अ‍ॅपशहर

‘अध्यात्मातून घ्यावा ‌जीवनाचा शोध’

‘जीवन रहस्याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्माचा शोध घेण्यासाठी नीरव शांतता व एकांत आवश्यक असतो. सध्याच्या जगात हरवत चाललेला एकांत व एकाग्रता हिमालयात नक्की मिळू शकते. म्हणूनच हिमालय ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे,’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.

Maharashtra Times 23 May 2016, 3:00 am
पुणे : ‘जीवन रहस्याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्माचा शोध घेण्यासाठी नीरव शांतता व एकांत आवश्यक असतो. सध्याच्या जगात हरवत चाललेला एकांत व एकाग्रता हिमालयात नक्की मिळू शकते. म्हणूनच हिमालय ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे,’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune cultural event joshi
‘अध्यात्मातून घ्यावा ‌जीवनाचा शोध’

‘कर्दळीवन सेवा संघा’तर्फे प्रा. क्षितिज पाटुकले लिखित ‘स्वर्गारोहिणी- स्वर्गावर स्वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्तराखंड येथील जोशीमठचे डॉ. दयालसिंग बर्फाल यांच्या हस्ते झाले. प्रा. जोशी, ‘डेली हंट’च्या राष्ट्रीय प्रमुख अंजली देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. या पुस्तकाच्या ई-बुक, ऑडिओ बुक आणि मोबाइल अॅप्लिकेशनचेही या वेळी उद्‍‍घाटन करण्यात आले. दीपा भंडारे यांनी सूत्रसंचालन केले.
‘दिव्यत्वाचा शोध म्हणजे स्वर्गाची वाट. ही वाट शोधण्यासाठी आपल्याकडे प्रचंड मानसिक तयारी असणे आवश्यक असते. ही मानसिक तयारी करण्याचे काम आपल्याकडील दुर्मीळ अध्यात्मिक ग्रंथांनी केले आहे,’ असे प्रा. जोशी म्हणाले.
‘स्वर्गारोहिणी हे अत्यंत अलौकिक स्थान आहे. हिंदू धर्मात या स्थानाला आगळे महत्त्व आहे. एव्हरेस्टवर पोहोचल्यावरही मिळणार नाही, इतके मानसिक समाधान या शिखरावर लाभते,’ असे डॉ. बर्फाल यांनी सांगितले. ‘पौराणिक गोष्टी मौखिक रूपातच सांगितल्या जातात. तंत्रज्ञानाच्या साह्याने त्या मोबाइल अॅप्लिकेशनसारख्या माध्यमातून उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा होईल,’ असे देशमुख म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज