखेत कॅशियर म्हणून काम करताना सरासरी रोज दीडशे ग्राहक आणि ३० लाखांची उलाढाल होत असे. नोटाबंदीनंतर पहिले चार दिवस ग्राहकांचा अखंड ओघ वाहत होता. बँकांची व्यवहारासाठीची वेळ दोन तासांनी वाढवून संध्याकाळी सहापर्यंत करण्यात आली होती. परिणामी ग्राहकांची संख्या ९०० ते १००० पर्यंत वाढली (अर्थात, यात नोटा बदलून नेणारे २५० ते ३०० ग्राहक पहिले दोन दिवस होते) तर उलाढाल दीड ते दोन कोटीच्या आसपास पोहोचली.
बँकेची क्षेत्रीय प्रमुख महेंद्र कुमार गुप्ता यांनी शाखेला भेट देऊन प्रत्येकाचे अभिनंदन केले. शाखाधिकारी पाटील यांच्या टीमवर्क स्पिरिटलाही दाद दिली. उपस्थित ग्राहकांच्या संयम आणि शिस्तीचेही त्यांनी कौतुक केले. आज १० दिवसानंतर त्सुनामीची लाट ओसरल्याचा अनुभव येत आहे. ग्राहकांची अगतिकता, हतबलता व त्रासही लक्षणीयरित्या कमी झाल्याचे जाणवत आहे.
ग्राहकांचे हृदय पिळवटून टाकणारे असंख्य अनुभव आले. ‘सुशिला’ अशी सही करणाऱ्या महिलेचा अनुभव फारच विलक्षण होता. पैसे काढण्यासाठी ती रांगेत रोज उभी राहात होती. दुसऱ्या दिवशी तिचा नंबर आला, तेव्हा पैसे काढण्याची स्लिप न देता मुलीच्या लग्नाची पत्रिका तिने पुढे सरकवली आणि ‘साहेब, लग्नकार्य आहे.. कसे करू ?’ असा प्रश्न केला. मी उत्तरलो,‘ताई, मी तरी काय करू शकतो?’ दिलेले पैसे तिने घेतले अन् पदराने डोळे पुसत तिने काउंटर सोडले, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या पापण्याही नकळत ओलावल्या !
अशी किती घरे असतील आणि किती सुशिला असतील? असंख्य अडचणी, यातना सहन करूत रांगेत उभ्या राहणाऱ्या मंडळींमधे मोदी यांच्या निर्णयाला नावे ठेवणारा एकही ग्राहक आजवर आढळला नाही हे विशेष ! बँक कर्मचारी म्हणून माझे सेवेचे ४० वे वर्ष सुरू आहे. या वयात रोजच्या पाच ते सहापट काम करण्याची ऊर्जा, इच्छाशक्ती कोठून आली? माहिती नाही ! याचे उत्तर कदाचित् एक माणूस सलग अडीच वर्ष एकही सुट्टी न घेता रोज १६-१६ तास काम कसे काय करू शकतो ? या प्रश्नाच्या शब्दविरहित उत्तरात तर दडले नसेल ना?
बिंदुमाधव भुरे बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे
प्लास्टिकमनीमुळे थोडासा दिलासा
पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आम्ही कोकणात सहलीला जाण्यासाठी बाहेर पडलो. निघण्यापूर्वी बँकेतून गरजेपुरत्या शंभरच्या नोटा घेतल्या होत्या. पण त्यांचा वापर करण्याऐवजी आम्ही शक्यतो डेबिट- क्रेडिट कार्ड वापरण्यावरच भर दिला. सरकारने सध्या टोल बंद ठेवल्यामुळे प्रवासादरम्यान पैसे लागलेच नाहीत. पेट्रोल पंपावर कार्डने पैसे दिले. ऐन कोकणातील बहुतांश हॉटेलमध्येमध्ये आता कार्ड पेमेंट वापरले जाते. जेथे कार्ड नव्हते तिथे आम्ही संबंधितांच्या बँक खात्यांचा नंबर घेऊन ऑनलाइन पैसे जमा केले. मात्र, ऑनलाइन व्यवहाराबद्दल अनभिज्ज्ञ असलेल्या गावकऱ्यांची गैरसोय झाल्याचे बघायला मिळाले. पाचशे आणि एक हजारच्या नोटांबद्दल ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर त्यांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. पर्यटकांना मात्र गावातील हॉटेल व्यावसायिकांनी सहकार्य केले. गैरसोय टाळण्यासाठी अनेक पर्यटकांकडून विक्रेत्यांनी पाचशेच्या नोटा स्वीकारल्या. किरकोळ खरेदीच्या बाजारात काही ठिकाणी सुट्या पैशांवरून पर्यटकांचे वाद झाले, पण प्रमाण अत्यल्प होते. या निमित्ताने मोजके पैसे खिशात असतानाही प्लास्टिक मनीमुळे सहल सुखकर होऊ शकते, याचा अनुभव मिळाला.
शिल्पा दुनाखे
..............................
नियोजन केल्याने त्रास नाहीच
नोकरी करणाऱ्यांना रोजचा प्रवासाचा खर्च असतो. पण, गृहिणींना दूध, भाजीपाला आणि किरकोळ वस्तूंची खरेदी सोडल्यास रोज जास्त पैसे खर्च करायची वेळ येत नाही. सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर आमच्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीवाल्यांनी नेहमीच्या ग्राहकांना सहकार्य केले. शंभरची नोट आल्यावर एकदम सगळे पैसे दिले तरी चालतील, असे त्यांनी सांगितले. बहुतांश मध्यमवर्गीय महिन्याचा एकत्रित किराणा भरतात आणि एकत्रच पैसे देतात. त्यामुळे दररोज किरकोळ वस्तू सोडल्यास खूप खरेदी करण्याची वेळ येत नाही. अनेकांकडे दूधाचे पैसे देखील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देण्याची पद्धत असल्याने नोटांच्या तुटवड्यामुळे फारशी गैरसोय झाली नाही. अत्यावश्यक असलेल्या खरेदीसाठी बँकेतून मी तात्पुरते पैसे काढले आहेत आणि काही कामे पुढच्या महिन्यात करायचे ठरवले आहे. रोजंदारी वर्गातील महिलांची गैरसोय झाली असेल पण मध्यमवर्गात महिलांना फारसा त्रास झाला नसावा.
गीता परदेशी
..............
संकलन : प्रसाद पानसे, हर्ष दुधे, श्रीकृष्ण कोल्हे, वंदना घोडेकर, योगेश बोराटे, मुस्तफा आतार, चैत्राली चांदोरकर, चिंतामणी पत्की, आदित्य तानवडे आणि कुलदीप जाधव.
..
सुटे पैसे उपलब्ध करा...
दहा, वीस रुपयाच्या तिकिटासाठी पाचशे रुपयाची नोट काढल्यावर आम्ही काय करणार? त्यात प्रवाशांना नकार दिल्यावर वादाची परिस्थिती निर्माण होते. त्यावर सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचा आदेश आहे, असा नियम आम्हाला सांगतात. आम्ही एवढे सुटे पैसे आम्ही कोठून देणार ?
सरकारने नोटा बंदीची घोषणा केली आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून नागरिक प्रवासासाठी त्या नोटांचा वापर करीत आहेत. ऐरवी देखील आम्ही सुट्या पैशांच्या अडचणींमुळे पाचशेच्या नोटा स्वीकारत नव्हतो. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांकडून पाचशेच्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले. पहिल्या चार दिवसांमध्ये आम्ही नकार दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, आता नागरिकांनी परिस्थितीचा स्वीकार केला आहे. तसेच, पहिल्या चार दिवसांच्या तुलनेत सुटे पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तशी परिस्थिती आता उदभवत नाही. दरम्यान, काही प्रमाणात व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. प्रवासी संख्या सुरुवातीच्या दिवसात काही प्रमाणात कमी झाली होती. आता पासधारकांची संख्या वाढली आहे.
एक कंडक्टर
...............
पाचशेची नोट चलनात आणा
केंद्र सरकारने १००० आणि ५०० च्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी, बँकांच्या निष्क्रियतेमुळे नोटांची कमतरता भासत आहे. गेल्या महिन्यात नाटकांची कामे करून आलेले सर्व पैसे बँकेत जमा केले होते. नंतर हे पैसे गावाकडे पाठवले आणि मग नोटाबंदीचा निर्णय झाला. अशावेळी आता कुटूंबीयांना त्या पैशांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकारने २००० रुपयांची नोट बाजारात आणली आहे. मात्र, कोणीही दुकानदार दोन हजाराची नोट घ्यायला तयार नाही. अशावेळी सु्ट्टे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी दिवसभर उभे राहण्याची वेळ येत आहे. मग, आपण काम कधी करायचे, असा प्रश्न पडला आहे. दिवसाप्रमाणे पगार काढला जातो. एक दिवस जर काम नाही केले तर, त्या दिवशीचा पगार मिळत नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर ५०० च्या नोटा काढायला हव्यात, तरच दोन हजार रुपयांच्या नोटा चालतील, पण तसे झालेले नाही. ग्रामीण भागातील लोक यामुळेच त्रस्त आहेत. रोजच्या व्यवहारांसाठी पैसे कुठून आणायचे अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.
राम धावारे, बॅकस्टेज कर्मचारी
----------------------------
चहा पिणार अन् दोन हजारांची नोट टेकवणार
नोटाबंदीमुळे व्यवसायावर २५ टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. काही लोकांकडे द्यायला पैसे नसल्याने त्यांनी हॉटेलमध्ये खाणे बंद केले आहे. अनेक जण हॉटेलमध्ये एक चहा घेतात आणि २ हजाराची नोट हातात टेकवतात, अशांना उरलेले सुट्टे पैसे कसे द्यायचे ही प्रमुख समस्या आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डची सुविधा हॉटेलात उपलब्ध असल्याने फारशी अडचण येत नाही. तरीही जोपर्यंत सरकारकडून ५०० च्या नोटा उपलब्ध केल्या जात नाहीत तोपर्यंत व्यवसाय सुरळीत होणार नाही. हॉटेलमध्ये येणारे नेहमीच्या ग्राहकांकडे बऱ्याचदा जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा असतात; त्यांच्याकडे रोख ऩसते. त्यांना रिकाम्या पोटी पाठवण्यापेक्षा आहेत त्या नोटा स्वीकारून व्यवसाय करावा लागतो. या नोटा बँकेमध्ये बदलून घेण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागतो. दिवसभर बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. हॉटेलचा व्यवसाय असल्याने दररोज भाजीपाला घेऊन यावा लागतो. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा रोख पैसे द्यावे लागतात. अशावेळी एवढी रोख रक्कम आणायची कुठून या बाबतीत शंका आहे.
दयानंद मूल्या, हॉटेल व्यावसायिक
काटकसरीची सवय लागली
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्या दिवशी पोलिस ठाण्याहून घरी निघालो होतो. घरी गेल्यानंतर हा निर्णय समजला. त्यावेळी माझ्याकडे शंभर रुपयांच्या तीन नोटा होत्या तर, पाचशेची एक नोट होती. घरी थोडे फार सुट्टे पैसे होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून खूपच काळजीने खर्च करण्यास सुरुवात केली. दिवसभरात चार ते पाच वेळा होणार चहासुद्धा आपोआप कमी झाला. या निर्णयामुळे बचतीची सवय लागली. असलेल्या सुट्ट्या पैशातून घरातील आवश्यक असलेल्या किरकोळ वस्तू खरेदी केल्या. ऑनलाइन रिचार्ज केले. मोठी खरेदी करायची असेल तर कार्ड पेमेन्टचा वापर केला. या निर्णयामुळे काही अडचणी आल्या. पण, हा निर्णय चांगला आहे. कामाची वेळ सकाळ पासून रात्रीपर्यंत असल्यामुळे आणि एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे पैसे काढणे शक्य झालेले नाही. हजार व पाचशे काही नोटा होत्या. त्या पोलिस आयुक्तालयात सुरु असलेल्या पोस्टाच्या काऊंटरवरून बदलून घेतल्या. त्यामुळे काही प्रमाणात सुट्टे पैसे आले आहेत. सुरुवातीला त्रास वाटला. पण, काही दिवस गेल्यानंतर सर्व सुरळित झाले, असे पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
एक पोलिस कर्मचारी
...
