अ‍ॅपशहर

राज्यात आता फिरती पोलिस ठाणी

मेनमटा विशेषराज्यात आता"फिरती पोलिस ठाणी - आठवड्यातून एक दिवस जाऊन तक्रारी सोडविणारKrishnaKolhe@timesgroup...

Maharashtra Times 12 Feb 2018, 4:40 am
आठवड्यातून एक दिवस जाऊन तक्रारी सोडविणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police


Krishna.Kolhe@timesgroup.com

ShrikrishnakMT

पुणे : अनेक नागरिक छोट्या तक्रारी, किरकोळ गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी पोलिसांकडे जात नाहीत; परंतु नंतर ही किरकोळ गुन्हेच मोठ्या वादाची कारणे ठरतात. तसेच, ग्रामीण भागात पोलिस ठाण्याची हद्द मोठी असते, त्यामुळे नागरिक पोलिसांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे गृह विभागाने नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारी सोडविण्यासाठी आता फिरते पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आठवड्यातून एकदा 'फिरते पोलिस ठाणे' पोलिस ठाण्यातील एक पथक विविध भागांत जाणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहे. तसेच, त्यांच्या तक्रारी सोडविणार आहेत. फिरत्या पोलिस ठाण्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

शहर व ग्रामीण भागात अनेक नागरिक छोट्या-मोठ्या तक्रारींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास इच्छुक नसतात. तर, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक पोलिसांपर्यंत पोहचू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पोलिस ठाण्याअंतर्गंत एक 'फिरते पोलिस ठाणे'असल्याचा त्याचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांना होणार आहे. त्याबरोबरच त्यांच्या तक्रारींबाबतची माहिती घेऊन गुन्हे दाखल करता येणार आहे. याबाबत कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी 'फिरती पोलिस ठाणी' सुरू करण्याचे आदेश सर्व पोलिस प्रमुखांना दिले आहेत.

प्रत्येक पोलिस ठाण्यांनी त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळातून पोलिस उपनिरीक्षक किंवा सहायक उपनिरीक्षक, तीन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करावे. पोलिस ठाण्याच्या दूरवरच्या भागात शासकीय एक वाहनाने भेट द्यावी. भेटीच्या ठिकाणी तंबू अथवा शामियाना उभारावा किंवा शाळा असेल तर त्या ठिकाणी एक दिवसाचे पोलिस ठाणे उभारावे. आठवड्यातून एकदा अशी भेट प्रत्येक भागाला द्यावी. फिरत्या पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे दैनंदिनी ठेवावी. मुख्य पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यामधील नोंदी दैनंदिनीमध्ये घ्याव्यात. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. अन्याय, अत्याचाराची तक्रार करताना कोणाची भीती असेल तर ती दूर करावी. फिरत्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून सहकार्य करावे, त्यांना आवश्यक ती मदत करावी. अदखल पात्र गुन्हे जागेवरच नोंदवून घ्यावेत. दखलपात्र गुन्हे नियमानुसार दाखल करावेत. मात्र, दखलपात्र गुन्ह्याची दखल जागेवर घ्यावी, अशा सूचना महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस-नागरिक सुसंवाद वाढवा

'फिरत्या पोलिस ठाण्याच्या माध्यमातून महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घ्याव्यात. गावातील जुने वाद, मतभेद, किरकोळ तक्रारी, हेवेदावे, गटा-गटांतील भांडणे याबाबत नागरिकांसमोर जाणून घेऊन त्याचा निपटारा करावा. प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद वाढवून सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. गुप्तमाहिती काढून गावा-गावातील अवैध धंदे, अंमली पदार्थ, अवैध दारू विक्री यावर कारवाई चालू आहे की नाही, याची माहिती काढावी. फिरत्या पोलिस ठाण्याच्या माध्यमातून जनता आणि पोलिस यांच्यात सुसंवाद वाढवून जवळीकता निर्माण करावी. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून दलाची प्रतिमा चांगली करा,' असे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज