मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
आजच्या युगात 'दाता भवति वा न वा' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येत असला, तरी आपली कवचकुंडलं काढून देणाऱ्या महाभारतातील कर्णाचे अवतारही काही वेळा पाहायला मिळतात. पुण्यातील प्रकाश केळकर हे असेच आधुनिक कर्ण म्हणावे लागतील. कारण, या दानशूर आजोबांनी आपली सर्व संपत्ती, सुमारे १ कोटी रुपये देशाला अर्पण केले आहेत. मातृभूमीचं संरक्षण करणारे जवान आणि काळ्या मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं.
प्रकाश केळकर हे मूळचे अहमदनगरचे. टेक्सटाइल मिलना कापूस पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी अनेक वर्षं केला. निवृत्तीनंतर ते पत्नी दीपासह पुण्यात स्थायिक झाले. आज ते ७३ वर्षांचे आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करून मृत्यूपत्र तयार केलं. त्यात, मृत्यूपश्चात आपल्या संपत्तीतील ३० टक्के वाटा सैनिक आणि शेतकऱ्यांना, ३० टक्के पंतप्रधान साहाय्यता निधीला ३० टक्के वाटा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला आणि १० टक्के रक्कम पाच स्वयंसेवी संस्थांना द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
कामानिमित्त शेतकऱ्याचं आयुष्य मी अगदी जवळून पाहिलं. त्यांच्या व्यथा-वेदना-पिळवणूक-असहायता पाहून अस्वस्थ व्हायचो. तसंच, देशाच्या सैनिकांकडे होणारं दुर्लक्षही मनाला टोचायचं. ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत, दोन घास खाऊ शकतोय, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ४० कुटुंबांना मी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले होते. पण, तो खारीचा वाटा होता. त्यामुळे आता मृत्यूनंतर माझी संपूर्ण संपत्ती देशाला अर्पण करायचा निर्णय मी घेतला आहे, अशा हृदयस्पर्शी भावना प्रकाश केळकर यांनी व्यक्त केल्या. 'जय जवान, जय किसान' असा नारा आपण देतो. पण, देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि लष्करांच्या जवानांसाठी काम करणारं सरकार अजून तरी सत्तेत आलेलंच नाही, असं परखड मतही त्यांनी मांडलं.
जिवंत असेपर्यंत शेतकरी आणि सैनिकांना शक्य तेवढी मदत करण्याचा आणि मृत्यूनंतर सारं काही त्यांनाच देऊन टाकण्याचा केळकर काकांचा विचार खूपच उदात्त आहे. आपल्या या निर्णयामुळे आणखी काही लोक सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे आले तर हे दान सत्कारणी लागलं, असं मी मानेन, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.
आजच्या युगात 'दाता भवति वा न वा' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येत असला, तरी आपली कवचकुंडलं काढून देणाऱ्या महाभारतातील कर्णाचे अवतारही काही वेळा पाहायला मिळतात. पुण्यातील प्रकाश केळकर हे असेच आधुनिक कर्ण म्हणावे लागतील. कारण, या दानशूर आजोबांनी आपली सर्व संपत्ती, सुमारे १ कोटी रुपये देशाला अर्पण केले आहेत. मातृभूमीचं संरक्षण करणारे जवान आणि काळ्या मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं.
प्रकाश केळकर हे मूळचे अहमदनगरचे. टेक्सटाइल मिलना कापूस पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी अनेक वर्षं केला. निवृत्तीनंतर ते पत्नी दीपासह पुण्यात स्थायिक झाले. आज ते ७३ वर्षांचे आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करून मृत्यूपत्र तयार केलं. त्यात, मृत्यूपश्चात आपल्या संपत्तीतील ३० टक्के वाटा सैनिक आणि शेतकऱ्यांना, ३० टक्के पंतप्रधान साहाय्यता निधीला ३० टक्के वाटा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला आणि १० टक्के रक्कम पाच स्वयंसेवी संस्थांना द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
कामानिमित्त शेतकऱ्याचं आयुष्य मी अगदी जवळून पाहिलं. त्यांच्या व्यथा-वेदना-पिळवणूक-असहायता पाहून अस्वस्थ व्हायचो. तसंच, देशाच्या सैनिकांकडे होणारं दुर्लक्षही मनाला टोचायचं. ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत, दोन घास खाऊ शकतोय, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ४० कुटुंबांना मी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले होते. पण, तो खारीचा वाटा होता. त्यामुळे आता मृत्यूनंतर माझी संपूर्ण संपत्ती देशाला अर्पण करायचा निर्णय मी घेतला आहे, अशा हृदयस्पर्शी भावना प्रकाश केळकर यांनी व्यक्त केल्या. 'जय जवान, जय किसान' असा नारा आपण देतो. पण, देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि लष्करांच्या जवानांसाठी काम करणारं सरकार अजून तरी सत्तेत आलेलंच नाही, असं परखड मतही त्यांनी मांडलं.
जिवंत असेपर्यंत शेतकरी आणि सैनिकांना शक्य तेवढी मदत करण्याचा आणि मृत्यूनंतर सारं काही त्यांनाच देऊन टाकण्याचा केळकर काकांचा विचार खूपच उदात्त आहे. आपल्या या निर्णयामुळे आणखी काही लोक सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे आले तर हे दान सत्कारणी लागलं, असं मी मानेन, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.