पुणे: कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील एकूण २३ विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या भातातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या सर्व विद्यार्थ्याना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ४ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
ही सर्व मुळे इयत्ता आठवीत शिकत होती. या मुलांना नेहमी प्रमाणे पोषण आहाराचा भात देण्यात आला. त्यानंतर या मुलांना उलट्या सुरू झाल्या. तसेच त्यांना चक्करही येऊ लागली. त्यानंतर त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनी दिली.
किरकोले यांनीही हा भात खाल्ला. त्यानंतर त्यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९ मुलांची प्रकृची चांगली असून ४ मुलं अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
ही सर्व मुळे इयत्ता आठवीत शिकत होती. या मुलांना नेहमी प्रमाणे पोषण आहाराचा भात देण्यात आला. त्यानंतर या मुलांना उलट्या सुरू झाल्या. तसेच त्यांना चक्करही येऊ लागली. त्यानंतर त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनी दिली.
किरकोले यांनीही हा भात खाल्ला. त्यानंतर त्यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९ मुलांची प्रकृची चांगली असून ४ मुलं अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.