पुणे: राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर शाळा व महाविद्यालयांतही हा निर्णय लागू करण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांच्या संघटनेने केली आहे.
पाच दिवसांचा आठवडा हा राज्य शासनाचा निर्णय राज्य कर्माचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. तो निर्णय शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना लागू करण्यात आलेला नाही. हा शिक्षकवर्गावर अन्याय असून विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ५ दिवसांचा आठवडा करणे गरजेचे आहे, असे नमूद करत शाळा-महाविद्यालयांतही दररोज कामाचा अर्धा तास वाढवून ५ दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 'फाइव्ह डे वीक'
मुख्यमंत्री होते आग्रही?
मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी आज पूर्ण झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. २९ फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी आग्रही होते व त्यामुळेच या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार
पाच दिवसांचा आठवडा हा राज्य शासनाचा निर्णय राज्य कर्माचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. तो निर्णय शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना लागू करण्यात आलेला नाही. हा शिक्षकवर्गावर अन्याय असून विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ५ दिवसांचा आठवडा करणे गरजेचे आहे, असे नमूद करत शाळा-महाविद्यालयांतही दररोज कामाचा अर्धा तास वाढवून ५ दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 'फाइव्ह डे वीक'
मुख्यमंत्री होते आग्रही?
मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी आज पूर्ण झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. २९ फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी आग्रही होते व त्यामुळेच या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार