म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून देण्याच्या आंदोलनाला आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देतानाच शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
'सरकार चर्चेला बोलावून मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. राज्यात आज, गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यासमोर बसवावे,' असे आवाहनही शेट्टी यांनी 'मटा'शी बोलताना केले. 'आमच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने ते अधिक आक्रमक करीत आहोत. शेतकरी खवळला आहे. दूध नाशवंत पदार्थ असल्याने त्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सुमारे सात ते आठ हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना धमकावून कार्यकर्त्यांचा पत्ता विचारला जात आहे. कुटुंबियांना पोलिसांकडून दमदाटी केली जात आहे,' असा आरोप शेट्टी यांनी केला.
गुजरातच्या सीमेवर ठाण मांडून बसल्याने टँकरने येणाऱा दुधाचा पुरवठा काल रात्रीपर्यंत रोखला होता. त्यामुळे गुजरातमधून रेल्वेने दुधाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे कळाल्याने रेल्वे रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. परिणामी, गुजरातमधून महाराष्ट्राला येणारा दूध पुरवठा खंडित झाला आहे. आमच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने आंदोलन सुरूच राहील, असेही शेट्टी यांनी नमूद केले.
'जनतेने आंदोलनात उतरावे'
'राज्यातील शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. राज्यात दूधटंचाई जाणवू लागल्याने परराज्यातून पुरवठा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधून येणारे सहा लाख १६ हजार लिटर दूधही आम्ही रोखून धरले आहे. तरीही सरकार बोलायला तयार नाही. राज्यातील कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांना आत टाकत आहात, तर त्यांच्या घरातील जनावरेही पकडा. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा,' असा टोमणा शेट्टी यांनी हाणला. हे आंदोलन स्वाभिमानी संघटनेचे नसून, राज्यातील गरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे. आमची बाजू बरोबर असल्यास आणि शेतकऱ्यांना मदत करायची इच्छा आहे. त्या सर्व नागरिकांनी आंदोलनात उतरावे, असेही आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून देण्याच्या आंदोलनाला आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देतानाच शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
'सरकार चर्चेला बोलावून मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. राज्यात आज, गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यासमोर बसवावे,' असे आवाहनही शेट्टी यांनी 'मटा'शी बोलताना केले. 'आमच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने ते अधिक आक्रमक करीत आहोत. शेतकरी खवळला आहे. दूध नाशवंत पदार्थ असल्याने त्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सुमारे सात ते आठ हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना धमकावून कार्यकर्त्यांचा पत्ता विचारला जात आहे. कुटुंबियांना पोलिसांकडून दमदाटी केली जात आहे,' असा आरोप शेट्टी यांनी केला.
गुजरातच्या सीमेवर ठाण मांडून बसल्याने टँकरने येणाऱा दुधाचा पुरवठा काल रात्रीपर्यंत रोखला होता. त्यामुळे गुजरातमधून रेल्वेने दुधाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे कळाल्याने रेल्वे रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. परिणामी, गुजरातमधून महाराष्ट्राला येणारा दूध पुरवठा खंडित झाला आहे. आमच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने आंदोलन सुरूच राहील, असेही शेट्टी यांनी नमूद केले.
'जनतेने आंदोलनात उतरावे'
'राज्यातील शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. राज्यात दूधटंचाई जाणवू लागल्याने परराज्यातून पुरवठा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधून येणारे सहा लाख १६ हजार लिटर दूधही आम्ही रोखून धरले आहे. तरीही सरकार बोलायला तयार नाही. राज्यातील कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांना आत टाकत आहात, तर त्यांच्या घरातील जनावरेही पकडा. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा,' असा टोमणा शेट्टी यांनी हाणला. हे आंदोलन स्वाभिमानी संघटनेचे नसून, राज्यातील गरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे. आमची बाजू बरोबर असल्यास आणि शेतकऱ्यांना मदत करायची इच्छा आहे. त्या सर्व नागरिकांनी आंदोलनात उतरावे, असेही आवाहन त्यांनी केले.