शब्दश्रीमंत लेखकाचे ‘काट्यावर पोट’
'झुलवा'कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले लेखक उत्तम बंडू तुपे आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगत आहेत. तुपे आणि त्यांची पत्नी जिजाबाई या दोघांनाही अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दैनंदिन खर्च आणि औषधोपचाराला तोकडी पेन्शन पुरत नसल्याने एके काळी शब्दांची श्रीमंती अनुभवणारा हा लेखक आज एकटा पडला आहे.
Maharashtra Times 8 Dec 2018, 6:59 am
उत्तम बंडू तुपे जगताहेत हलाखीत
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
'झुलवा'कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले लेखक उत्तम बंडू तुपे आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगत आहेत. तुपे आणि त्यांची पत्नी जिजाबाई या दोघांनाही अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दैनंदिन खर्च आणि औषधोपचाराला तोकडी पेन्शन पुरत नसल्याने एके काळी शब्दांची श्रीमंती अनुभवणारा हा लेखक आज एकटा पडला आहे. त्याकडे ना सरकारचे लक्ष आहे, ना कोणत्या साहित्य संस्थेचे. सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले तुपे सरकार आपली काही विचारपूस करेल, या भाबड्या आशेने आलेला दिवस रेटत आहेत...
पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडीजवळ मुळा-मुठा वसाहतीत लहानशा खोलीत तुपे वास्तव्यास आहेत. तुपे यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा बेरोजगार असून, लहान मुलाचा स्वतंत्र संसार आहे. वर्षभरापूर्वी तुपे यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यातून ते सावरत नाहीत, तोवर पत्नी जिजाबाई (वय ७५) यांनाही अर्धांगवायूचा झटका आला. साहित्यातून मिळालेला सर्व पैसा दोघांच्या उपचारावर खर्च झाला. तुपे यांना साधे चालण्यासाठीही खूप प्रयत्न करावे लागत असून, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. जिजाबाई यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली असून, त्यांनाही बोलता येत नाही. जीवनाचे दाहक वास्तव मांडणाऱ्या या लेखकालाही त्याच अनुभवातून जावे लागत असल्याने त्यांची अवस्था पाहून सामान्य माणसाचे मन हेलावत आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जन्मलेले तुपे रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात मोलमजुरी करून दिवस काढले. लेखागार विभागात शिपाई म्हणून नोकरीला लागले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. अल्पशिक्षित असूनही तुपे लिहू लागले. त्यांनी कादंबरी, कथा, नाटक आणि आत्मकथन प्रकारात पन्नासहून अधिक पुस्तकांतून भरीव अशी साहित्यनिर्मिती केली. त्यांचे 'काट्यावरची पोटं' हे आत्मचरित्र गाजले. त्याची दखल घेऊन सरकारने त्यांना पुरस्कार दिला. अनेक मानसन्मानाचे ते मानकरी ठरले; पण आयुष्याच्या उत्तरार्धातील संध्याछाया त्यांच्यासाठी 'काट्यावरचे पोट' घेऊन आली आहे.
उतारवयात मला आणि पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्याने आम्ही कोलमडलो आहोत. लेखनातून कमाविलेले पैसे दोघांच्या उपचारांवर खर्च झाले. सहा हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये कसे तरी भागवत आहोत. आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. सरकार किंवा दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिल्यास बरे होईल.
- उत्तम बंडू तुपे, लेखक
उत्तम बंडू तुपे यांची शब्दश्रीमंती
आंदण (लघुकथा संग्रह)
काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
इजाळ (कादंबरी )
कोबारा (लघुकथा संग्रह)
शेवंती (कादंबरी )
झुलवा (कादंबरी)
चिपाड (कादंबरी)
भस्म (कादंबरी)
---
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
'झुलवा'कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले लेखक उत्तम बंडू तुपे आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगत आहेत. तुपे आणि त्यांची पत्नी जिजाबाई या दोघांनाही अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दैनंदिन खर्च आणि औषधोपचाराला तोकडी पेन्शन पुरत नसल्याने एके काळी शब्दांची श्रीमंती अनुभवणारा हा लेखक आज एकटा पडला आहे. त्याकडे ना सरकारचे लक्ष आहे, ना कोणत्या साहित्य संस्थेचे. सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले तुपे सरकार आपली काही विचारपूस करेल, या भाबड्या आशेने आलेला दिवस रेटत आहेत...
पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडीजवळ मुळा-मुठा वसाहतीत लहानशा खोलीत तुपे वास्तव्यास आहेत. तुपे यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा बेरोजगार असून, लहान मुलाचा स्वतंत्र संसार आहे. वर्षभरापूर्वी तुपे यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यातून ते सावरत नाहीत, तोवर पत्नी जिजाबाई (वय ७५) यांनाही अर्धांगवायूचा झटका आला. साहित्यातून मिळालेला सर्व पैसा दोघांच्या उपचारावर खर्च झाला. तुपे यांना साधे चालण्यासाठीही खूप प्रयत्न करावे लागत असून, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. जिजाबाई यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली असून, त्यांनाही बोलता येत नाही. जीवनाचे दाहक वास्तव मांडणाऱ्या या लेखकालाही त्याच अनुभवातून जावे लागत असल्याने त्यांची अवस्था पाहून सामान्य माणसाचे मन हेलावत आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जन्मलेले तुपे रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात मोलमजुरी करून दिवस काढले. लेखागार विभागात शिपाई म्हणून नोकरीला लागले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. अल्पशिक्षित असूनही तुपे लिहू लागले. त्यांनी कादंबरी, कथा, नाटक आणि आत्मकथन प्रकारात पन्नासहून अधिक पुस्तकांतून भरीव अशी साहित्यनिर्मिती केली. त्यांचे 'काट्यावरची पोटं' हे आत्मचरित्र गाजले. त्याची दखल घेऊन सरकारने त्यांना पुरस्कार दिला. अनेक मानसन्मानाचे ते मानकरी ठरले; पण आयुष्याच्या उत्तरार्धातील संध्याछाया त्यांच्यासाठी 'काट्यावरचे पोट' घेऊन आली आहे.
उतारवयात मला आणि पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्याने आम्ही कोलमडलो आहोत. लेखनातून कमाविलेले पैसे दोघांच्या उपचारांवर खर्च झाले. सहा हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये कसे तरी भागवत आहोत. आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. सरकार किंवा दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिल्यास बरे होईल.
- उत्तम बंडू तुपे, लेखक
उत्तम बंडू तुपे यांची शब्दश्रीमंती
आंदण (लघुकथा संग्रह)
काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
इजाळ (कादंबरी )
कोबारा (लघुकथा संग्रह)
शेवंती (कादंबरी )
झुलवा (कादंबरी)
चिपाड (कादंबरी)
भस्म (कादंबरी)
---