म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ज्यांच्यामागे संघटना असते, पक्ष असतो (किमान टोळी असते) अशा व्यक्ती बिनधास्तपणे बोलतात. पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो, ते घणाघाती टीका करतात. एकेकट्या कवीने काय करायचे? स्वत:च आपल्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसून निघून जायचे का, की कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची?' अशा धीरगंभीर शब्दांत ख्यातनाम कवी वसंत आबाजी डहाके यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी विरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.
डहाके यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या या प्रतिक्रियेचे अनेकांनी समर्थन केले आहे. 'आवाज दाबला गेला तर आपण काहीच करू शकत नाही का,' अशी हतबल भावना व्यक्त होत आहे. डहाके यांच्या प्रतिक्रियेला पार्श्वभूमी आहे ती कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरून पेटलेल्या वादाची...
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' या कवितेतील एका ओळीवरून काही आदिवासी संघटनांनी मनवर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. विरोध होऊ लागल्याने त्यांची कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतली. त्यानंतर विद्यापीठावर टीकाही झाली. दरम्यान, मनवर यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याने लेखक आणि कवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर डहाके यांनी बोलण्यासाठी कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची का, असा सवाल केला आहे. याबाबत डहाकेंशी 'मटा'ने संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, 'मनवर यांची कविता वगळणे आणि त्यांना धमकावण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून मी हे लिहिले आहे. कवी, लेखक यांनी काय करायचे हा प्रश्न आहेच. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप तरी काही उत्तर आलेले नाही.'
मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना आणि विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात,' अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी आणि पत्रकार यांनी या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 'कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन आणि नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आहेत. आपण या प्रकारात लक्ष घालून महाराष्ट्रात भयमुक्त वातावरण निर्माण करावे,' असे कळकळीचे आवाहन साहित्यिकांनी केले आहे.
ज्यांच्यामागे संघटना असते, पक्ष असतो (किमान टोळी असते) अशा व्यक्ती बिनधास्तपणे बोलत असतात. पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो, ते घणाघाती टीका करतात. एकेकट्या कवीने काय करायचे असते? स्वत:च आपल्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसून निघून जायचे का? की कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची असते?
-वसंत आबाजी डहाके, कवी
'ज्यांच्यामागे संघटना असते, पक्ष असतो (किमान टोळी असते) अशा व्यक्ती बिनधास्तपणे बोलतात. पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो, ते घणाघाती टीका करतात. एकेकट्या कवीने काय करायचे? स्वत:च आपल्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसून निघून जायचे का, की कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची?' अशा धीरगंभीर शब्दांत ख्यातनाम कवी वसंत आबाजी डहाके यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी विरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.
डहाके यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या या प्रतिक्रियेचे अनेकांनी समर्थन केले आहे. 'आवाज दाबला गेला तर आपण काहीच करू शकत नाही का,' अशी हतबल भावना व्यक्त होत आहे. डहाके यांच्या प्रतिक्रियेला पार्श्वभूमी आहे ती कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरून पेटलेल्या वादाची...
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' या कवितेतील एका ओळीवरून काही आदिवासी संघटनांनी मनवर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. विरोध होऊ लागल्याने त्यांची कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतली. त्यानंतर विद्यापीठावर टीकाही झाली. दरम्यान, मनवर यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याने लेखक आणि कवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर डहाके यांनी बोलण्यासाठी कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची का, असा सवाल केला आहे. याबाबत डहाकेंशी 'मटा'ने संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, 'मनवर यांची कविता वगळणे आणि त्यांना धमकावण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून मी हे लिहिले आहे. कवी, लेखक यांनी काय करायचे हा प्रश्न आहेच. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप तरी काही उत्तर आलेले नाही.'
मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना आणि विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात,' अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी आणि पत्रकार यांनी या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 'कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन आणि नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आहेत. आपण या प्रकारात लक्ष घालून महाराष्ट्रात भयमुक्त वातावरण निर्माण करावे,' असे कळकळीचे आवाहन साहित्यिकांनी केले आहे.
ज्यांच्यामागे संघटना असते, पक्ष असतो (किमान टोळी असते) अशा व्यक्ती बिनधास्तपणे बोलत असतात. पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो, ते घणाघाती टीका करतात. एकेकट्या कवीने काय करायचे असते? स्वत:च आपल्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसून निघून जायचे का? की कवी, लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांनी खतरनाक टोळी स्थापन करायची असते?
-वसंत आबाजी डहाके, कवी