पुणे : 'एचआयव्ही'चा संसर्गाचा धोका अधिक असलेले समलैंगिक संबंध ठेवणारे पुरुष (एमएसएम) अथवा तृतीयपंथीय व्यक्तींना (ट्रान्सजेंडर वूमन) एड्सचा संसर्ग रोखणाऱ्या अन्य उपायांसह आणखी एका गोळीचा आधार मिळण्याची शक्यता आहे. या गोळीमुळे 'एचआयव्ही'चा संसर्ग होण्यापासून रोखणे शक्य होण्याचा दावा केला जात असून, महाराष्ट्रासह पंजाबमध्ये त्याबाबत राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतर्फे (नारी) याबाबतचे संशोधन सुरू आहे.
देशातील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (नॅको); तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) भोसरी येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतर्फे (नारी) प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयसीएमआर-'नारी'च्या शास्त्रज्ञ (ग वर्ग) डॉ. सीमा सहाय यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.
'सामाजिकदृष्ट्या समलिंगी लैंगिक संबंध ठेवणे मान्य नाही. समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष आणि तृतीयपंथीय व्यक्ती यांच्यामध्ये 'एचआयव्ही'चे प्रमाण रोखणे मोठे आव्हान आहे. समलिंगी व्यक्तींना 'एचआयव्ही'च्या संसर्गापासून रोखण्यासाठी निरोधवापरासह सुरक्षेचा आणखी एक उपाय म्हणून 'पीआरईपी' (प्री-एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस) विषाणूप्रतिबंधक म्हणून दिली जाणारी ही गोळी उपयुक्त ठरणार आहे,' अशी माहिती 'नारी'चे संचालक आणि 'आयसीएमआर'च्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी दिली.
'ही गोळी प्रभावी असल्याचे यापूर्वीच्या जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. एचआयव्ही संसर्गाचा धोका असलेल्या समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष अथवा तृतीयपंथीय व्यक्तींना ही विशिष्ट स्वरूपाची गोळी तोंडावाटे देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाची ही गोळी 'एचआयव्ही'चा संसर्गाचा धोका असणाऱ्या समलिंगी व्यक्तींना देता येईल का याबाबत महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात संशोधन सुरू करण्यात आले आहे,' असे 'नारी'च्या शास्त्रज्ञ (ग वर्ग) डॉ. सीमा सहाय यांनी 'मटा'ला सांगितले.
'एचआयव्ही'चा संसर्ग झालेला नाही, पण धोका अधिक असलेल्या समलिंगी आणि तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये संशोधन करण्यामागील भूमिका डॉ. संपदा बांगर यांनी स्पष्ट केली. 'अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक असतो. समलिंगी व्यक्ती संबंध ठेवताना त्यांना पार्टनरला संसर्ग झाल्याची माहिती नसते. काही वेळा अनेक पार्टनर असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्या वेळी सुरक्षेचे उपाय म्हणून निरोधसारखे विविध पर्याय वापरले जात असताना आता दररोज ही एक गोळी नियमित घेतल्यास त्यामुळे अधिक सुरक्षितता मिळण्याचा संभव आहे. या संशोधन अभ्यासासाठी महाराष्ट्रामध्ये २२८; तसेच पंजाबमध्ये २१४ जणांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चारशे जणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार आहे,' असे डॉ. बांगर यांनी सांगितले.
देशातील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (नॅको); तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) भोसरी येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतर्फे (नारी) प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयसीएमआर-'नारी'च्या शास्त्रज्ञ (ग वर्ग) डॉ. सीमा सहाय यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.
'सामाजिकदृष्ट्या समलिंगी लैंगिक संबंध ठेवणे मान्य नाही. समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष आणि तृतीयपंथीय व्यक्ती यांच्यामध्ये 'एचआयव्ही'चे प्रमाण रोखणे मोठे आव्हान आहे. समलिंगी व्यक्तींना 'एचआयव्ही'च्या संसर्गापासून रोखण्यासाठी निरोधवापरासह सुरक्षेचा आणखी एक उपाय म्हणून 'पीआरईपी' (प्री-एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस) विषाणूप्रतिबंधक म्हणून दिली जाणारी ही गोळी उपयुक्त ठरणार आहे,' अशी माहिती 'नारी'चे संचालक आणि 'आयसीएमआर'च्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी दिली.
'ही गोळी प्रभावी असल्याचे यापूर्वीच्या जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. एचआयव्ही संसर्गाचा धोका असलेल्या समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष अथवा तृतीयपंथीय व्यक्तींना ही विशिष्ट स्वरूपाची गोळी तोंडावाटे देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाची ही गोळी 'एचआयव्ही'चा संसर्गाचा धोका असणाऱ्या समलिंगी व्यक्तींना देता येईल का याबाबत महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात संशोधन सुरू करण्यात आले आहे,' असे 'नारी'च्या शास्त्रज्ञ (ग वर्ग) डॉ. सीमा सहाय यांनी 'मटा'ला सांगितले.
'एचआयव्ही'चा संसर्ग झालेला नाही, पण धोका अधिक असलेल्या समलिंगी आणि तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये संशोधन करण्यामागील भूमिका डॉ. संपदा बांगर यांनी स्पष्ट केली. 'अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक असतो. समलिंगी व्यक्ती संबंध ठेवताना त्यांना पार्टनरला संसर्ग झाल्याची माहिती नसते. काही वेळा अनेक पार्टनर असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्या वेळी सुरक्षेचे उपाय म्हणून निरोधसारखे विविध पर्याय वापरले जात असताना आता दररोज ही एक गोळी नियमित घेतल्यास त्यामुळे अधिक सुरक्षितता मिळण्याचा संभव आहे. या संशोधन अभ्यासासाठी महाराष्ट्रामध्ये २२८; तसेच पंजाबमध्ये २१४ जणांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चारशे जणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार आहे,' असे डॉ. बांगर यांनी सांगितले.
हे संशोधन यशस्वी झाल्यास याचे निष्कर्ष भारतातील पीआरईपी वितरण कार्यक्रमासाठी मार्गदर्शक ठरू शकतील असा विश्वास आहे.