अ‍ॅपशहर

विरोधकांकडून भरणेंवर टीकेची झोड

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महिनाभरापासून ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले असून, तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३८ हजार ३२०वर गेली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 26 Apr 2021, 5:20 pm
भवानीनगर : एकीकडे 'उजनी'तून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातून विरोधकांनी राज्यमंत्री आणि सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम opposition leader criticized to minister dattatray bharane over water of ujani dam
विरोधकांकडून भरणेंवर टीकेची झोड


विरोधक सोलापूरकरांचे हक्काचे पाणी पालकमंत्र्यांनी इंदापूरला पळवल्याचा आरोप करत आहेत. रविवारी भरणे यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. बार्शी येथे त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला. काही कार्यकर्त्यांनी भरणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध केला. 'सोलापूरकरांचे हक्काचे पाणी पळवल्याने भरणे यांचे पालकमंत्रिपद काढून घ्यावे,' अशी मागणी विरोधकांनी केली आहे. इंदापूर आणि अकलूजमधील काही जण पाण्याचा प्रश्न भडकावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 'सोलापुरचे पाणी इंदापूरला देण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधकांनी चुकीच्या आणि खोट्या अफवा उठवल्या आहेत. शेतकऱ्यांनी याकडे अजिबात लक्ष देऊ नये. सोलापूरच्या हक्काचा एक थेंबही इतर कुठेही वापरू दिला जाणार नाही. तसे झाल्यास मी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन,' अशा शब्दांत भरणे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज