अ‍ॅपशहर

'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'

नाल्यांमधील अतिक्रमणांवरून पुणे शहराच्या तहसीलदारांनी पुणे महापालिकेला पत्र पाठवली आहेत. त्यांनी अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सूचना केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 29 Sep 2020, 3:33 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आंबिल ओढ्यालगत अनेक अनधिकृत वास्तव्य करत असलेली कुटंबे आहेत. त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची मागणी पुणे शहर तहसीलदार कार्यालयाकडून पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune municipal corporation
'आंबिल ओढ्यालगत अनधिकृत वास्तव्याला असलेल्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'


नाल्यांमधील अतिक्रमणे काढून संरक्षण भिंती बांधण्याबाबत यापूर्वी पुणे शहर तहसीलदार कार्यालयाकडून पुणे महापालिकेला पत्र पाठविण्यात आली आहेत. आता अनधिकृत वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

याबाबत पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील त्या म्हणाल्या, ‘नाल्यांमधील अतिक्रमण काढणे, राडारोडा हटविणे आणि संरक्षक भिंती बांधणे याबाबत यापूर्वीच पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांना गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेला करण्यात आले आहे’

‘गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुणे शहर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रातील ४६५५ कुटुंबे बाधित झाली होती. त्यामध्ये टांगेवाला सोसायटी आणि परिसरातील सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रति कुटुंब १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे’ असे कोलते पाटील यांनी स्पष्ट केले.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

‘अधिकृत घरांचे नुकसान झाल्याने सानुग्रह अनुदानापोटी २४ कुटुंबांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे’ असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज