म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मिशन शक्ती अंतर्गत भारताने शत्रुचा टेहाळणी करणारा उपग्रह नष्ट केल्याचा दावा करत पालकमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी उत्साहाच्या भरात बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीमत्तेचे खरे रूप दाखविले असून, अशा अज्ञानी उमेदवाराला पुणेकर कधीच निवडून देणार नाही,' अशी बोचरी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
पृथ्वीचे वातावरण कवच भेदून जमिनीपासून ३०० किलोमीटर अतंराळातील उपग्रहाचा वेध घेण्यात भारताला बुधवारी यश आले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागून भारताने तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' मोहीम फत्ते केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावात बापट यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये भारतावर टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाला नष्ट करण्यात आल्याचे लिहिण्यात आले होते. काँग्रेसने बापट यांच्या या पोस्टचा समाचार घेत पुणे हे विद्येचे माहेरघर असून, पुणेकरांनी नेहमीच विद्वान खासदाराला निवडून दिले आहे. ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ, ना. ग. गोरे, मोहन धारिया, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी पुण्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, बापट यांनी या प्रकारचे विधान करत पुण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. या वक्तव्यातून बापट यांनी आपल्या बुद्धीमत्तेचे खरे रूप दाखवून दिल्याची टीका बागवे यांनी केली आहे.
'मिशन शक्ती अंतर्गत भारताने शत्रुचा टेहाळणी करणारा उपग्रह नष्ट केल्याचा दावा करत पालकमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी उत्साहाच्या भरात बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीमत्तेचे खरे रूप दाखविले असून, अशा अज्ञानी उमेदवाराला पुणेकर कधीच निवडून देणार नाही,' अशी बोचरी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
पृथ्वीचे वातावरण कवच भेदून जमिनीपासून ३०० किलोमीटर अतंराळातील उपग्रहाचा वेध घेण्यात भारताला बुधवारी यश आले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागून भारताने तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' मोहीम फत्ते केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावात बापट यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये भारतावर टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाला नष्ट करण्यात आल्याचे लिहिण्यात आले होते. काँग्रेसने बापट यांच्या या पोस्टचा समाचार घेत पुणे हे विद्येचे माहेरघर असून, पुणेकरांनी नेहमीच विद्वान खासदाराला निवडून दिले आहे. ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ, ना. ग. गोरे, मोहन धारिया, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी पुण्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, बापट यांनी या प्रकारचे विधान करत पुण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. या वक्तव्यातून बापट यांनी आपल्या बुद्धीमत्तेचे खरे रूप दाखवून दिल्याची टीका बागवे यांनी केली आहे.