पुणे: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, मुंबई हायकोर्टानेही त्यांचा अर्ज फेटाळला होता.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज २२ जानेवारीला फेटाळला. त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने एकबोटे यांचा अर्ज शुक्रवारी हायकोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर आज सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर सणसवाडीत हिंसक जमावाने हल्ला केला. त्यात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या हिंसेमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनंतर हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा हल्ल्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देत संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. या दोन्ही आरोपींना पकडण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोपही अनेक संघटनांनी केला आहे.
दरम्यान, ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तेथे हजर नव्हतो. शिवाय कोरेगाव भीमा हल्ल्यात आपला सहभाग नाही असा दावा एकबोटे यांनी केला आहे.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज २२ जानेवारीला फेटाळला. त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने एकबोटे यांचा अर्ज शुक्रवारी हायकोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर आज सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर सणसवाडीत हिंसक जमावाने हल्ला केला. त्यात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या हिंसेमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनंतर हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा हल्ल्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देत संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. या दोन्ही आरोपींना पकडण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोपही अनेक संघटनांनी केला आहे.
दरम्यान, ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तेथे हजर नव्हतो. शिवाय कोरेगाव भीमा हल्ल्यात आपला सहभाग नाही असा दावा एकबोटे यांनी केला आहे.