म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, त्यानंतर पोस्टल मतदानासाठी मतपत्रिका छापल्या जाणार आहेत. मतपत्रिका छापून त्या मतदारांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्याकडून त्या परत मिळणे, यासाठी अवघा पाच दिवसांचा कालावधी असल्याने पोस्टल मतदान करणाऱ्या मतदारांची मते वेळेत न आल्यास ‘बाद’ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांकडे अपील केले असल्यास अर्ज माघारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह वाटप झाल्यावर संबंधित मतपत्रिका ही छपाईसाठी पाठवावी लागणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकांची छपाई होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया केल्यानंतर १७ फेब्रुवारीला मतपत्रिका या पोस्टल मतदान करणाऱ्यांना पाठविल्या जाणार आहेत. त्या मतपत्रिका मतदारांना मिळाल्यानंतर परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामध्येही १९ फेब्रुवारीला रविवारची सुटी असल्याने मतपत्रिका वेळेत मिळण्यात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे काही मते ही मतमोजणीनंतर येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
प्रशिक्षणाच्या ठिकाणीच देणार मतपत्रिका
निवडणुकीच्या कामात असलेले सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान करता येत नसल्याने त्यांच्यासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था आहे. हे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून संबंधितांना प्रशिक्षणाच्या ठिकाणीच मतपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बारामती येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे १६, तर पंचायत समितीचे ३८ अर्ज बाद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम बुधवारी करण्यात आले. हवेली आणि शिरूर तालुक्यातील अर्जांच्या छाननीचे काम रात्री उशीरा पूर्ण झाले. जिल्हा परिषदेचे १६, तर पंचायत समितीचे ३८ अर्ज बाद झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ६९४ आणि पंचायत समितीसाठी एक हजार २१७ उमेदवार रिंगणात राहिले असल्याचे निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, त्यानंतर पोस्टल मतदानासाठी मतपत्रिका छापल्या जाणार आहेत. मतपत्रिका छापून त्या मतदारांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्याकडून त्या परत मिळणे, यासाठी अवघा पाच दिवसांचा कालावधी असल्याने पोस्टल मतदान करणाऱ्या मतदारांची मते वेळेत न आल्यास ‘बाद’ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांकडे अपील केले असल्यास अर्ज माघारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह वाटप झाल्यावर संबंधित मतपत्रिका ही छपाईसाठी पाठवावी लागणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकांची छपाई होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया केल्यानंतर १७ फेब्रुवारीला मतपत्रिका या पोस्टल मतदान करणाऱ्यांना पाठविल्या जाणार आहेत. त्या मतपत्रिका मतदारांना मिळाल्यानंतर परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामध्येही १९ फेब्रुवारीला रविवारची सुटी असल्याने मतपत्रिका वेळेत मिळण्यात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे काही मते ही मतमोजणीनंतर येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
प्रशिक्षणाच्या ठिकाणीच देणार मतपत्रिका
निवडणुकीच्या कामात असलेले सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान करता येत नसल्याने त्यांच्यासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था आहे. हे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून संबंधितांना प्रशिक्षणाच्या ठिकाणीच मतपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बारामती येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे १६, तर पंचायत समितीचे ३८ अर्ज बाद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम बुधवारी करण्यात आले. हवेली आणि शिरूर तालुक्यातील अर्जांच्या छाननीचे काम रात्री उशीरा पूर्ण झाले. जिल्हा परिषदेचे १६, तर पंचायत समितीचे ३८ अर्ज बाद झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ६९४ आणि पंचायत समितीसाठी एक हजार २१७ उमेदवार रिंगणात राहिले असल्याचे निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.