‘एनएसडी’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कुमार यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘राज्यातील विद्यापीठांमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी विद्यापीठांशी बोलणी सुरू आहे. तसेच, संपूर्णपणे कौशल्यावर आधारित स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनीष कुमार यांनी बुधवारी दिली. त्याचप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करण्याविषयी तसेच शेतकऱ्यांना त्यापासून कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये यासाठी शॉर्ट टर्म कोर्स सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती देखील डॉ. कुमार यांनी दिली.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. डॉ. कुमार म्हणाले, ‘केंद्र सरकारची स्कील इंडिया ही योजना इतर राज्यांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इतर राज्यांच्या तुलनेत खासगी कंपन्यांचे सहकार्य चांगले मिळत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ही योजना राबविण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होते. राज्यातील विद्यार्थ्यांना स्कील इंडिया योजनेतून रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठांमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापण्यात येणार आहेत. ज्या विद्यापीठांमध्ये केंद्र सुरुवातीपासून असल्यास त्यांना अधिक भक्कम करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी स्किल युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा विचार आहे.’ ‘ग्रामीण भागात स्किल इंडिया योजनेचा अपेक्षेप्रमाणे अद्याप विस्तार झालेला नाही. त्यासाठी येत्या काही काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. त्यांच्यासाठी पूरक ठरणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अशा घटना थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी आणि कीटकनाशकांच्याबाबत शॉर्टटर्म अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खूप कमी कालावधींचे प्रशिक्षण राहणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे कोर्स सुरु करण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
..........
=विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी
‘एनएसडीसी’तर्फे स्किल इंडिया आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यापैकी स्किल इंडियाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या ५५ टक्के विद्यार्थ्यांना तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या ३५ ते ४० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये यामध्ये वाढ होणार आहे, अशी माहिती डॉ. मनीष कुमार यांनी दिली.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘राज्यातील विद्यापीठांमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी विद्यापीठांशी बोलणी सुरू आहे. तसेच, संपूर्णपणे कौशल्यावर आधारित स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनीष कुमार यांनी बुधवारी दिली. त्याचप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करण्याविषयी तसेच शेतकऱ्यांना त्यापासून कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये यासाठी शॉर्ट टर्म कोर्स सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती देखील डॉ. कुमार यांनी दिली.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. डॉ. कुमार म्हणाले, ‘केंद्र सरकारची स्कील इंडिया ही योजना इतर राज्यांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इतर राज्यांच्या तुलनेत खासगी कंपन्यांचे सहकार्य चांगले मिळत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ही योजना राबविण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होते. राज्यातील विद्यार्थ्यांना स्कील इंडिया योजनेतून रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठांमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापण्यात येणार आहेत. ज्या विद्यापीठांमध्ये केंद्र सुरुवातीपासून असल्यास त्यांना अधिक भक्कम करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी स्किल युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा विचार आहे.’ ‘ग्रामीण भागात स्किल इंडिया योजनेचा अपेक्षेप्रमाणे अद्याप विस्तार झालेला नाही. त्यासाठी येत्या काही काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. त्यांच्यासाठी पूरक ठरणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अशा घटना थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी आणि कीटकनाशकांच्याबाबत शॉर्टटर्म अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खूप कमी कालावधींचे प्रशिक्षण राहणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे कोर्स सुरु करण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
..........
=विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी
‘एनएसडीसी’तर्फे स्किल इंडिया आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यापैकी स्किल इंडियाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या ५५ टक्के विद्यार्थ्यांना तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या ३५ ते ४० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये यामध्ये वाढ होणार आहे, अशी माहिती डॉ. मनीष कुमार यांनी दिली.