म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी खास निवडण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांना नेमकी काय योजना राबविण्यात येणार आहेत, प्रकल्प कुठले असणार आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होणार, याची माहिती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अनेक नगरसेवक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत अनभिज्ञ असल्याने सोमवारी होणाऱ्या बैठकीत या विकासकामांची माहिती देण्यात येणार आहे.
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांमध्ये क्षेत्रनिहाय विकासासाठी (एबीडी) औंध-बाणेर-बालेवाडीची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या आठ नगरसेवकांपैकी सात नगरसेवक हे भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे हे येथील आठवे नगरसेवक आहेत. भाजपचे सात म्हणजे प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकल, ज्योती कळमकर हे नगरसेवक पालिकेत औंध-बाणेर-बालेवाडीचे प्रतिनिधित्व करतात.
‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांना सुरुवात होऊन वर्ष उलटले आहेत. महापालिकेची निवडणूक होऊन पाच महिने झाले आहेत. स्थानिक नगरसेवकांना ‘स्मार्ट सिटी’तर्गंत नेमके कुठले प्रकल्प होणार, नेमका कसा विकास साधणार, अशी माहिती स्थानिक नगरसेवक बालवडकर यांनी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता औंध क्षेत्रिय कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी येथील दोन्ही प्रभागांतील आठ नगरसेवकांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना त्याची स्थानिक नगरसेवकांना पूर्ण माहिती मिळावी. नागरिकांबरोबर संयुक्त बैठका घेऊन या प्रकल्पांमध्ये स्थानिकांचाही सहभाग असावा. या ठिकाणी अर्धवट असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशी स्थानिक नगरसेवकांच्या मागण्या आहेत. यापूर्वी औंध येथे एकेरी रस्ता करून त्या ठिकाणी फूटपाथ विस्तृत करण्याचा प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे बंद करावा लागला. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना विश्वासात घेऊन विकासाची कामे सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी खास निवडण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांना नेमकी काय योजना राबविण्यात येणार आहेत, प्रकल्प कुठले असणार आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होणार, याची माहिती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अनेक नगरसेवक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत अनभिज्ञ असल्याने सोमवारी होणाऱ्या बैठकीत या विकासकामांची माहिती देण्यात येणार आहे.
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांमध्ये क्षेत्रनिहाय विकासासाठी (एबीडी) औंध-बाणेर-बालेवाडीची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या आठ नगरसेवकांपैकी सात नगरसेवक हे भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे हे येथील आठवे नगरसेवक आहेत. भाजपचे सात म्हणजे प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकल, ज्योती कळमकर हे नगरसेवक पालिकेत औंध-बाणेर-बालेवाडीचे प्रतिनिधित्व करतात.
‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांना सुरुवात होऊन वर्ष उलटले आहेत. महापालिकेची निवडणूक होऊन पाच महिने झाले आहेत. स्थानिक नगरसेवकांना ‘स्मार्ट सिटी’तर्गंत नेमके कुठले प्रकल्प होणार, नेमका कसा विकास साधणार, अशी माहिती स्थानिक नगरसेवक बालवडकर यांनी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता औंध क्षेत्रिय कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी येथील दोन्ही प्रभागांतील आठ नगरसेवकांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना त्याची स्थानिक नगरसेवकांना पूर्ण माहिती मिळावी. नागरिकांबरोबर संयुक्त बैठका घेऊन या प्रकल्पांमध्ये स्थानिकांचाही सहभाग असावा. या ठिकाणी अर्धवट असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशी स्थानिक नगरसेवकांच्या मागण्या आहेत. यापूर्वी औंध येथे एकेरी रस्ता करून त्या ठिकाणी फूटपाथ विस्तृत करण्याचा प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे बंद करावा लागला. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना विश्वासात घेऊन विकासाची कामे सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आहे.