Vandana.Ghodekar@timesgroup.com
@VandanaaMT
पुणे : ग्राहक आयोगापुढे दाखल होणारे दावे मध्यस्थीद्वारे (मेडिएशन) निकाली काढण्याची तरतूद नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात करण्यात आली आहे. ग्राहक आयोगाबरोबर आता 'मेडिएशन सेल'ची निर्मितीही नवीन कायद्यानुसार करावी लागणार आहे. ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारीत नेमका वादाचा मुद्दा कोणता आहे, हे मध्यस्थीमुळे समजावून घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे दाखल तक्रारी जलदगतीने निकाली निघण्यास मदत होणार आहे.
नवीन ग्राहक संरक्षण कायदा, कलम ३७ नुसार मध्यस्थी कोणत्या टप्प्यावर केली जाऊ शकते, त्यासाठी काय नियम आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे. या कलमानुसार, आयोगापुढे तक्रार दाखल झाल्यानंतर, पहिल्या सुनावणीला किंवा त्यानंतर पुढील सुनावणीच्या टप्प्यांमध्ये तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढता येऊ शकते, असे आयोगाच्या लक्षात आले, तर संबंधित तक्रार 'मेडिएशन सेल'कडे पाठविता येणार आहे. दोन्ही पक्षांची तयारी असेल, तर संबंधित तक्रार मध्यस्थीनंतर समझोत्याने निकाली काढता येणार आहे. संबंधित तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढण्याची तयारी असल्याचे दोन्ही बाजूच्या पक्षांना लेखी स्वरूपात द्यावे लागणार आहे.
लेखी मान्यतेनंतर संबंधित तक्रार पाच दिवसांच्या आत 'मेडिएशन सेल'कडे पाठविण्यात यावी, असे या कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मध्यस्थीद्वारे तक्रार निकाली काढण्यास यश आले नाही, तर संबंधित आयोगाने तक्रारीची सुनावणी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रार मध्यस्थीद्वारे सर्वसंमतीने निकाली काढली गेल्यास त्याचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आयोगाकडून तक्रार निकाली काढण्यात आल्याचे शिक्कामोर्तब होईल. मात्र, तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढण्यात आल्यानंतर अपील करता येणार नाही.
वैकल्पिकरीत्या वाद निवारण होण्याची प्रक्रिया मध्यस्थ या सुविधेमुळे सुलभ होणार आहे. त्यामुळे नवीन ग्राहक कायद्यात 'मेडिएशन' सुविधेचा अंतर्भाव करण्याच्या तरतुदीचे स्वागत आहे. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना यामुळे त्यांचे नेमके काय म्हणणे आहे, हे मेडीएशनदरम्यान मांडता येईल. नवीन कायद्यात कलम ७४ ते ८१ यात 'मेडिएशन'ची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यास जलदगतीने न्याय मिळणे शक्य होणार आहे.
- अॅड. हृषीकेश गानू, ज्येष्ठ वकील
मध्यस्थी कधी होणार?
- तक्रार तडजोडयोग्य, सामंजस्याने, समझोत्याने निकाली काढण्यायोग्य असेल, तर...
- दोन्ही बाजूच्या पक्षांची तडजोडीची तयारी असेल, तर...
- तक्रार दाखल झाल्यानंतर सुनावणीदरम्यान मध्यस्थीने तक्रार निकाली निघण्याची शक्यता असेल, तर...
- मध्यस्थीसाठी तयार असल्याची दोन्ही बाजूच्या पक्षांची लेखी संमती असेल, तर...
- 'मेडिएशन'द्वारे निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीत पुन्हा अपील करता येणार नाही.
@VandanaaMT
पुणे : ग्राहक आयोगापुढे दाखल होणारे दावे मध्यस्थीद्वारे (मेडिएशन) निकाली काढण्याची तरतूद नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात करण्यात आली आहे. ग्राहक आयोगाबरोबर आता 'मेडिएशन सेल'ची निर्मितीही नवीन कायद्यानुसार करावी लागणार आहे. ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारीत नेमका वादाचा मुद्दा कोणता आहे, हे मध्यस्थीमुळे समजावून घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे दाखल तक्रारी जलदगतीने निकाली निघण्यास मदत होणार आहे.
नवीन ग्राहक संरक्षण कायदा, कलम ३७ नुसार मध्यस्थी कोणत्या टप्प्यावर केली जाऊ शकते, त्यासाठी काय नियम आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे. या कलमानुसार, आयोगापुढे तक्रार दाखल झाल्यानंतर, पहिल्या सुनावणीला किंवा त्यानंतर पुढील सुनावणीच्या टप्प्यांमध्ये तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढता येऊ शकते, असे आयोगाच्या लक्षात आले, तर संबंधित तक्रार 'मेडिएशन सेल'कडे पाठविता येणार आहे. दोन्ही पक्षांची तयारी असेल, तर संबंधित तक्रार मध्यस्थीनंतर समझोत्याने निकाली काढता येणार आहे. संबंधित तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढण्याची तयारी असल्याचे दोन्ही बाजूच्या पक्षांना लेखी स्वरूपात द्यावे लागणार आहे.
लेखी मान्यतेनंतर संबंधित तक्रार पाच दिवसांच्या आत 'मेडिएशन सेल'कडे पाठविण्यात यावी, असे या कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मध्यस्थीद्वारे तक्रार निकाली काढण्यास यश आले नाही, तर संबंधित आयोगाने तक्रारीची सुनावणी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रार मध्यस्थीद्वारे सर्वसंमतीने निकाली काढली गेल्यास त्याचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आयोगाकडून तक्रार निकाली काढण्यात आल्याचे शिक्कामोर्तब होईल. मात्र, तक्रार मध्यस्थीद्वारे निकाली काढण्यात आल्यानंतर अपील करता येणार नाही.
वैकल्पिकरीत्या वाद निवारण होण्याची प्रक्रिया मध्यस्थ या सुविधेमुळे सुलभ होणार आहे. त्यामुळे नवीन ग्राहक कायद्यात 'मेडिएशन' सुविधेचा अंतर्भाव करण्याच्या तरतुदीचे स्वागत आहे. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना यामुळे त्यांचे नेमके काय म्हणणे आहे, हे मेडीएशनदरम्यान मांडता येईल. नवीन कायद्यात कलम ७४ ते ८१ यात 'मेडिएशन'ची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यास जलदगतीने न्याय मिळणे शक्य होणार आहे.
- अॅड. हृषीकेश गानू, ज्येष्ठ वकील
मध्यस्थी कधी होणार?
- तक्रार तडजोडयोग्य, सामंजस्याने, समझोत्याने निकाली काढण्यायोग्य असेल, तर...
- दोन्ही बाजूच्या पक्षांची तडजोडीची तयारी असेल, तर...
- तक्रार दाखल झाल्यानंतर सुनावणीदरम्यान मध्यस्थीने तक्रार निकाली निघण्याची शक्यता असेल, तर...
- मध्यस्थीसाठी तयार असल्याची दोन्ही बाजूच्या पक्षांची लेखी संमती असेल, तर...
- 'मेडिएशन'द्वारे निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीत पुन्हा अपील करता येणार नाही.