‘न भूतो न भविष्यति’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. जुन्या नोटांच्या बदल्यात पोस्ट आणि बँकेतून शंभरच्या नोटा देण्याचे जाहीर झाले. त्यानंतर पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियोजन केले. त्यानुसार मुख्य पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड आणि उप पोस्टमास्टर एल. डी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली १० नोव्हेंबरपासून चार काउंटर सुरू केले. गुरुवारी सकाळी सात वाजतापासून नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आणि तेव्हापासूनच त्यांची चिडचिड सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता माझी ड्युटी असणारे काउंटर सुरू झाले. तेथे एक महिला आली आणि म्हणाली, ‘अहो, दुधाला आणि भाजीपाल्याला पैसे नाही. पोस्टातून पैसे बदलवून देणार असल्याचे समजल्यावर आले.’ मी त्या महिलेला नोटा बदलवून दिल्या आणि मग दिवसभर अशाच प्रकारची किरकोळ कारणे घेऊन येणारे नागरिक अनुभवायला मिळाले.
एकावेळी रांगेत तीनशे ते साडेतीनशे नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. पहिल्या दोन दिवशी रांगेत महिलांची संख्या अधिक होती. घरी लग्न आहे, अशांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी एक काउंटर कार्यरत होते. ‘आमच्याकडे दोन दिनसांवर लग्न आहे, आता कसं होईल?’, ‘आमच्याकडे असणाऱ्या नोटा बदलून मिळतील का?, आमचे किती पैसे बदलून मिळतील ?’ अशा प्रश्नांचा भडिमार करीत होते. आम्ही नियमाप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसांत बहुतांश लोक हे निर्णयाच्या बाजूने असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून समजले. काही लोक ‘घ्या.. आले अच्छे दिन’,‘आता तर अजून अच्छे दिन येणार आहेत’ असे उपरोधिकपणे बोलत होते. ‘न भूतो न भविष्यति’ घडणारी ही घटना असल्याने मी ती कधीच विसरू शकणार नाही.
डी .ए. कोंढाळकर, पोस्टल असिस्टंट, जीपीओ
....
नोटाबंदी देशाच्या भल्यासाठीच
चलनातून पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा माझ्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सुट्या पैशांची अडचणही जाणवत आहे. तसेच, व्यवसायही कमी झाला. मात्र, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. देशाच्या हिताचा हा निर्णय असून, काही दिवस गैरसोय सहन करण्याची माझी तयारी आहे.
माझा व्यवसाय रोजंदारीचा असल्यासारखा आहे. वडापावची विक्री करायची आणि येईल ते पैसे दररोज बँकेत भरायचे. त्याच पैशातूनच घरही चालवायचे. त्यामुळे माझ्याजवळ रोख स्वरूपात जास्त रक्कम नव्हती. परिणामी, मला नोटा बदलण्याचा प्रश्न उदभवला नाही. संपूर्ण देशात सुट्या पैशांवरून व जुन्या नोटा बदलण्यासाठी सामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, हा त्रास सहन करण्याची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे देशाच्या भले होणार आहे. देशात खोट्या नोटांचे प्रमाण वाढले होते. देशाचा तोटा मोठ्या प्रमाणावर होत होता. या नोटांना चलनातून बाहेर काढणे आता शक्य झाले आहे.
कूर्मदास कदम, वडापाव विक्रेता
आवक घटली; मालही पडून
नोटाबंदीमुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. शेतमाल आणणारे शेतकरी आमच्याकडून पाचशे, हजारच्या नोटा घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मार्केट यार्डात बहुतांश व्यापाऱ्यांकडे उधारी वाढली आहे. जे चेक स्वीकारण्यास तयार आहेत, त्यांना आम्ही पेमेंट दिले. परंतु, सर्वच शेतकऱ्यांनी चेक न स्वीकारल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आमच्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून सुरुवातीला काही दिवस पाचशे, एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दाखविली. परंतु, केंद्र सरकारच्या नोटा स्वीकारण्याच्या नियमांबद्दल शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये समज गैरसमज झाले. शेतकरी, ग्राहकांकडे सुट्टे पैसे नसल्याने अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना देण्यासाठी आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ग्राहकांकडे आमच्या उधाऱ्या वाढल्या आहेत. त्यांना उधार माल देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वाहतूकदारही सुट्टे पैसे नसल्याने मार्केट यार्डात फळभाज्यांची कमी प्रमाणात आवक होत आहे. फळभाज्यांचा पडून राहात असून, आवक ३० ते ४० टटक्क्यांनी घटली आहे.
