म. टा. प्रतिनिधी, पुणे
त्या जेव्हा चित्रपट संगीत गाऊ लागतात तेव्हा ते सहजतेने उपशास्त्रीय अंग घेते. त्यांच्या आवाजाचा पोत वेगळा, त्यांचा एक एक शब्द आणि शब्दामागून प्रकटलेला स्वर थेट काळजाला भिडतो. त्यांची गायकी आधुनिक संगीतातील अभिजातताच दर्शवते. रेखा भारद्वाज हे त्या प्रतिभावान गायकीचे नाव. मग त्या मैफल केवळ मैफल न उरता मनाशी मनाचा संवाद होऊन जाते. शनिवारची सायंकाळ अशीच अभिजात मनस्पर्शातून संवाद घडवणारी होती.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे रमणबागेच्या मैदानावर आयोजित वसंतोत्सवातून ही रम्य सायंकाळ रसिकांनी अनुभवली. रेखा भारद्वाज यांची ब्रह्मानंदी टाळी लावणारी गायकी आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे व प्रख्यात बासरीवादक रोणू मुजुमदार यांचा जुगलबंदीतून रंगलेला स्वराविष्कार रसिकांना स्वरचिंब करणारा ठरला.
रेखा भारद्वाज यांनी पहिल्या गीतापासून जी पकड घेतली ती शेवटपर्यंत. रसिकांचे रंजन न करता त्यांनी आपल्या ‘इश्का इश्का’ या ध्वनिमुद्रिकेतील रचना सादर केल्या. ‘तेरे इश्क मे, तेरी रजा मेरी रजा’, ‘इश्का इश्का, आज रंग है’ या त्यांच्या रचना संथगतीने झुळूझुळू वाहणाऱ्या जलधारेप्रमाणे भासत होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव ‘तेरे बिन नही लगता; दिल मेरा ढोलना’ ही नसरत फते अली खाँ यांची रचना, ये जवानी है दिवानी चित्रपटातील कबिरा हे गीत, वो जो अधुरिसी बात बाकी है हे बर्फीमधील गाणे सादर करून भारद्वाज यांनी आपल्या खास गायकीचा प्रत्यय रसिकांना दिला. भारद्वाज यांना साथीला असलेला प्रत्येक सहवादक स्वत:चे अस्तित्व राखून होता. राज सोडा यांनी सॅक्सोफोन, मयुर सरकार यांनी गिटारमधून अवीट गोडीच्या स्वराची ओंजळ रिती केली. मानस चौधरी (बेस), विनया नेटके (तबला), गिरीश विश्व (ढोलक),मुकुंद डोंगरे (ड्रम्स) यांची साथसंगत मैफल सजवणारी होती.
उत्तरार्धात राहुल देशपांडे, रोणू मुजुमदार यांनी स्वरांच्या लपंडावातून अनोखे विश्व उभे केले. राहुल यांच्या गळ्यातून व्यक्त होणारा प्रत्येक स्वर मुजुमदार आपल्या सफाईदार बासरीवादनात टिपत होते. राहुल यांच्या गळ्यातला स्वर ते त्याच स्वराचा बासरीतून प्रकटलेला स्ट्रोक संगीताच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देणारा होता. गणेश वंदना, अभोगी राग, केवळ स्वरांचा विहार, तराणा अशा रचनांतून स्वरांचा लपंडाव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. सावरे आयजयो व वसंतराव देशपांडे यांच्या या भवनातील गीत पुराणे या जुगलबंदीतून रंगलेल्या रचनेने रसिकांना तल्लीन केले. मैफलीची सांगता निर्गुणी भजनाने झाली. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) , निखिल फाटक ( तबला), सुखद मुंडे (पखवाज) व नारायण खिलारी (तानपुरा) यांची सुरेल साथसंगत स्वतंत्र स्वरतालविष्कार होता.
‘पुतळे तोडणे चुकीचे’
पुतळे तोडण्याचे प्रकार मला पटत नाहीत. तोडफोडीचे प्रकार चुकीचे आहेत. विचारांनी लढा देता यायला हवा. मला दहा वेळा विचारले तर मी हेच सांगेन,’ या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी पुतळाप्रकरणावरून टीकास्त्र सोडले. बैलांच्या शर्यतीवरून तमिळनाडूमध्ये पेटलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ही परंपरा सुरू राहिली पाहिजे. परंपरा संपवायच्याच असतील तर कबड्डी आणि गोविंदा पथकेही बंद करा. न्यायालयापेक्षा केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
..
