Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
पुणे : वाढती गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले आणि नक्षलवाद्यांचा वावर वाढत असल्यामुळे शांत, सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख बदलत आहे. दिवसाला दोन ते तीन घरफोड्या घरफोडी, जबरी चोरी, वाहनांची विनाकारण तोडफोड अशा गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांत असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. गुन्हेगार पोलिसांवरच थेट गोळीबार करू लागल्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिस कमी पडत असल्याचे चित्र आहे.
पुणे शहर हे सर्वांत सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या ठिकाणी आलेला कोणताही व्यक्ती पुण्याचा रहिवासी होत असे. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार वेगाने झाला. शैक्षणिक व आयटी हब म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली. या ठिकाणी विद्यार्थी, परदेशी नागरिकांची संख्या वाढली. आयटीमध्ये काम करण्यासाठी अनेक इंजिनीअर या ठिकाणी आले. पुण्यात विस्तार वाढत असताना त्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत गेली. जमिनीला भाव आल्यामुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. खंडणीसारखे प्रकार सुरू झाले. पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
पुण्यात दिवसाला तीन घरफोड्या, तीन वाहनचोरीच्या घटना, वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत आहेत. रात्री रस्त्यावरून जाताना जबरी चोरीच्या घटनांचे सत्र सुरू आहेत. उन्हाळा सुरू झाला, की घर बंद करून बाहेर जाणे कठीण झाले आहे. बंद फ्लॅट फोडून चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. एका दिवशी दहा घरफोडीच्या घटना घडत आहेत. सोसायटीला सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नसल्याचे सांगून पोलिसांची जबाबदारी संपत नाही. घरफोडीतील काही गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले असले, तरी या घटना सुरूच आहेत.
महिला सुरक्षिततेसाठी कॉलेज परिसरात महिला पोलिसांची गस्त सुरू केली. तरीही, विनयभंगाच्या घटना सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ होत आहे. पिस्तुलाचा वापर करून गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी जोर धरत असून त्याची पूर्तता लवकरच होण्याची शक्यता आहे. पुण्यात जर्मन बेकरी, जंगली महाराज रोड आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोनंतर पुणे हे दहशतवाद्यांच्या नेहमीच रडावर राहिले आहे. तसेच, पुणे शहर व परिसरातून नक्षलवाद्यांचा वावर वाढल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणांना अलर्ट राहण्याची गरज आहे.
पुणे : वाढती गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले आणि नक्षलवाद्यांचा वावर वाढत असल्यामुळे शांत, सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख बदलत आहे. दिवसाला दोन ते तीन घरफोड्या घरफोडी, जबरी चोरी, वाहनांची विनाकारण तोडफोड अशा गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांत असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. गुन्हेगार पोलिसांवरच थेट गोळीबार करू लागल्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिस कमी पडत असल्याचे चित्र आहे.
पुणे शहर हे सर्वांत सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या ठिकाणी आलेला कोणताही व्यक्ती पुण्याचा रहिवासी होत असे. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार वेगाने झाला. शैक्षणिक व आयटी हब म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली. या ठिकाणी विद्यार्थी, परदेशी नागरिकांची संख्या वाढली. आयटीमध्ये काम करण्यासाठी अनेक इंजिनीअर या ठिकाणी आले. पुण्यात विस्तार वाढत असताना त्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत गेली. जमिनीला भाव आल्यामुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. खंडणीसारखे प्रकार सुरू झाले. पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
पुण्यात दिवसाला तीन घरफोड्या, तीन वाहनचोरीच्या घटना, वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत आहेत. रात्री रस्त्यावरून जाताना जबरी चोरीच्या घटनांचे सत्र सुरू आहेत. उन्हाळा सुरू झाला, की घर बंद करून बाहेर जाणे कठीण झाले आहे. बंद फ्लॅट फोडून चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. एका दिवशी दहा घरफोडीच्या घटना घडत आहेत. सोसायटीला सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नसल्याचे सांगून पोलिसांची जबाबदारी संपत नाही. घरफोडीतील काही गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले असले, तरी या घटना सुरूच आहेत.
महिला सुरक्षिततेसाठी कॉलेज परिसरात महिला पोलिसांची गस्त सुरू केली. तरीही, विनयभंगाच्या घटना सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ होत आहे. पिस्तुलाचा वापर करून गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी जोर धरत असून त्याची पूर्तता लवकरच होण्याची शक्यता आहे. पुण्यात जर्मन बेकरी, जंगली महाराज रोड आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोनंतर पुणे हे दहशतवाद्यांच्या नेहमीच रडावर राहिले आहे. तसेच, पुणे शहर व परिसरातून नक्षलवाद्यांचा वावर वाढल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणांना अलर्ट राहण्याची गरज आहे.