निखिल भुजबळ, फळभाज्यांचे व्यापारी
..................
असून अडचण नसून खोळंब
नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना पैसे देता येत नाहीत. शेतकरी पाचशे- एक हजाराच्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. ओळखीचे शेतकरी नोटा स्वीकारण्यास तयार होते. बाजारात पैसे नाही, मग रक्कम येणार कोठून येणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळांची आवक कमी झाली आहे. मात्र, जे शेतकरी फळे आणतात, त्यांना चांगला दर मिळत नाही. ज्या फळांना किलोसाठी १०० रुपये मिळत होते; त्यांना नोटाबंदीमुळे २० ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने नुकसान होत आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते आहे. त्यामुळे पाचशे एक हजार रुपयांच्या नोटा त्यांना दिल्या, तर जिल्हा बँक स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सुरुवातीला आम्ही व्यापाऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारत होतो. परंतु, त्या नोटा बँकेत भरल्यास पैसे काढता येत नव्हते. बँकेत पैसे असूनही आमची अडचण झाली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांत ४० टक्क्यांनी व्यापार घटला.
अरविंद मोरे, फळ व्यापारी
निर्णयाविरुद्ध एक चकार शब्दही नाही!
आठ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता ‘मेरे प्यारे देशवासियों’ या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला साद घातली आणि एका फटक्यात हजार/पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेने संपूर्ण देश खडबडून जागा झाला; किंबहुना रात्रभर झोपलाच नाही असे म्हटले तरी चालेल. नऊ तारखेला बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दहा तारखेला बँकेतला पहिला दिवस खूप गर्दीचा असणारा हे गृहितच धरले होते; पण प्रत्यक्षात ग्राहकांची त्सुनामी आल्याचा अनुभव आला.
बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे शाखेत कॅशियर म्हणून काम करताना सरासरी रोज दीडशे ग्राहक आणि ३० लाखांची उलाढाल होत असे. नोटाबंदीनंतर पहिले चार दिवस ग्राहकांचा अखंड ओघ वाहत होता. बँकांची व्यवहारासाठीची वेळ दोन तासांनी वाढवून संध्याकाळी सहापर्यंत करण्यात आली होती. परिणामी ग्राहकांची संख्या ९०० ते १००० पर्यंत वाढली (अर्थात, यात नोटा बदलून नेणारे २५० ते ३०० ग्राहक पहिले दोन दिवस होते) तर उलाढाल दीड ते दोन कोटीच्या आसपास पोहोचली.
बँकेची क्षेत्रीय प्रमुख महेंद्र कुमार गुप्ता यांनी शाखेला भेट देऊन प्रत्येकाचे अभिनंदन केले. शाखाधिकारी पाटील यांच्या टीमवर्क स्पिरिटलाही दाद दिली. उपस्थित ग्राहकांच्या संयम आणि शिस्तीचेही त्यांनी कौतुक केले. आज १० दिवसानंतर त्सुनामीची लाट ओसरल्याचा अनुभव येत आहे. ग्राहकांची अगतिकता, हतबलता व त्रासही लक्षणीयरित्या कमी झाल्याचे जाणवत आहे.
ग्राहकांचे हृदय पिळवटून टाकणारे असंख्य अनुभव आले. ‘सुशिला’ अशी सही करणाऱ्या महिलेचा अनुभव फारच विलक्षण होता. पैसे काढण्यासाठी ती रांगेत रोज उभी राहात होती. दुसऱ्या दिवशी तिचा नंबर आला, तेव्हा पैसे काढण्याची स्लिप न देता मुलीच्या लग्नाची पत्रिका तिने पुढे सरकवली आणि ‘साहेब, लग्नकार्य आहे.. कसे करू ?’ असा प्रश्न केला. मी उत्तरलो,‘ताई, मी तरी काय करू शकतो?’ दिलेले पैसे तिने घेतले अन् पदराने डोळे पुसत तिने काउंटर सोडले, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या पापण्याही नकळत ओलावल्या !
अशी किती घरे असतील आणि किती सुशिला असतील? असंख्य अडचणी, यातना सहन करूत रांगेत उभ्या राहणाऱ्या मंडळींमधे मोदी यांच्या निर्णयाला नावे ठेवणारा एकही ग्राहक आजवर आढळला नाही हे विशेष ! बँक कर्मचारी म्हणून माझे सेवेचे ४० वे वर्ष सुरू आहे. या वयात रोजच्या पाच ते सहापट काम करण्याची ऊर्जा, इच्छाशक्ती कोठून आली? माहिती नाही ! याचे उत्तर कदाचित् एक माणूस सलग अडीच वर्ष एकही सुट्टी न घेता रोज १६-१६ तास काम कसे काय करू शकतो ? या प्रश्नाच्या शब्दविरहित उत्तरात तर दडले नसेल ना?
बिंदुमाधव भुरे बँक ऑफ बडोदा, पौड रोड, पुणे
प्लास्टिकमनीमुळे थोडासा दिलासा
पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आम्ही कोकणात सहलीला जाण्यासाठी बाहेर पडलो. निघण्यापूर्वी बँकेतून गरजेपुरत्या शंभरच्या नोटा घेतल्या होत्या. पण त्यांचा वापर करण्याऐवजी आम्ही शक्यतो डेबिट- क्रेडिट कार्ड वापरण्यावरच भर दिला. सरकारने सध्या टोल बंद ठेवल्यामुळे प्रवासादरम्यान पैसे लागलेच नाहीत. पेट्रोल पंपावर कार्डने पैसे दिले. ऐन कोकणातील बहुतांश हॉटेलमध्येमध्ये आता कार्ड पेमेंट वापरले जाते. जेथे कार्ड नव्हते तिथे आम्ही संबंधितांच्या बँक खात्यांचा नंबर घेऊन ऑनलाइन पैसे जमा केले. मात्र, ऑनलाइन व्यवहाराबद्दल अनभिज्ज्ञ असलेल्या गावकऱ्यांची गैरसोय झाल्याचे बघायला मिळाले. पाचशे आणि एक हजारच्या नोटांबद्दल ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर त्यांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. पर्यटकांना मात्र गावातील हॉटेल व्यावसायिकांनी सहकार्य केले. गैरसोय टाळण्यासाठी अनेक पर्यटकांकडून विक्रेत्यांनी पाचशेच्या नोटा स्वीकारल्या. किरकोळ खरेदीच्या बाजारात काही ठिकाणी सुट्या पैशांवरून पर्यटकांचे वाद झाले, पण प्रमाण अत्यल्प होते. या निमित्ताने मोजके पैसे खिशात असतानाही प्लास्टिक मनीमुळे सहल सुखकर होऊ शकते, याचा अनुभव मिळाला.
शिल्पा दुनाखे
..............................
नियोजन केल्याने त्रास नाहीच
नोकरी करणाऱ्यांना रोजचा प्रवासाचा खर्च असतो. पण, गृहिणींना दूध, भाजीपाला आणि किरकोळ वस्तूंची खरेदी सोडल्यास रोज जास्त पैसे खर्च करायची वेळ येत नाही. सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर आमच्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीवाल्यांनी नेहमीच्या ग्राहकांना सहकार्य केले. शंभरची नोट आल्यावर एकदम सगळे पैसे दिले तरी चालतील, असे त्यांनी सांगितले. बहुतांश मध्यमवर्गीय महिन्याचा एकत्रित किराणा भरतात आणि एकत्रच पैसे देतात. त्यामुळे दररोज किरकोळ वस्तू सोडल्यास खूप खरेदी करण्याची वेळ येत नाही. अनेकांकडे दूधाचे पैसे देखील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देण्याची पद्धत असल्याने नोटांच्या तुटवड्यामुळे फारशी गैरसोय झाली नाही. अत्यावश्यक असलेल्या खरेदीसाठी बँकेतून मी तात्पुरते पैसे काढले आहेत आणि काही कामे पुढच्या महिन्यात करायचे ठरवले आहे. रोजंदारी वर्गातील महिलांची गैरसोय झाली असेल पण मध्यमवर्गात महिलांना फारसा त्रास झाला नसावा.
गीता परदेशी