‘एनआयसी’ वेबसाइटचा पुन्हा तांत्रिक घोळ; रिक्षा परवान्याच्या अइपॉइंटमेंट रखडल्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना शुल्क भरलेल्या सुमारे चार ते पाच हजार अर्जदारांचे शुल्क ‘राष्ट्रीय इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ला (एनआयसी) मिळण्याऐवजी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘वाहन’ प्रणालीकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांना अद्याप अपॉइंटमेंट मिळालेली नाही.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नवीन रिक्षा परवान्यासाठीची अर्ज प्रक्रिया ३१ जुलैपासून सुरू झाली. वास्तविक, त्यापूर्वी एक महिना आधी ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, ऑनलाइन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी वेबसाइट करण्याचे ठरले. त्यानुसार ‘एनआयसी’कडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. ‘एनआयसी’ने महिन्यानंतर ते काम पूर्ण केले. यामध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अद्याप समस्यांची मालिका सुरूच आहे. परिवहनच्या वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना अर्जदारांनी शुल्क भरले होते. त्यापैकी अनेकांना पैसे भरल्याची पावती मिळू शकली नाही. ते पैसे परिवहनद्वारे ‘एनआयसी’कडे न जाता, आटीओच्या वाहन प्रणालीकडे वर्ग झाले. त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट मिळत नसल्याचे उघड झाले आहे. यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दुजोरा दिला आहे.
‘एनआयसी’ ते पैसे स्वतःकडे वर्ग करणार आहे. त्यानंतर हा प्रकार घडलेल्या अर्जदारांनी त्यांच्या अॅप्लिकेशन क्रमांकाद्वारे वेबसाइटवरून पुन्हा पैसे भरल्याची पावती घ्यावी. त्या वेळी त्यांना अपॉइंटमेंट मिळेल. यामध्ये कोणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांना अपॉइंटमेंट मिळेल, असेही सगरे यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात १५ हजार जणांनी रिक्षा परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ८०० अर्जदारांचे शुल्क भरले गेल्याचे दिसून आले आहे. उर्वरित चार हजार २०० जणांचे शुल्क ‘वाहन’वर गेले असण्याची शक्यता आहे, असे रिक्षा फेडरेशनच्या बापू भावे यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना शुल्क भरलेल्या सुमारे चार ते पाच हजार अर्जदारांचे शुल्क ‘राष्ट्रीय इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ला (एनआयसी) मिळण्याऐवजी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘वाहन’ प्रणालीकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांना अद्याप अपॉइंटमेंट मिळालेली नाही.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नवीन रिक्षा परवान्यासाठीची अर्ज प्रक्रिया ३१ जुलैपासून सुरू झाली. वास्तविक, त्यापूर्वी एक महिना आधी ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, ऑनलाइन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी वेबसाइट करण्याचे ठरले. त्यानुसार ‘एनआयसी’कडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. ‘एनआयसी’ने महिन्यानंतर ते काम पूर्ण केले. यामध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अद्याप समस्यांची मालिका सुरूच आहे. परिवहनच्या वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना अर्जदारांनी शुल्क भरले होते. त्यापैकी अनेकांना पैसे भरल्याची पावती मिळू शकली नाही. ते पैसे परिवहनद्वारे ‘एनआयसी’कडे न जाता, आटीओच्या वाहन प्रणालीकडे वर्ग झाले. त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट मिळत नसल्याचे उघड झाले आहे. यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दुजोरा दिला आहे.
‘एनआयसी’ ते पैसे स्वतःकडे वर्ग करणार आहे. त्यानंतर हा प्रकार घडलेल्या अर्जदारांनी त्यांच्या अॅप्लिकेशन क्रमांकाद्वारे वेबसाइटवरून पुन्हा पैसे भरल्याची पावती घ्यावी. त्या वेळी त्यांना अपॉइंटमेंट मिळेल. यामध्ये कोणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांना अपॉइंटमेंट मिळेल, असेही सगरे यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात १५ हजार जणांनी रिक्षा परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १० हजार ८०० अर्जदारांचे शुल्क भरले गेल्याचे दिसून आले आहे. उर्वरित चार हजार २०० जणांचे शुल्क ‘वाहन’वर गेले असण्याची शक्यता आहे, असे रिक्षा फेडरेशनच्या बापू भावे यांनी सांगितले.