उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब-बार्शी रस्त्यावरील नाकाबंदी पॉइंटवर दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्यांना दंड केला जात आहे. करोना संकटात संसर्ग पसरू नये म्हणून हा नियम करण्यात आला आहे. मात्र, त्याचा इतरांसह शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. खरीपाचे पीक पावसाने वाया गेले तर, रब्बीला करोनामुळे भावच मिळाला नाही. अनेकांचा हातात आलेला घास गेला. आता दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पेरणीच्या तयारीला शेतकरी लागला आहे. सध्या दुचाकीशिवाय पर्याय नाही. काही साहित्य आणायचे असेल तर, डबलसीट जावेच लागते. जाताना आम्ही मास्क घालतो, हाताला सॅनिटायझर लावतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तरी डबलसीट जाण्यास परवानगी द्यावी. दोन वेळा दंड भरला तरी, खताच्या पिशवीची रक्कम जाते, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली.
करोनात दंडवसुलीचा शेतकऱ्यांना भुर्दंड
जिल्ह्यातील कळंब-बार्शी रस्त्यावरील नाकाबंदी पॉइंटवर दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्यांना दंड केला जात आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 4:00 am