म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे', असे आवाहन करतानाच 'समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. सिंचन घोटाळ्यात कोणाचे हात अडकले आहेत, ते मुख्यमंत्री सांगत नाहीत. मराठा आरक्षणाचा अहवाल सादर झाल्यावर विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. मग, तडजोड आम्ही करत आहोत का तुम्ही? साटेलोटे कोणाचे कोणाशी आहे? असा सवालही त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित 'संविधान सन्मान सभे'त आंबेडकर बोलत होते. 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील, भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने, धनगर समाजाचे नेते विजय मोरे, हरिभाऊ भदे, प्रा. अंजली आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने, महिला राज्य संघटक रेखा ठाकूर, प्रा. किसन चव्हाण, आमदार बळीराम सिरस्कर, प्रा. हेमराज उईके, शंरराव लिंगे, अमित भुईगळ, आयोजक अतुल बहुले आदी या वेळी उपस्थित होते.
'देशातील वंचित विधानसभेत, संसदेत गेलाच पाहिजे', या भूमिकेचा पुनरुच्चार करून आंबेडकर म्हणाले, 'सत्तेत वाटेकरी नको, म्हणून जागावाटपाबाबत बोलायला तयार होत नाहीत. भाजपला मदत करता, असा प्रचार वंचित बहुजन आघाडीबाबत केला जातो. मात्र, काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आपणच घेतला, असे काँग्रेसला वाटते. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्यावर तुमचा खरा रंग बाहेर काढीन', असा टोलाही आंबेडकरांनी लगावला. तत्पूर्वी, बहुजन, मागासवर्गीय आणि मुस्लिम एकाच व्यासपीठावर आल्यास २०१९ ला वंचितांची सत्ता येईल, असे सांगताना इम्तियाज जलील यांनी 'अब की बार आंबेडकर सरकार' असा नारा दिला.
'पुन्हा दंगलींची भीती'
सध्या सरकारविरोधात वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अयोध्येचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. त्यातून पुन्हा दंगल होईल, अशी भीती आहे. या सरकारच्याा पायाखालची वाळू सरकली असून, दंगल, भयाचे वातावरण पसरवून निवडणुका जिंकण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. त्यामुळे दंगली होऊ नये, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर म्हणाले...
- सरकार सरड्यासारखे रंग बदलत असून, विकासावरून अयोध्येवर आले आहे.
- नोटाबंदीनंतर काळे धन कसे बदलून दिले?
- मनुवाद आणण्यासाठी लोकांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले जात आहे.
'जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे', असे आवाहन करतानाच 'समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. सिंचन घोटाळ्यात कोणाचे हात अडकले आहेत, ते मुख्यमंत्री सांगत नाहीत. मराठा आरक्षणाचा अहवाल सादर झाल्यावर विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. मग, तडजोड आम्ही करत आहोत का तुम्ही? साटेलोटे कोणाचे कोणाशी आहे? असा सवालही त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित 'संविधान सन्मान सभे'त आंबेडकर बोलत होते. 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील, भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने, धनगर समाजाचे नेते विजय मोरे, हरिभाऊ भदे, प्रा. अंजली आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने, महिला राज्य संघटक रेखा ठाकूर, प्रा. किसन चव्हाण, आमदार बळीराम सिरस्कर, प्रा. हेमराज उईके, शंरराव लिंगे, अमित भुईगळ, आयोजक अतुल बहुले आदी या वेळी उपस्थित होते.
'देशातील वंचित विधानसभेत, संसदेत गेलाच पाहिजे', या भूमिकेचा पुनरुच्चार करून आंबेडकर म्हणाले, 'सत्तेत वाटेकरी नको, म्हणून जागावाटपाबाबत बोलायला तयार होत नाहीत. भाजपला मदत करता, असा प्रचार वंचित बहुजन आघाडीबाबत केला जातो. मात्र, काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आपणच घेतला, असे काँग्रेसला वाटते. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्यावर तुमचा खरा रंग बाहेर काढीन', असा टोलाही आंबेडकरांनी लगावला. तत्पूर्वी, बहुजन, मागासवर्गीय आणि मुस्लिम एकाच व्यासपीठावर आल्यास २०१९ ला वंचितांची सत्ता येईल, असे सांगताना इम्तियाज जलील यांनी 'अब की बार आंबेडकर सरकार' असा नारा दिला.
'पुन्हा दंगलींची भीती'
सध्या सरकारविरोधात वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अयोध्येचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. त्यातून पुन्हा दंगल होईल, अशी भीती आहे. या सरकारच्याा पायाखालची वाळू सरकली असून, दंगल, भयाचे वातावरण पसरवून निवडणुका जिंकण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. त्यामुळे दंगली होऊ नये, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर म्हणाले...
- सरकार सरड्यासारखे रंग बदलत असून, विकासावरून अयोध्येवर आले आहे.
- नोटाबंदीनंतर काळे धन कसे बदलून दिले?
- मनुवाद आणण्यासाठी लोकांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले जात आहे.