म. टा. प्रतिनिधी, पुणे
पूर्वनियोजित प्रवासासाठी पर्यटकांना सायंकाळी सहानंतर रेल्वे स्टेशन, विमान प्रवास करता येणार आहे. मात्र, पोलिसांना दाखवण्यासाठी प्रवासाचे तिकीट बाळगणे बंधनकारक असेल. सहलीला एकत्र निघाला असाल, तरी स्टेशनपर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या कुटुंबांनी एकत्र करू नये, असे आवाहन पर्यटन कंपनीचालकांनी केले आहे.
पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत लॉकडाउन लागू झाल्याने पुढील आठवडाभरात पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या पर्यटकांत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने सायंकाळी सहानंतर पीएमपी आणि रिक्षा बंद केल्यामुळे रेल्वे स्टेशन, विमानतळापर्यंत पोहोचायचे कसे, हा अनेकांसमोर प्रश्न आहे. परतीच्या वेळी घरी जाताना पोलिसांनी अडवल्यास काय करायचे, असा प्रश्न रिक्षाचालक पर्यटकांना विचारत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शंका विचारण्यासाठी ट्रॅव्हल, पर्यटन कंपन्यांचे फोन सतत खणखणत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत. रेल्वे, विमानसेवा थांबवलेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात ज्यांचे पर्यटनाचे नियोजन आहे. त्यांना प्रवास करण्यास काहीच अडथळा नाही. प्रशासनाच्या नियमानुसार ठरलेले तास आधी करोना चाचणीचा अहवाल आणि प्रवासाची कागदपत्रे असल्यास संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना इच्छित स्थळी प्रवास करता येणार आहे. शहरातील विविध पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवासातील या सवलतीची माहिती जाणून घेतली. पूर्वनियोजित सहलींमध्ये सहभागी पर्यटकांना प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.
संचारबंदीमध्ये वेगवेगळ्या शहरांतून विमान, रेल्वे पुण्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना; तसेच प्रवासासाठी शहराबाहेर जाणाऱ्या पर्यटकांना प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट असल्यास कोणी अडवण्याचा प्रश्न येत नाही.
- ऋषीकेश पुजारी,
विहार ट्रॅव्हल्स
संचारबंदीच्या वेळेत प्रवास टाळण्यासाठी काही पर्यटकांनी रात्री उशिरा विमान किंवा रेल्वे असली, तरी दुपारीच स्टेशन, विमानतळावर जाण्याचा पर्याय निवडला आहे. जे पर्यटक मोठ्या गटाने सहलीला जाणार आहेत, त्यांना स्टेशनपर्यंतचा प्रवास विभागून करण्याचा सल्ला दिला आहे.
- विश्वास केळकर,
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे
पोलिसांची भूमिका
करोनामुळे शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहादरम्यान लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत नागरिकांना सहकार्य केले जाईल. संवेदनशील दृष्टिकोनातून नागरिकांना मदत केली जाईल. रात्रीच्या वेळी प्रवास करून येणारे नागरिक अत्यावश्यक कामासाठी येत असल्यामुळे त्यांची अडवणूक केली जाणार नाही. याबाबत सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत. मात्र, विनाकारण फिरताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची भूमिका
विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्थानक अशा कोणत्याही ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना खासगी प्रवासी टॅक्सी किंवा रिक्षातून प्रवास करता येणार आहे. सायंकाळनंतर सुरू होणाऱ्या संचारबंदीच्या काळातही एसटी-रेल्वे स्टेशन, विमानतळावर जाण्यासाठी या सेवांना परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांची अडचण होणार नाही, असा दावा महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी केला.
पूर्वनियोजित प्रवासासाठी पर्यटकांना सायंकाळी सहानंतर रेल्वे स्टेशन, विमान प्रवास करता येणार आहे. मात्र, पोलिसांना दाखवण्यासाठी प्रवासाचे तिकीट बाळगणे बंधनकारक असेल. सहलीला एकत्र निघाला असाल, तरी स्टेशनपर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या कुटुंबांनी एकत्र करू नये, असे आवाहन पर्यटन कंपनीचालकांनी केले आहे.
पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत लॉकडाउन लागू झाल्याने पुढील आठवडाभरात पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या पर्यटकांत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने सायंकाळी सहानंतर पीएमपी आणि रिक्षा बंद केल्यामुळे रेल्वे स्टेशन, विमानतळापर्यंत पोहोचायचे कसे, हा अनेकांसमोर प्रश्न आहे. परतीच्या वेळी घरी जाताना पोलिसांनी अडवल्यास काय करायचे, असा प्रश्न रिक्षाचालक पर्यटकांना विचारत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शंका विचारण्यासाठी ट्रॅव्हल, पर्यटन कंपन्यांचे फोन सतत खणखणत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत. रेल्वे, विमानसेवा थांबवलेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात ज्यांचे पर्यटनाचे नियोजन आहे. त्यांना प्रवास करण्यास काहीच अडथळा नाही. प्रशासनाच्या नियमानुसार ठरलेले तास आधी करोना चाचणीचा अहवाल आणि प्रवासाची कागदपत्रे असल्यास संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना इच्छित स्थळी प्रवास करता येणार आहे. शहरातील विविध पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवासातील या सवलतीची माहिती जाणून घेतली. पूर्वनियोजित सहलींमध्ये सहभागी पर्यटकांना प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.
संचारबंदीमध्ये वेगवेगळ्या शहरांतून विमान, रेल्वे पुण्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना; तसेच प्रवासासाठी शहराबाहेर जाणाऱ्या पर्यटकांना प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट असल्यास कोणी अडवण्याचा प्रश्न येत नाही.
- ऋषीकेश पुजारी,
विहार ट्रॅव्हल्स
संचारबंदीच्या वेळेत प्रवास टाळण्यासाठी काही पर्यटकांनी रात्री उशिरा विमान किंवा रेल्वे असली, तरी दुपारीच स्टेशन, विमानतळावर जाण्याचा पर्याय निवडला आहे. जे पर्यटक मोठ्या गटाने सहलीला जाणार आहेत, त्यांना स्टेशनपर्यंतचा प्रवास विभागून करण्याचा सल्ला दिला आहे.
- विश्वास केळकर,
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे
पोलिसांची भूमिका
करोनामुळे शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहादरम्यान लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत नागरिकांना सहकार्य केले जाईल. संवेदनशील दृष्टिकोनातून नागरिकांना मदत केली जाईल. रात्रीच्या वेळी प्रवास करून येणारे नागरिक अत्यावश्यक कामासाठी येत असल्यामुळे त्यांची अडवणूक केली जाणार नाही. याबाबत सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत. मात्र, विनाकारण फिरताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची भूमिका
विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्थानक अशा कोणत्याही ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना खासगी प्रवासी टॅक्सी किंवा रिक्षातून प्रवास करता येणार आहे. सायंकाळनंतर सुरू होणाऱ्या संचारबंदीच्या काळातही एसटी-रेल्वे स्टेशन, विमानतळावर जाण्यासाठी या सेवांना परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांची अडचण होणार नाही, असा दावा महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी केला.