पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात एका सहा महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खेड शहरातील वाडा रस्त्यावरून जात असताना आपल्या आईच्या कुशीत बसलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा अंत झाला आहे. ही घटना राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावर घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून टॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकी पडल्याने ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती खेड पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आजारी असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन निघालेल्या आई, वडिलांच्या दुचाकीला ट्रॅक्टरचा धक्का लागून अपघात झाला. यात सहा महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. आईच्या समोरच बाळाचा मृत्यू झाल्याने आईने हंबरडा फोडला. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे.
या घटनेमुळे स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अपघातानंतर अनेकांनी घटना पाहूनच डोक्याला हाथ लावला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळवरून तिथून निघून गेला आहे. अद्याप याबाबत तक्रार प्राप्त झाली नाही, पण घटनेची चौकशी करणार असल्याचे खेड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चिमुकल्याचा अंत झाल्याने आई वडिलांवर आभाळ कोसळले असून अशी घटना कुणासोबतही घडू नये अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार, आजारी असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन निघालेल्या आई, वडिलांच्या दुचाकीला ट्रॅक्टरचा धक्का लागून अपघात झाला. यात सहा महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. आईच्या समोरच बाळाचा मृत्यू झाल्याने आईने हंबरडा फोडला. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे.
या घटनेमुळे स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अपघातानंतर अनेकांनी घटना पाहूनच डोक्याला हाथ लावला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळवरून तिथून निघून गेला आहे. अद्याप याबाबत तक्रार प्राप्त झाली नाही, पण घटनेची चौकशी करणार असल्याचे खेड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चिमुकल्याचा अंत झाल्याने आई वडिलांवर आभाळ कोसळले असून अशी घटना कुणासोबतही घडू नये अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.