पुणे: वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यूप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बनसोडचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता ही आत्महत्या ठरवून सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणाला जबाबदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मिथिलेश उमरकर हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. अरविंद बनसोड हे नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यांवर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून बनसोड यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
मुंबईतील रुग्णालयांतून अर्धा डझन मृतदेह गायब; भाजपनं यादीच दिली
"नागपूर येथील 'वंचित'चे कार्यकर्ते अरविंद बनसोडचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय. मिथिलेशचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर मिथिलेश राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. तसेच मिथिलेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. या प्रकरणात भादंविच्या कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही किरकोळ कलमे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करतानाच याप्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मी स्वतः नागपूर पोलीस अधीक्षकांना विनंती केली असून त्याला त्यांनी होकार दिला आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
गूड न्यूज... करोनाला पळवल्यावर स्टेडियममध्ये सामने पाहण्याची परवानगी
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. अरविंद बनसोड हे नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यांवर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून बनसोड यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
मुंबईतील रुग्णालयांतून अर्धा डझन मृतदेह गायब; भाजपनं यादीच दिली
"नागपूर येथील 'वंचित'चे कार्यकर्ते अरविंद बनसोडचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय. मिथिलेशचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर मिथिलेश राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. तसेच मिथिलेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. या प्रकरणात भादंविच्या कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही किरकोळ कलमे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करतानाच याप्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मी स्वतः नागपूर पोलीस अधीक्षकांना विनंती केली असून त्याला त्यांनी होकार दिला आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
गूड न्यूज... करोनाला पळवल्यावर स्टेडियममध्ये सामने पाहण्याची परवानगी