म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यासाठी शेअर बाजारामध्ये घंटा वाजवून झालेला निनाद हा देशातील नागरी पुनरुत्थानाच्या नांदीचा आवाज ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. ‘शहरे ही इंजिन आहेत. महानगरपालिकांनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाचे प्रकल्प हाती घ्यावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत शेअर्स बाजारामध्ये कर्जरोखे नोंदणीचा शुभारंभ नायडू यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेअर्स बाजारामधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये बरोबर ९.१५ मिनिटांनी घंटा वाजवून कर्जरोख्यांची नोंदणी झाली. त्यानंतर नायडू बोलत होते. ‘मी देशात सर्वत्र फिरतो आहे. एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र ‘मिशन मोडी’चा जोरदार प्रसार होत आहे. मोडी म्हणजे नरेंद्र मोदी नसून ‘मेकिंग ऑफ डेव्हलमेंट इन इंडिया’ असा असून हे पारदर्शक विकासाचे मॉडेल आहे’, असे ते म्हणाले.
देशातील ५२ टक्के जनता ही शहरांमध्ये राहते. देशाच्या विकासदरात ६५ टक्के भाग हा शहरांचा आहे आणि यापुढे तो वाढत जाणार आहे. त्यामुळे शहरांचा विकास गरजेचा बनला आहे. नागरी विकासाची आव्हानरूपी संधी आपल्यासमोर आहे. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यात शहरेही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे, असे नायडू म्हणाले.
पालकमंत्री बापट यांनी पुण्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नायडू यांनी मोलाची मदत केली असल्याचे सांगत त्यांना पुण्यात सत्कार समारंभासाठी आमंत्रण दिले. पुण्याचे शहरीकरण हे ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याने पाणी, ड्रेनेज, वीज, वाहतूक या समस्या डोकेदुखी बनल्या आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यात आल्याने पुणेकर समाधानी असून ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. महापौर टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्या म्हणाल्या, विकासासाठी कर्जरोखे घेण्याची आजची ही घटना राखेतून फिनिक्स भरारी घेण्यासारखी आहे. पंतप्रधान मोदींच्या सूचनेला पुणे महानगरपालिकेने साथ देत कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेतला असून पुणे शहराला शुद्ध व समान पाणीपुरवठा करता येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.
... ही तर विन विन सिच्युएशन
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, ‘एक पाऊल मानवाचे ही मानव समुदायासाठी मोठी झेप असते, असे नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता. त्याने १९६९ साली चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. ती घटना आणि आजची घटना यांचे एक वेगळेच महत्त्व आहे. भांडवली बाजाराचा आवाका आणि पुणे महापालिकेने काढलेले २०० कोटींचे कर्जरोखे हे अत्यंत कमी असले, तरी महापालिकांनी प्रकल्पांसाठी निधी कसा गोळा करावा, यासाठी ते मार्गदर्शक ठरणार आहेत. यामुळे पालिकेची क्षमता सुदृढ होणार असून गुंतवणुकीच्याही संधी निर्माण होणार होतील. ही ‘विन विन सिच्युएशन’ आहे.’
वित्तमंत्री जेटलींचा व्हिडिओ संदेश
या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘व्हिडिओ’ मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी पुणेकर, पुणे महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त यांचे अभिनंदन केले. पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी देशातील किमान दहा शहरांनी कर्जरोखे उभारावेत, या मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्याने नवा इतिहास रचला आहे. इतर महापालिकांनीही त्या मार्गावर वाटचाल करावी, अशी सूचना त्यांनी केली.
हे वर्ष आर्थिक सुधारणेचे
गेल्या वर्षीच्या अखेरीस नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. या वर्षीच्या सुरुवातीलाच डिजिटल व्यवहारांवर भर देण्यात आल्याने ९१ लाख नवे करदाते निर्माण झाले. रेल्वे अंदाजपत्रक मुख्य अंदाजपत्रकाशी जोडले आहे. त्यानंतर एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होणार आहे. शेअरनिर्देशांक ३१ हजारांवर स्थिरावला आहे आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने कर्जरोखे उभारत विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे. देशाच्या इतिहासात २०१७ हे आर्थिक सुधारणांचे वर्ष ठरणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सांगितले.
हा तर ऐतिहासिक क्षण
कर्जरोख्यांसाठी ऑनलाइन बोलीची प्रक्रिया पूर्ण होताना सहा पट मागणी नोंदवण्यात आली. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण होता. पुणे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याबरोबरच ‘डिजिटल सिटी’ बनविण्यासाठी लागणाऱ्या फायबर ऑप्टिकल केबल डक्टच्या कामासाठी खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्री, ‘सेबी’, नगरविकास विभाग, ‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यांच्यासह सर्व गुंतवणूकदारांचे आयुक्त कुणाल कुमार यांनी आभार मानले.
पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यासाठी शेअर बाजारामध्ये घंटा वाजवून झालेला निनाद हा देशातील नागरी पुनरुत्थानाच्या नांदीचा आवाज ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. ‘शहरे ही इंजिन आहेत. महानगरपालिकांनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाचे प्रकल्प हाती घ्यावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत शेअर्स बाजारामध्ये कर्जरोखे नोंदणीचा शुभारंभ नायडू यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेअर्स बाजारामधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये बरोबर ९.१५ मिनिटांनी घंटा वाजवून कर्जरोख्यांची नोंदणी झाली. त्यानंतर नायडू बोलत होते. ‘मी देशात सर्वत्र फिरतो आहे. एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र ‘मिशन मोडी’चा जोरदार प्रसार होत आहे. मोडी म्हणजे नरेंद्र मोदी नसून ‘मेकिंग ऑफ डेव्हलमेंट इन इंडिया’ असा असून हे पारदर्शक विकासाचे मॉडेल आहे’, असे ते म्हणाले.
देशातील ५२ टक्के जनता ही शहरांमध्ये राहते. देशाच्या विकासदरात ६५ टक्के भाग हा शहरांचा आहे आणि यापुढे तो वाढत जाणार आहे. त्यामुळे शहरांचा विकास गरजेचा बनला आहे. नागरी विकासाची आव्हानरूपी संधी आपल्यासमोर आहे. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यात शहरेही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे, असे नायडू म्हणाले.
पालकमंत्री बापट यांनी पुण्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नायडू यांनी मोलाची मदत केली असल्याचे सांगत त्यांना पुण्यात सत्कार समारंभासाठी आमंत्रण दिले. पुण्याचे शहरीकरण हे ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याने पाणी, ड्रेनेज, वीज, वाहतूक या समस्या डोकेदुखी बनल्या आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यात आल्याने पुणेकर समाधानी असून ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. महापौर टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्या म्हणाल्या, विकासासाठी कर्जरोखे घेण्याची आजची ही घटना राखेतून फिनिक्स भरारी घेण्यासारखी आहे. पंतप्रधान मोदींच्या सूचनेला पुणे महानगरपालिकेने साथ देत कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेतला असून पुणे शहराला शुद्ध व समान पाणीपुरवठा करता येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.
... ही तर विन विन सिच्युएशन
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, ‘एक पाऊल मानवाचे ही मानव समुदायासाठी मोठी झेप असते, असे नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता. त्याने १९६९ साली चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. ती घटना आणि आजची घटना यांचे एक वेगळेच महत्त्व आहे. भांडवली बाजाराचा आवाका आणि पुणे महापालिकेने काढलेले २०० कोटींचे कर्जरोखे हे अत्यंत कमी असले, तरी महापालिकांनी प्रकल्पांसाठी निधी कसा गोळा करावा, यासाठी ते मार्गदर्शक ठरणार आहेत. यामुळे पालिकेची क्षमता सुदृढ होणार असून गुंतवणुकीच्याही संधी निर्माण होणार होतील. ही ‘विन विन सिच्युएशन’ आहे.’
वित्तमंत्री जेटलींचा व्हिडिओ संदेश
या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘व्हिडिओ’ मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी पुणेकर, पुणे महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त यांचे अभिनंदन केले. पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी देशातील किमान दहा शहरांनी कर्जरोखे उभारावेत, या मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्याने नवा इतिहास रचला आहे. इतर महापालिकांनीही त्या मार्गावर वाटचाल करावी, अशी सूचना त्यांनी केली.
हे वर्ष आर्थिक सुधारणेचे
गेल्या वर्षीच्या अखेरीस नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. या वर्षीच्या सुरुवातीलाच डिजिटल व्यवहारांवर भर देण्यात आल्याने ९१ लाख नवे करदाते निर्माण झाले. रेल्वे अंदाजपत्रक मुख्य अंदाजपत्रकाशी जोडले आहे. त्यानंतर एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होणार आहे. शेअरनिर्देशांक ३१ हजारांवर स्थिरावला आहे आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने कर्जरोखे उभारत विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे. देशाच्या इतिहासात २०१७ हे आर्थिक सुधारणांचे वर्ष ठरणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सांगितले.
हा तर ऐतिहासिक क्षण
कर्जरोख्यांसाठी ऑनलाइन बोलीची प्रक्रिया पूर्ण होताना सहा पट मागणी नोंदवण्यात आली. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण होता. पुणे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याबरोबरच ‘डिजिटल सिटी’ बनविण्यासाठी लागणाऱ्या फायबर ऑप्टिकल केबल डक्टच्या कामासाठी खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्री, ‘सेबी’, नगरविकास विभाग, ‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यांच्यासह सर्व गुंतवणूकदारांचे आयुक्त कुणाल कुमार यांनी आभार मानले.