‘जवानांचा लष्करात चांगला सांभाळ’
‘जवानांना चांगले खायला मिळत नाही, ही घटना तुरळक आहे. आपल्या मुलांपेक्षाही त्यांचा चांगला सांभाळ लष्कराकडून केला जातो,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी वसंतोत्सवात केली. गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या ३०६ जवानांच्या कुटुंबांना नाम फाउंडेशनतर्फे अडीच लाख देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत केली. हे काम थांबणारे नाही. जमलेल्या साठ कोटी रुपयांपैकी बरीच रक्कम शिल्लक आहे. त्यातून जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. पैसे लागले तर लोकांकडे हक्काने मागेन. आपण रसिक स्वरांनी न्हाहतो; पण तिकडे सीमेवर जवान बेसुरांशी लढतात म्हणून आपण सुरक्षित असतो,’ अशी टिप्पणी नाना यांनी केली. राजकीय पक्षांच्या चिन्हात संगीताची वाद्ये नाहीत ते बरे आहे. पक्षाच्या चिन्हात वाद्य असती तर निवडणुकीमुळे अडचण निर्माण झाली असती, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
त्या जेव्हा चित्रपट संगीत गाऊ लागतात तेव्हा ते सहजतेने उपशास्त्रीय अंग घेते. त्यांच्या आवाजाचा पोत वेगळा, त्यांचा एक एक शब्द आणि शब्दामागून प्रकटलेला स्वर थेट काळजाला भिडतो. त्यांची गायकी आधुनिक संगीतातील अभिजातताच दर्शवते. रेखा भारद्वाज हे त्या प्रतिभावान गायकीचे नाव. मग त्या मैफल केवळ मैफल न उरता मनाशी मनाचा संवाद होऊन जाते. शनिवारची सायंकाळ अशीच अभिजात मनस्पर्शातून संवाद घडवणारी होती.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे रमणबागेच्या मैदानावर आयोजित वसंतोत्सवातून ही रम्य सायंकाळ रसिकांनी अनुभवली. रेखा भारद्वाज यांची ब्रह्मानंदी टाळी लावणारी गायकी आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे व प्रख्यात बासरीवादक रोणू मुजुमदार यांचा जुगलबंदीतून रंगलेला स्वराविष्कार रसिकांना स्वरचिंब करणारा ठरला.
रेखा भारद्वाज यांनी पहिल्या गीतापासून जी पकड घेतली ती शेवटपर्यंत. रसिकांचे रंजन न करता त्यांनी आपल्या ‘इश्का इश्का’ या ध्वनिमुद्रिकेतील रचना सादर केल्या. ‘तेरे इश्क मे, तेरी रजा मेरी रजा’, ‘इश्का इश्का, आज रंग है’ या त्यांच्या रचना संथगतीने झुळूझुळू वाहणाऱ्या जलधारेप्रमाणे भासत होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव ‘तेरे बिन नही लगता; दिल मेरा ढोलना’ ही नसरत फते अली खाँ यांची रचना, ये जवानी है दिवानी चित्रपटातील कबिरा हे गीत, वो जो अधुरिसी बात बाकी है हे बर्फीमधील गाणे सादर करून भारद्वाज यांनी आपल्या खास गायकीचा प्रत्यय रसिकांना दिला. भारद्वाज यांना साथीला असलेला प्रत्येक सहवादक स्वत:चे अस्तित्व राखून होता. राज सोडा यांनी सॅक्सोफोन, मयुर सरकार यांनी गिटारमधून अवीट गोडीच्या स्वराची ओंजळ रिती केली. मानस चौधरी (बेस), विनया नेटके (तबला), गिरीश विश्व (ढोलक),मुकुंद डोंगरे (ड्रम्स) यांची साथसंगत मैफल सजवणारी होती.
उत्तरार्धात राहुल देशपांडे, रोणू मुजुमदार यांनी स्वरांच्या लपंडावातून अनोखे विश्व उभे केले. राहुल यांच्या गळ्यातून व्यक्त होणारा प्रत्येक स्वर मुजुमदार आपल्या सफाईदार बासरीवादनात टिपत होते. राहुल यांच्या गळ्यातला स्वर ते त्याच स्वराचा बासरीतून प्रकटलेला स्ट्रोक संगीताच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देणारा होता. गणेश वंदना, अभोगी राग, केवळ स्वरांचा विहार, तराणा अशा रचनांतून स्वरांचा लपंडाव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. सावरे आयजयो व वसंतराव देशपांडे यांच्या या भवनातील गीत पुराणे या जुगलबंदीतून रंगलेल्या रचनेने रसिकांना तल्लीन केले. मैफलीची सांगता निर्गुणी भजनाने झाली. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) , निखिल फाटक ( तबला), सुखद मुंडे (पखवाज) व नारायण खिलारी (तानपुरा) यांची सुरेल साथसंगत स्वतंत्र स्वरतालविष्कार होता.
‘पुतळे तोडणे चुकीचे’
पुतळे तोडण्याचे प्रकार मला पटत नाहीत. तोडफोडीचे प्रकार चुकीचे आहेत. विचारांनी लढा देता यायला हवा. मला दहा वेळा विचारले तर मी हेच सांगेन,’ या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी पुतळाप्रकरणावरून टीकास्त्र सोडले. बैलांच्या शर्यतीवरून तमिळनाडूमध्ये पेटलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ही परंपरा सुरू राहिली पाहिजे. परंपरा संपवायच्याच असतील तर कबड्डी आणि गोविंदा पथकेही बंद करा. न्यायालयापेक्षा केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
..
‘जवानांचा लष्करात चांगला सांभाळ’
‘जवानांना चांगले खायला मिळत नाही, ही घटना तुरळक आहे. आपल्या मुलांपेक्षाही त्यांचा चांगला सांभाळ लष्कराकडून केला जातो,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी वसंतोत्सवात केली. गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या ३०६ जवानांच्या कुटुंबांना नाम फाउंडेशनतर्फे अडीच लाख देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत केली. हे काम थांबणारे नाही. जमलेल्या साठ कोटी रुपयांपैकी बरीच रक्कम शिल्लक आहे. त्यातून जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. पैसे लागले तर लोकांकडे हक्काने मागेन. आपण रसिक स्वरांनी न्हाहतो; पण तिकडे सीमेवर जवान बेसुरांशी लढतात म्हणून आपण सुरक्षित असतो,’ अशी टिप्पणी नाना यांनी केली. राजकीय पक्षांच्या चिन्हात संगीताची वाद्ये नाहीत ते बरे आहे. पक्षाच्या चिन्हात वाद्य असती तर निवडणुकीमुळे अडचण निर्माण झाली असती, अशी टिप्पणीही त्यांनी केली.