रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लोकांना पाणी मिळत नाही. पाण्याची टंचाई असते, त्या वेळेलाच त्यांना पाणी प्रश्न आठवतो. एरवी त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही,’ अशी टीका रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केली. दरम्यान, पाणी प्रश्नासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुढाकार घेतला जाणार आहे. रेल्वेच्या जमिनींखालील पाण्याच्या स्रोतांना पुनरुज्जीवित केले आहे. तसेच, येत्या काळात नवीन स्रोत करणे, पाणी पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ऑडिट, असे प्रयोग रेल्वेतर्फे राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे गुजरातचे माजी जलसंपदा आणि आरोग्य मंत्री डॉ. जय नारायण वाघ यांना पाणी प्रश्नावर केलेल्या कार्यासाठी प्रभू यांच्या हस्ते ‘जल-मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी प्रभू बोलत होते. जल भागीरथ फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त पृथ्वीराज सिंग, ‘जीएसटी’चे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
‘पर्यावरणातील बदलांमुळे बिकट परिस्थिती ओढावली असून, बाहेरील वातावरणाऐवजी पंचांग पाहून पावसाळा सुरू असल्याचे सांगावे लागते. देशाच्या एकूण वापरातील ८५ टक्के पाणी पावसाद्वारे आणि उर्वरित १५ टक्के पाणी अन्य स्रोतांद्वारे उपलब्ध होते. यापैकी सर्वाधिक पाणी शेतीसाठी लागते. मात्र, ते देखील अपुरे पडते,’ असे प्रभू म्हणाले. ‘पाणी नसल्याने शेतीचे नुकसान होते, तर काही भागात अतिपाण्यामुळेही नुकसान होते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीची धोरणे ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करायला हवे,’ असेही ते म्हणाले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लोकांना पाणी मिळत नाही. पाण्याची टंचाई असते, त्या वेळेलाच त्यांना पाणी प्रश्न आठवतो. एरवी त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही,’ अशी टीका रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केली. दरम्यान, पाणी प्रश्नासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुढाकार घेतला जाणार आहे. रेल्वेच्या जमिनींखालील पाण्याच्या स्रोतांना पुनरुज्जीवित केले आहे. तसेच, येत्या काळात नवीन स्रोत करणे, पाणी पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ऑडिट, असे प्रयोग रेल्वेतर्फे राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे गुजरातचे माजी जलसंपदा आणि आरोग्य मंत्री डॉ. जय नारायण वाघ यांना पाणी प्रश्नावर केलेल्या कार्यासाठी प्रभू यांच्या हस्ते ‘जल-मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी प्रभू बोलत होते. जल भागीरथ फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त पृथ्वीराज सिंग, ‘जीएसटी’चे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
‘पर्यावरणातील बदलांमुळे बिकट परिस्थिती ओढावली असून, बाहेरील वातावरणाऐवजी पंचांग पाहून पावसाळा सुरू असल्याचे सांगावे लागते. देशाच्या एकूण वापरातील ८५ टक्के पाणी पावसाद्वारे आणि उर्वरित १५ टक्के पाणी अन्य स्रोतांद्वारे उपलब्ध होते. यापैकी सर्वाधिक पाणी शेतीसाठी लागते. मात्र, ते देखील अपुरे पडते,’ असे प्रभू म्हणाले. ‘पाणी नसल्याने शेतीचे नुकसान होते, तर काही भागात अतिपाण्यामुळेही नुकसान होते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीची धोरणे ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करायला हवे,’ असेही ते म्हणाले.