म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. चंदननगरमधील 'इंद्रमणी गृहरचना सोसायटी'त दोघांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला; तर या आरोपींचा माग काढून त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिस निरीक्षकावर त्यांनी गोळीबार केला. यामध्ये निरीक्षक जखमी झाले आहेत. तसेच, कोंढव्यातील येवलेवाडी येथे 'श्री गणेश ज्वेलर्स' येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यामध्येदेखील एक कर्मचारी जखमी असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
शांत व सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही काळात गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोरीच्या घटना वाढत आहेत. तसेच, महिला अत्याचाराचेही प्रकार घडत आहेत. दिवसाला आठ ते दहा वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. 'स्ट्रीट क्राइम'मध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. बुधवारी एकाच दिवशी घडलेल्या गोळीबाराच्या तीन घटनांनी नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या घटना वैयक्तिक स्वरूपाच्या असल्या, तरी त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. थेट आरोपींनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.
चंदनगर येथील गोळीबाराच्या घटनेत एकता ब्रिजेश भाटी (वय ३८, रा. इंद्रमणी गृहरचना सोसायटी, चंदननगर) या महिलेचा मृत्यू झाला. एकता या घरात असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. चंदननगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'सीसीटीव्ही फूटेज'ची तपासणी करून काही तासांतच आरोपींची माहिती काढली. त्यांचा माग घेऊन पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला. पोलिस तपासणी करीत असताना निरीक्षक गजानन पवार यांना आरोपी दिसले. त्यांनी बाजूला घेऊन झडती घेत असताना आरोपी शिवलाल राव याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये पवार जखमी झाले. यापैकी आरोपीला मालधक्का चौकात पकडण्यात आले. तर, दुसऱ्या आरोपीला 'झेलम एक्स्प्रेस'ने पळून जात असताना दौंड येथे लोहमार्ग पोलिसांनी त्याला पकडले.
चंदननगरपाठोपाठ दुपारी पावणेदोनच्या सुमारास येवलेवाडी येथील 'श्री गणेश ज्वेलर्स' दुकानात गोळीबार केल्याचा प्रकार घडला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात दुकानातील कामगार अमृत मेघावल (वय २७, रा. येवलेवाडी, कोंढवा) जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी अमृतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
मटा भूमिका
निवृत्त व्हावे, आणि शांत आयुष्य जगण्यासाठी पुण्यात यावे, असा एके काळी पुणे शहराचा लौकिक होता. मात्र, वाढत्या शहराबरोबरच वाढलेल्या गुन्हेगारीने या लौकिकाला तडा गेला आहे. पिस्तूल-रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे आणि गोळीबारांच्या घटनांचे पुण्यात पेव फुटले आहे. बुधवारी एकाच दिवशी झालेल्या गोळीबाराच्या तीन घटना याचेच निदर्शक आहेत. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून, सापळा रचून दोन्ही हल्लेखोरांना पकडले, याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. त्यामध्ये एक पोलिस निरीक्षकही जखमी झाले आहेत. या घटनांमधून पोलिसांची तपासाची क्षमता सिद्ध झाली; मात्र थेट पोलिसांवर गोळ्या झाडण्याची गुन्हेगारांची हिंमत होते, आणि शहराच्या कोणत्याही भागात गोळीबाराच्या घटना होतात, हे कायद्याचा धाक नसल्याचे निदर्शक आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाबरोबरच आपला वचकही पुन्हा मिळवावा आणि पुणेकरांना सुरक्षिततेची हमी द्यावी.
---
वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. चंदननगरमधील 'इंद्रमणी गृहरचना सोसायटी'त दोघांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला; तर या आरोपींचा माग काढून त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिस निरीक्षकावर त्यांनी गोळीबार केला. यामध्ये निरीक्षक जखमी झाले आहेत. तसेच, कोंढव्यातील येवलेवाडी येथे 'श्री गणेश ज्वेलर्स' येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यामध्येदेखील एक कर्मचारी जखमी असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
शांत व सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही काळात गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोरीच्या घटना वाढत आहेत. तसेच, महिला अत्याचाराचेही प्रकार घडत आहेत. दिवसाला आठ ते दहा वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. 'स्ट्रीट क्राइम'मध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. बुधवारी एकाच दिवशी घडलेल्या गोळीबाराच्या तीन घटनांनी नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या घटना वैयक्तिक स्वरूपाच्या असल्या, तरी त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. थेट आरोपींनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.
चंदनगर येथील गोळीबाराच्या घटनेत एकता ब्रिजेश भाटी (वय ३८, रा. इंद्रमणी गृहरचना सोसायटी, चंदननगर) या महिलेचा मृत्यू झाला. एकता या घरात असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. चंदननगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'सीसीटीव्ही फूटेज'ची तपासणी करून काही तासांतच आरोपींची माहिती काढली. त्यांचा माग घेऊन पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला. पोलिस तपासणी करीत असताना निरीक्षक गजानन पवार यांना आरोपी दिसले. त्यांनी बाजूला घेऊन झडती घेत असताना आरोपी शिवलाल राव याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये पवार जखमी झाले. यापैकी आरोपीला मालधक्का चौकात पकडण्यात आले. तर, दुसऱ्या आरोपीला 'झेलम एक्स्प्रेस'ने पळून जात असताना दौंड येथे लोहमार्ग पोलिसांनी त्याला पकडले.
चंदननगरपाठोपाठ दुपारी पावणेदोनच्या सुमारास येवलेवाडी येथील 'श्री गणेश ज्वेलर्स' दुकानात गोळीबार केल्याचा प्रकार घडला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात दुकानातील कामगार अमृत मेघावल (वय २७, रा. येवलेवाडी, कोंढवा) जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी अमृतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
मटा भूमिका
निवृत्त व्हावे, आणि शांत आयुष्य जगण्यासाठी पुण्यात यावे, असा एके काळी पुणे शहराचा लौकिक होता. मात्र, वाढत्या शहराबरोबरच वाढलेल्या गुन्हेगारीने या लौकिकाला तडा गेला आहे. पिस्तूल-रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे आणि गोळीबारांच्या घटनांचे पुण्यात पेव फुटले आहे. बुधवारी एकाच दिवशी झालेल्या गोळीबाराच्या तीन घटना याचेच निदर्शक आहेत. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून, सापळा रचून दोन्ही हल्लेखोरांना पकडले, याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. त्यामध्ये एक पोलिस निरीक्षकही जखमी झाले आहेत. या घटनांमधून पोलिसांची तपासाची क्षमता सिद्ध झाली; मात्र थेट पोलिसांवर गोळ्या झाडण्याची गुन्हेगारांची हिंमत होते, आणि शहराच्या कोणत्याही भागात गोळीबाराच्या घटना होतात, हे कायद्याचा धाक नसल्याचे निदर्शक आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाबरोबरच आपला वचकही पुन्हा मिळवावा आणि पुणेकरांना सुरक्षिततेची हमी द्यावी.
---