नवरात्र हा भारतीय महिलांचा लोकप्रिय सण. नवरात्र साजरे करण्याच्या परंपरांमध्ये प्रांतानुसार वैविध्य आढळते. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्रात नवरात्राला विशेष महत्त्व असून, नऊ दिवस अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळते. राजस्थानातील माहेश्वरी समाजही दर वर्षी उत्साहात नवरात्र साजरे करतो. या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायासाठी ज्या भागात समाजाचे बांधव गेले, तेथील संस्कृती त्यांनी आत्मसात केली. आपल्या परंपरेचा बाज जपतानाच त्यांनी इतर समाजातील नवीन बदलही स्वीकारले आहे.
नवरात्र हा माहेश्वरी समाजातील महिलांचा लाडका आणि पवित्र उत्सव. या नऊ दिवसांत समाज बांधव आवर्जून त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जातात. महाराष्ट्राप्रमाणे नवरात्रात देवीची मनोभावे पूजा, सप्तशतीचे पाठ, स्तोत्रपठण, उपवास केले जातात. कन्यापूजन हीदेखील समान परंपरा या समाजात बघायला मिळते. देवीच्या रुपाने आलेल्या लहान मुलींचे महिला पूजन करतात.
माहेश्वरी समाज मूळचा राजस्थानचा असला, तरी व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील बांधव महाराष्ट्रात काही दशकांपूर्वीच वास्तव्यास आले. मध्यवर्ती पुण्यात कापडगंज; तसेच पेठांमध्ये राहणाऱ्या माहेश्वरी समाजातील बांधव तर आता पुणेकरच झाले आहेत. या बांधवांनी महाराष्ट्रीय संस्कृती आत्मसात केली असून, राजस्थानी आणि महाराष्ट्राच्या परंपरांचे सुंदर संगम त्यांनी केला आहे.
याबद्दल कापडगंज येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा भुतडा म्हणाल्या, 'राजस्थानात नवरात्राला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस आम्ही शक्तीचा उत्सव साजरा करतो. या काळात कुलदेवतेला मान असतो. आमच्याकडे प्रत्येकाची आडनावानुसार कुलदेवता निश्चित झाली आहे. त्यामुळे या उत्सवात अनेक लोक राजस्थानात जाऊन देवीचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांत आमच्या घरांमध्येही आता मराठी बांधवांप्रमाणे घट बसवायला सुरुवात झाली आहे. आमच्या भगिनी नऊ दिवस उपवासही करतात. कुमारी पूजन, देवीच्या रुपाने येणाऱ्या सवाष्णीचे पूजन आवर्जून केले जाते.'
अलीकडे आमच्या कुमारी पूजनाला सामाजिक बांधिलकीची किनार लाभली आहे. समाजाच्या महिलांनी आता महापालिकेच्या शाळांमधील मुलींचे कुमारी पूजन करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीदेखील आम्ही मध्यवर्ती पुण्यासह महापालिकेच्या विविध शाळांतील मुलींचे पूजन करून त्यांना शालेय साहित्य भेट म्हणून दिले. नवरात्र घरी येणाऱ्या सवाष्णीला आम्ही देवीचे रूप मानतो. त्यामुळे तिला सौभाग्याचे लेणे अर्पण करतो; याशिवाय समाज मंदिरांमध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. कुटुंबीय आवर्जून देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात, असे भुतडा यांनी सांगितले.
नवरात्र हा माहेश्वरी समाजातील महिलांचा लाडका आणि पवित्र उत्सव. या नऊ दिवसांत समाज बांधव आवर्जून त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जातात. महाराष्ट्राप्रमाणे नवरात्रात देवीची मनोभावे पूजा, सप्तशतीचे पाठ, स्तोत्रपठण, उपवास केले जातात. कन्यापूजन हीदेखील समान परंपरा या समाजात बघायला मिळते. देवीच्या रुपाने आलेल्या लहान मुलींचे महिला पूजन करतात.
माहेश्वरी समाज मूळचा राजस्थानचा असला, तरी व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील बांधव महाराष्ट्रात काही दशकांपूर्वीच वास्तव्यास आले. मध्यवर्ती पुण्यात कापडगंज; तसेच पेठांमध्ये राहणाऱ्या माहेश्वरी समाजातील बांधव तर आता पुणेकरच झाले आहेत. या बांधवांनी महाराष्ट्रीय संस्कृती आत्मसात केली असून, राजस्थानी आणि महाराष्ट्राच्या परंपरांचे सुंदर संगम त्यांनी केला आहे.
याबद्दल कापडगंज येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा भुतडा म्हणाल्या, 'राजस्थानात नवरात्राला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस आम्ही शक्तीचा उत्सव साजरा करतो. या काळात कुलदेवतेला मान असतो. आमच्याकडे प्रत्येकाची आडनावानुसार कुलदेवता निश्चित झाली आहे. त्यामुळे या उत्सवात अनेक लोक राजस्थानात जाऊन देवीचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांत आमच्या घरांमध्येही आता मराठी बांधवांप्रमाणे घट बसवायला सुरुवात झाली आहे. आमच्या भगिनी नऊ दिवस उपवासही करतात. कुमारी पूजन, देवीच्या रुपाने येणाऱ्या सवाष्णीचे पूजन आवर्जून केले जाते.'
अलीकडे आमच्या कुमारी पूजनाला सामाजिक बांधिलकीची किनार लाभली आहे. समाजाच्या महिलांनी आता महापालिकेच्या शाळांमधील मुलींचे कुमारी पूजन करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीदेखील आम्ही मध्यवर्ती पुण्यासह महापालिकेच्या विविध शाळांतील मुलींचे पूजन करून त्यांना शालेय साहित्य भेट म्हणून दिले. नवरात्र घरी येणाऱ्या सवाष्णीला आम्ही देवीचे रूप मानतो. त्यामुळे तिला सौभाग्याचे लेणे अर्पण करतो; याशिवाय समाज मंदिरांमध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. कुटुंबीय आवर्जून देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात, असे भुतडा यांनी सांगितले.